शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांची मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
"ही पाकची जुनी खोड..."; इस्लामाबादच्या स्फोटाचं खापर भारतावर फोडणाऱ्या पाकिस्तानला मिळालं चोख उत्तर! 
3
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
4
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
5
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
6
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
7
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
8
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
9
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
10
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
11
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
12
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
13
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
14
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
15
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
16
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
17
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
18
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
19
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
20
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा

शेतजमीन विक्रीवर कायदा होईपर्यंत बंदी; कृषी जमिनींच्या विक्रीखतांवर निर्बंध

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2023 08:32 IST

सरकारने आणलेल्या भात शेत जमीन हस्तांतरण विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत कृषी जमिनींची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : सरकारने आणलेल्या भात शेत जमीन हस्तांतरण विधेयकाचे कायद्यात रूपांतर होईपर्यंत कृषी जमिनींची विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे. आता कृषी जमिनींची विक्रीखते केली जाणार नाहीत. परंतु, गोवा सरकारने विधानसभेत संमत केलेले कृषी ज़मीन हस्तांतरण विधेयक राज्यपालांची मंजुरी मिळून कायदा बनेपर्यंत बराच वेळ जाणार आहे.

या काळात भात शेत जमिनी घाईघाईने विकून टाकण्याचे प्रयत्नही होऊ शकतात हे लक्षात घेऊन सरकारने कृषी जमिनीची विक्रीखते करण्याची प्रक्रिया बंद ठेवली आहे. तशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी एका स्थानिक वृत्तवाहिनीशी बोलताना दिली. लवकरच या विधेयकात नियम वगैरे बनविले जातील, तसेच राज्यपालांचीही मंजुरी घेतली जाईल, असे मुख्यमंत्री म्हणाले. कृषी जमीन हस्तांतरण कायदा करण्यामागे गोव्यातील कृषी जमिनी राखणे हा हेतू आहे. परंतु विरोधकांना गोव्यातील कृषी जमिनी राखायला नको आहेत, असे त्यांच्या भूमिकेवरून दिसते. काँग्रेसचे आमदार कार्लस फेरेरा यांनी सुचविलेल्या सूचना सरकारने विचारात घेतल्या आहेत. त्यामुळे सूचनांचे स्वागत असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

'ते' विधेयक समजून घ्या

कोमुनिदाद जमिनीच्या वापराबाबत आणलेले विधेयक हे काही कोमुनिदादच्या जागा बळकावण्यासाठी आणलेले नाही आणि तशी तरतूदही त्यात नाही. प्रत्येक बाबतीत कोमुनिदादची परवानगी सक्तीची करण्यात आली असतानाही त्याला करण्यात आलेला विरोध हा राजकीय असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.

विरोधकांना केवळ गोंधळ घालणेच माहिती

या कायद्यात केवळ भातशेती म्हणजेच कृषी जमिनी या मर्यादेला जर विरोधकांचा विरोध होता आणि इतर बागायतींचाही सामावेश करायचा होता तर तशा सूचना ते करू शकले असते आणि सरकारही त्यावर चर्चा करायला तयार होते. परंतु तसे न करता विरोधकांनी विधेयकालाच विरोध करताना गोंधळ घातला. त्यावरून त्यांची भूमिकाही स्पष्ट होत आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.

..तर ते घटनाबाह्य ठरले असते

गोव्यात कृषी जमीन खरेदी करणारा माणूस हा गोमंतकीय शेतकरी असावा ही विरोधकांची मागणी मंजूर करता येणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. कारण तसे केले असते तर हे विधेयकच घटनाबाह्य ठरले असते. इतर राज्यातील लोकांना जमिनी खरेदी करण्यास बंदी असलेला कायदा जो जम्मू -काश्मीरमध्ये होता तोही ३७० कलम रद्द करून संपुष्टात आणला आहे. त्यामुळे तसा दर्जा इतर राज्यांना देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यातल्या त्यात शेतकरी असण्याची अट घालून वाट काढल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम" 

टॅग्स :goaगोवा