शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
5
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
6
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
7
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
8
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
9
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
10
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
11
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
12
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
13
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
14
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
15
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
16
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
17
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
18
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून
19
पोलिसाच्या घरातच चोरी; सोन्याचे मंगळसूत्र, २ मोबाईलसह मौल्यवान वस्तू घेऊन चोर फरार!
20
जिंकलंस भावा! मजुराचा मुलगा कष्टाने झाला IPS; देशाची सेवा करण्याचं स्वप्न होणार साकार

शेतजमीन विक्रीवर कायदा होईपर्यंत बंदी; कृषी जमिनींच्या विक्रीखतांवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 08:32 IST

सरकारने आणलेल्या भात शेत जमीन हस्तांतरण विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत कृषी जमिनींची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सरकारने आणलेल्या भात शेत जमीन हस्तांतरण विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत कृषी जमिनींची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता कृषी जमिनींची विक्रीखते केली जाणार नाहीत. परंतु, गोवा सरकारने विधानसभेत संमत केलेले कृषी ज़मीन हस्तांतरण विधेयक राज्यपालांची मंजुरी मिळून कायदा बनेपर्यंत बराच वेळ जाणार आहे.

या काळात भात शेत जमिनी घाईघाईने विकून टाकण्याचे प्रयत्नही होऊ शकतात हे लक्षात घेऊन सरकारने कृषी जमिनीची विक्रीखते करण्याची प्रक्रिया बंद ठेवली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. लवकरच या विधेयकात नियम वगैरे बनविले जातील, तसेच राज्यपालांचीही मंजुरी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कृषी जमीन हस्तांतरण कायदा करण्यामागे गोव्यातील कृषी जमिनी राखणे हा हेतू आहे. परंतु विरोधकांना गोव्यातील कृषी जमिनी राखायला नको आहेत, असे त्यांच्या भूमिकेवरून दिसते. काँग्रेसचे आमदार कार्लस फेरेरा यांनी सुचविलेल्या सूचना सरकारने विचारात घेतल्या आहेत. त्यामुळे सूचनांचे स्वागत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'ते' विधेयक समजून घ्या

कोमुनिदाद जमिनीच्या वापराबाबत आणलेले विधेयक हे काही कोमुनिदादच्या जागा बळकावण्यासाठी आणलेले नाही आणि तशी तरतूदही त्यात नाही. प्रत्येक बाबतीत कोमुनिदादची परवानगी सक्तीची करण्यात आली असतानाही त्याला करण्यात आलेला विरोध हा राजकीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांना केवळ गोंधळ घालणेच माहिती

या कायद्यात केवळ भातशेती म्हणजेच कृषी जमिनी या मर्यादेला जर विरोधकांचा विरोध होता आणि इतर बागायतींचाही सामावेश करायचा होता तर तशा सूचना ते करू शकले असते आणि सरकारही त्यावर चर्चा करायला तयार होते. परंतु तसे न करता विरोधकांनी विधेयकालाच विरोध करताना गोंधळ घातला. त्यावरून त्यांची भूमिकाही स्पष्ट होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

..तर ते घटनाबाह्य ठरले असते

गोव्यात कृषी जमीन खरेदी करणारा माणूस हा गोमंतकीय शेतकरी असावा ही विरोधकांची मागणी मंजूर करता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कारण तसे केले असते तर हे विधेयकच घटनाबाह्य ठरले असते. इतर राज्यातील लोकांना जमिनी खरेदी करण्यास बंदी असलेला कायदा जो जम्मू -काश्मीरमध्ये होता तोही ३७० कलम रद्द करून संपुष्टात आणला आहे. त्यामुळे तसा दर्जा इतर राज्यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यातल्या त्यात शेतकरी असण्याची अट घालून वाट काढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवा