शहरं
Join us  
Trending Stories
1
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
2
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
3
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
4
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
5
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
6
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
7
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
8
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
9
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
10
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
11
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
12
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
13
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
14
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
15
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार
16
भारताच्या शेजारील देश भूकंपाने हादरला; म्यानमारमध्ये ४.० तीव्रतेचा भूकंप, भारतावरही परिणाम?
17
शेअर्स आहे की पैशांचा पाऊस? 'या' ५ स्टॉक्सनी एकाच आठवड्यात दिले तब्बल ५५% रिटर्न!
18
१६ कोटींचा बंगला, चॉपर, दुबईच्या कंपनीत ३८ कोटी... ईडीच्या कारवाईत मोठं घबाड हाती, पोलिसांना कल्पनाच नाही
19
कोरोनापासून जगाला सावध करणाऱ्या चिनी पत्रकाराला पुन्हा तुरुंगवास; आधीच चार वर्षे भोगली शिक्षा..., आता पुन्हा
20
गुणरत्न सदावर्ते यांच्या गाडीवर हल्ला, आंदोलकांनी ताफा अडवल्याने उडाला गोंधळ; पोलिसांची धावपळ

निर्धास्त रहा... भोममधील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन

By आप्पा बुवा | Updated: August 20, 2023 18:14 IST

भोम येथील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन 

फोंडा - भोम येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना लोकांची एक इंच जमीन जाणार नाही. कुठल्याच मंदिराला धक्का पोहोचणार नाही. तसेच लागवडीखाली असलेल्या कोणत्याच जमिनीवर अतिक्रमण होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल. वेळ पडताच लोकांच्या बरोबर राहून आंदोलन करेन. असे ठोस आश्वासन क्रीडामंत्री व स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी भोमच्या नागरिकांना दिले. मागची काही वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्य प्रश्नावरून भोम येथे वेळोवेळी लहानसहान आंदोलने होत आली आहेत.  मागच्या सहा महिन्यात नागरिकांनी चांगलाच जोर  पकडला आहे. या संदर्भात नागरिकांची बाजू ऐकून घेण्यासाठी रविवारी गोविंद गावडे यांनी भोमीतील सातेरी मंडपात आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. 

यावेळी  ग्रामस्थांची समजूत काढताना गोविंद गावडे पुढे म्हणाले की ह्या विषयावरून मागची काही वर्षे काही लोक जे राजकारण करत आहे ते अगोदर बंद व्हायला हवे. काही लोकांच्या जमिनी जाणार म्हणून भीती  भीती वाटत आहे ती मुळात चुकीची आहे. ह्या संदर्भात खरी माहिती लोकांसमोर यावी म्हणून मागे एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीचे तज्ञ लोक येथे आले होते. परंतु लोकांनी त्यांचे ऐकून घेतले नाही. खरी वस्तूस्थिती लोकांना समजावी म्हणून पुन्हा एकदा तज्ञ लोक आणून लोकांना खरी वस्तुस्थिती सांगण्यात येईल. त्यावेळी लोकांनी शहनिशा करावी. जर यावेळी लोकांच्या हक्काच्या जमिनी जात असेल असे जर आपल्याला लोकांनी दाखवून दिले तर, प्रसंगी लोकांच्या सोबत राहून खर आंदोलनात सहभाग घेईन. सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर लोकांच्या  बैठका आम्ही घेऊ. तिथे तुम्ही तुमची बाजू मांडा. आमचे सरकार हे सामान्य लोकांचे सरकार असून जे लोकांना हवे तेच आम्ही करत आलो असून, यापुढे सुद्धा आमची तीच भूमिका असेल. रविवारी सातेरी मंडपात आम्हाला बायपासच हवा ही मागणी घेऊन भोमचे ग्रामस्थ सातेरी मंडपात गोळा झाले होते. यावेळी सदर आंदोलनात मोठ्या संख्येने हाती फलक घेऊन स्त्रिया सुद्धा सहभागी झाल्या होत्या. काही काळ सदरचा परिसर हा ग्रामस्थांनी घोषणा दणाणून सोडला. आंदोलन करते मोठ्या संख्येने जमा होत आहेत ते पाहून पोलिसांनी सुद्धा आपली कुमक यावेळी वाढवून घेतली. 

सुरुवातीलाच एका नागरिकांने सदर आंदोलनात बाहेरच्या व्यक्ती का असा सवाल करताच आंदोलन कर्ते भडकले व प्रकरण हातघाईवर गेले . एकामेकाची समजूत काढून नंतर बैठक सुरू झाली. लोकांच्या वतीने  संजय नाईक यांनी ग्रामस्थांची बाजू मंत्री गोविंद गावडे यांच्यासमोर मांडली त्यांच्यामते एवढे दिवस लेखी आश्वासने मिळाली ती काही उपयोगाची नाहीत. यापुढे जे काही सरकारला सांगायचे आहे ते लेखी स्वरूपातच आमच्यासमोर यायला पाहिजे.  सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल लोकांना थेट आव्हान देत आहेत की राष्ट्रीय महामार्ग सरकारला हवा त्याच मार्गतून होईल. सरकारला जे काही करायचे आहे ग्रामस्थांचे हित राखूनच करावे लागेल.

टॅग्स :goaगोवाministerमंत्री