शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

माशांच्या आयातीवर बंदी घाला, मासळीच्या प्रश्नावरुन मंत्र्यांमध्ये फूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 22:22 IST

निर्यातदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करु नये असा सल्ला

मडगाव : भाजपा घटक पक्षात सगळे काही आलबेल आहे, असे सांगितले जात असले तरी मासळीच्या प्रश्नावरुन सरकारच्या मंत्र्यांत फूट आहे हे सिद्ध झाले आहे. एका बाजुने एफडीए खाते सांभाळणारे मंत्री विश्वजीत राणो यांनी माशांच्या आयातीवरील बंदी घालण्याचा सरकारचा मानस नसल्याचे स्पष्ट केले. पण, दुसऱ्या बाजुने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी जोर्पयत मासळी तपासण्याची यंत्रणा उभी रहात नाही तोर्पयत माशांच्या आयातीवर बंदी घालावी या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. 

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी उपेंद्र जोशी यांच्याशी याबद्दल त्यांनी संपर्कही साधला आहे. यासंदर्भात सरदेसाई यांना विचारले असता, मासे हा गोवेकरांच्या अन्नातील प्रमुख घटक असून गोव्यात येणारे मासे चांगले आहेत की दुषित याबद्दलचा संभ्रम अजुनही लोकांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच मडगावच्या मासळी मार्केटात लोक मासळी विकत घेण्यासाठी येत नाहीत. त्याऐवजी लोक रांपणीची मासळी विकत घ्यायला जातात. अजुनही आम्ही ग्राहकांच्या मनात मासळीबद्दल विश्वास निर्माण करू शकलो नाहीत. जोर्पयत हा विश्वास तयार होत नाही, तोपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी आणावी, अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. याबद्दल दिल्लीत गेलो असताना मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो होतो. मुख्यमंत्र्यांनी अशी बंदी घालण्याबद्दल अनुमती दर्शविली होती. मुख्यमंत्र्यांच्या या सुचनेची अजूनही कार्यवाही का होत नाही. याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडे विचारणा केली, असेही सरदेसाई म्हणाले.

माशांवरील बंदी हा शेवटचा उपाय असे जरी अधिकारी वर्ग म्हणत असला तरी मागच्या तीन महिन्यात या संदर्भात कुठलीही उपाययोजना झालेली नाही. एवढेच नव्हे तर केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतल्यावर त्यांनी गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची मासळी तपासण्याची प्रयोगशाळा सुरू करण्याचे आश्र्वासनही दिले. ही गोष्ट जरी चांगली असली तरी गोव्यातील मासळीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मडगावात ती स्थापन करण्याची गरज आहे. ती म्हापशात का म्हणून स्थापन केली जाते, असा सवाल त्यांनी केला.

मासळी आयातदारांशी एफडीए मंत्री विश्वजीत राणो यांनी सौम्यपणो वागू नये अशी सुचनाही सरदेसाई यांनी केली. ते म्हणाले, मडगावातील मासळी आयातदारांनी एफडीएच्या नियमांची पायमल्ली केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी घेतला होता. आता मंत्री राणो याच आयातदारांना आणखी 15 दिवसांची मुदत का देतात असा सवाल त्यांनी केला. या व्यावसायिकांकडे योग्य तो परवाना नसल्यास त्यांच्यावर बंदी आणावी. याच व्यावसायिकांमुळे गोव्यातील जनतेत मासळीबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे, याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असेही सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :goaगोवाfishermanमच्छीमार