शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

माशांच्या आयातीवर बंदी घाला, मासळीच्या प्रश्नावरुन मंत्र्यांमध्ये फूट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2018 22:22 IST

निर्यातदारांना पाठीशी घालण्याचा प्रयत्न करु नये असा सल्ला

मडगाव : भाजपा घटक पक्षात सगळे काही आलबेल आहे, असे सांगितले जात असले तरी मासळीच्या प्रश्नावरुन सरकारच्या मंत्र्यांत फूट आहे हे सिद्ध झाले आहे. एका बाजुने एफडीए खाते सांभाळणारे मंत्री विश्वजीत राणो यांनी माशांच्या आयातीवरील बंदी घालण्याचा सरकारचा मानस नसल्याचे स्पष्ट केले. पण, दुसऱ्या बाजुने गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष व नगरनियोजन मंत्री विजय सरदेसाई यांनी जोर्पयत मासळी तपासण्याची यंत्रणा उभी रहात नाही तोर्पयत माशांच्या आयातीवर बंदी घालावी या मागणीचा पुनरुच्चार केला आहे. 

मुख्यमंत्र्यांचे ओएसडी उपेंद्र जोशी यांच्याशी याबद्दल त्यांनी संपर्कही साधला आहे. यासंदर्भात सरदेसाई यांना विचारले असता, मासे हा गोवेकरांच्या अन्नातील प्रमुख घटक असून गोव्यात येणारे मासे चांगले आहेत की दुषित याबद्दलचा संभ्रम अजुनही लोकांच्या मनात कायम आहे. त्यामुळेच मडगावच्या मासळी मार्केटात लोक मासळी विकत घेण्यासाठी येत नाहीत. त्याऐवजी लोक रांपणीची मासळी विकत घ्यायला जातात. अजुनही आम्ही ग्राहकांच्या मनात मासळीबद्दल विश्वास निर्माण करू शकलो नाहीत. जोर्पयत हा विश्वास तयार होत नाही, तोपर्यंत मासळीच्या आयातीवर बंदी आणावी, अशी आपली मागणी असल्याचे ते म्हणाले. याबद्दल दिल्लीत गेलो असताना मी मुख्यमंत्र्यांशीही बोललो होतो. मुख्यमंत्र्यांनी अशी बंदी घालण्याबद्दल अनुमती दर्शविली होती. मुख्यमंत्र्यांच्या या सुचनेची अजूनही कार्यवाही का होत नाही. याबद्दल आपण मुख्यमंत्र्यांच्या ओएसडीकडे विचारणा केली, असेही सरदेसाई म्हणाले.

माशांवरील बंदी हा शेवटचा उपाय असे जरी अधिकारी वर्ग म्हणत असला तरी मागच्या तीन महिन्यात या संदर्भात कुठलीही उपाययोजना झालेली नाही. एवढेच नव्हे तर केंद्रीयमंत्री सुरेश प्रभू यांची भेट घेतल्यावर त्यांनी गोव्यात आंतरराष्ट्रीय दर्जाची मासळी तपासण्याची प्रयोगशाळा सुरू करण्याचे आश्र्वासनही दिले. ही गोष्ट जरी चांगली असली तरी गोव्यातील मासळीची प्रमुख बाजारपेठ असलेल्या मडगावात ती स्थापन करण्याची गरज आहे. ती म्हापशात का म्हणून स्थापन केली जाते, असा सवाल त्यांनी केला.

मासळी आयातदारांशी एफडीए मंत्री विश्वजीत राणो यांनी सौम्यपणो वागू नये अशी सुचनाही सरदेसाई यांनी केली. ते म्हणाले, मडगावातील मासळी आयातदारांनी एफडीएच्या नियमांची पायमल्ली केल्यामुळे त्यांची नोंदणी रद्द करण्याचा निर्णय एफडीएच्या संचालक ज्योती सरदेसाई यांनी घेतला होता. आता मंत्री राणो याच आयातदारांना आणखी 15 दिवसांची मुदत का देतात असा सवाल त्यांनी केला. या व्यावसायिकांकडे योग्य तो परवाना नसल्यास त्यांच्यावर बंदी आणावी. याच व्यावसायिकांमुळे गोव्यातील जनतेत मासळीबद्दल अविश्वास निर्माण झाला आहे, याकडे दुर्लक्ष केले जाऊ नये, असेही सरदेसाई म्हणाले.

टॅग्स :goaगोवाfishermanमच्छीमार