शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

मतभेद बाहेर न्याल तर खबरदार! प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी खडसावले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2024 11:15 IST

काँग्रेस राज्य कार्यकारिणी बैठक 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : काही मतभेद असतील तर ते पक्षांतर्गतच आपापसात बोलून सोडवा, ते बाहेर न्याल व पक्षाचे नुकसान कराल तर यापुढे खपवून घेतले जाणार नाही. कठोर कारवाई केली जाईल, असा इशारा काँग्रेस राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत प्रभारी माणिकराव ठाकरे यांनी दिला.

तब्बल चार तास चाललेल्या या बैठकीनंतर पत्रकार परिषदेत ठाकरे यांनाही कार्ल्स प्रकरणाबद्दल विचारले तेव्हा ते म्हणाले की, आमदाराने पोलिसांत स्वतः तक्रार दिली आहे. त्याची चौकशी चालू आहे. तुम्ही याबद्दल पोलिसांनाच जाऊन विचारा. भाजपने याप्रकरणी आमच्या आमदाराची, तसेच पक्षाची बदनामी चालवल्याची टीकाही ठाकरे यांनी केली. बैठकीत आगामी जिल्हा पंचायत निवडणूक, तसेच २०२७ च्या विधानसभा निवडणुकीच्या तयारीच्या दृष्टीनेही चर्चा झाली. पक्षाच्या प्रभारी सचिव अंजली निंबाळकर म्हणाल्या की, गोव्यात पक्ष संघटना मजबूत करणे हे आता आमचे प्राधान्य आहे. त्यासाठी प्रत्येक मतदारसंघात माझे दौरे चालू आहेत. पुढील विधानसभा निवडणुकीसाठी बाणावलीतून काँग्रेस उमेदवार देणार, असे माझ्या तोंडात पत्रकारांनी चुकीच वाक्य घातले. प्रत्यक्षात तेथील लोकांनी काँग्रेसने उमेदवार द्यावा, असा आग्रह धरला तेव्हा मी त्यांना तुमची मागणी पक्ष श्रेष्ठींना कळवतो एवढेच सांगितले.

पत्रकार परिषदेस प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर, अ. भा. काँग्रेस समितीचे कायम सदस्य गिरीश चोडणकर हेही उपस्थित होते. दरम्यान, बैठकीत पक्षनेतृत्वाबद्दल, तसेच एकूणच पक्षात जे काही चालले आहे त्यावर तक्रारीचा सूर लावला असता ठाकरे यांनी त्यांना तुमचे जे काही मतभेद आहेत ते पक्षातच मिटवा, असे सांगितले.

पोलिसांना तपास करू द्या... 

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव कार्ल्सप्रकरणी म्हणाले की, आमदाराने स्वतः तक्रार दिलेली आहे. व्हायरल झालेला व्हिडीओ मॉर्फ केलेला आहे. पोलिसांना तपास करू द्या. भाजपने विनाकारण कोणाची बदनामी करण्याचे कारण नाही. उद्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून कोणत्याही नेत्याला बदनाम केले जाऊ शकते. त्यामुळे त्या नेत्याला किवा पक्षाला दोष द्यावा का, असा प्रश्न युरी यांनी केला.

भाजपनेच व्हिडीओ व्हायरल केला : ठाकरे 

ठाकरे म्हणाले की, राज्यात नोकरीकांड, तसेच अन्य विषय गाजत असताना लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपनेच व्हिडीओ व्हायरल केला व आता पत्रकार परिषदा, मोर्चे आणून व्हिडीओचे प्रकरण गाजवले जात आहे; परंतु आमदाराने स्वतःच तक्रार दिलेली आहे. त्यामुळे पोलिसांना तपास तर करू द्या. चौकशीत काय ते स्पष्ट होईलच.

इंडिया युतीबाबत विधानसभा निवडणुकीआधी होणार निर्णय 

इंडिया युतीच्या प्रश्नावर आम आदमी पक्षाचे आमदार वेंझी व्हिएगश, तसेच पक्षाचे गोवा प्रमुख अमित पालेकर यांनी केलेल्या विधानांबद्दल विचारले असता ठाकरे म्हणाले, २०२७ च्या विधानसभा निवडणुकीआधी त्यावर निर्णय होईल. स्थानिक नेत्यांनी आता कोणतीही विधाने केली तरी त्याला मुळीच अर्थ नाही. सध्या आम्ही कोणाचे तोंड धरू शकत नाही. अखिल भारतीय काँग्रेस समिती पक्षाच्या भूमिकेबाबत अंतिम निर्णय घेईल. प्रत्येक पक्ष आपल्या हिताचे बोलत असतो. आघाडीच्या बाबतीत निवडणुका जवळ आल्यावरच अंतिम निर्णय होतील.

टॅग्स :goaगोवाcongressकाँग्रेसManikrao Thackreyमाणिकराव ठाकरेManikrao Thakareमाणिकराव ठाकरे