शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
5
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
6
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
7
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
8
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
9
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
10
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
11
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
12
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
13
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
14
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
15
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
16
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
17
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
18
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
19
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
20
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..

निर्धास्त रहा... भोममधील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन

By आप्पा बुवा | Updated: August 20, 2023 18:14 IST

भोम येथील ग्रामस्थांना मंत्री गोविंद गावडे यांचे आश्वासन 

फोंडा - भोम येथील राष्ट्रीय महामार्गाचे काम करत असताना लोकांची एक इंच जमीन जाणार नाही. कुठल्याच मंदिराला धक्का पोहोचणार नाही. तसेच लागवडीखाली असलेल्या कोणत्याच जमिनीवर अतिक्रमण होणार नाही याची योग्य ती काळजी घेतली जाईल. वेळ पडताच लोकांच्या बरोबर राहून आंदोलन करेन. असे ठोस आश्वासन क्रीडामंत्री व स्थानिक आमदार गोविंद गावडे यांनी भोमच्या नागरिकांना दिले. मागची काही वर्षे राष्ट्रीय महामार्गाच्य प्रश्नावरून भोम येथे वेळोवेळी लहानसहान आंदोलने होत आली आहेत.  मागच्या सहा महिन्यात नागरिकांनी चांगलाच जोर  पकडला आहे. या संदर्भात नागरिकांची बाजू ऐकून घेण्यासाठी रविवारी गोविंद गावडे यांनी भोमीतील सातेरी मंडपात आंदोलनकर्त्यांची बाजू ऐकून घेतली. 

यावेळी  ग्रामस्थांची समजूत काढताना गोविंद गावडे पुढे म्हणाले की ह्या विषयावरून मागची काही वर्षे काही लोक जे राजकारण करत आहे ते अगोदर बंद व्हायला हवे. काही लोकांच्या जमिनी जाणार म्हणून भीती  भीती वाटत आहे ती मुळात चुकीची आहे. ह्या संदर्भात खरी माहिती लोकांसमोर यावी म्हणून मागे एकदा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणीचे तज्ञ लोक येथे आले होते. परंतु लोकांनी त्यांचे ऐकून घेतले नाही. खरी वस्तूस्थिती लोकांना समजावी म्हणून पुन्हा एकदा तज्ञ लोक आणून लोकांना खरी वस्तुस्थिती सांगण्यात येईल. त्यावेळी लोकांनी शहनिशा करावी. जर यावेळी लोकांच्या हक्काच्या जमिनी जात असेल असे जर आपल्याला लोकांनी दाखवून दिले तर, प्रसंगी लोकांच्या सोबत राहून खर आंदोलनात सहभाग घेईन. सार्वजनिक बांधकाम मंत्री निलेश काब्राल, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याबरोबर लोकांच्या  बैठका आम्ही घेऊ. तिथे तुम्ही तुमची बाजू मांडा. आमचे सरकार हे सामान्य लोकांचे सरकार असून जे लोकांना हवे तेच आम्ही करत आलो असून, यापुढे सुद्धा आमची तीच भूमिका असेल. रविवारी सातेरी मंडपात आम्हाला बायपासच हवा ही मागणी घेऊन भोमचे ग्रामस्थ सातेरी मंडपात गोळा झाले होते. यावेळी सदर आंदोलनात मोठ्या संख्येने हाती फलक घेऊन स्त्रिया सुद्धा सहभागी झाल्या होत्या. काही काळ सदरचा परिसर हा ग्रामस्थांनी घोषणा दणाणून सोडला. आंदोलन करते मोठ्या संख्येने जमा होत आहेत ते पाहून पोलिसांनी सुद्धा आपली कुमक यावेळी वाढवून घेतली. 

सुरुवातीलाच एका नागरिकांने सदर आंदोलनात बाहेरच्या व्यक्ती का असा सवाल करताच आंदोलन कर्ते भडकले व प्रकरण हातघाईवर गेले . एकामेकाची समजूत काढून नंतर बैठक सुरू झाली. लोकांच्या वतीने  संजय नाईक यांनी ग्रामस्थांची बाजू मंत्री गोविंद गावडे यांच्यासमोर मांडली त्यांच्यामते एवढे दिवस लेखी आश्वासने मिळाली ती काही उपयोगाची नाहीत. यापुढे जे काही सरकारला सांगायचे आहे ते लेखी स्वरूपातच आमच्यासमोर यायला पाहिजे.  सार्वजनिक बांधकाम खात्याचे मंत्री निलेश काब्राल लोकांना थेट आव्हान देत आहेत की राष्ट्रीय महामार्ग सरकारला हवा त्याच मार्गतून होईल. सरकारला जे काही करायचे आहे ग्रामस्थांचे हित राखूनच करावे लागेल.

टॅग्स :goaगोवाministerमंत्री