शहरं
Join us  
Trending Stories
1
मी २०२९ सालापर्यंत महाराष्ट्रातच राहणार; दिल्लीला जाण्याची शक्यता फडणवीस यांनी फेटाळली!
2
आजचे राशीभविष्य, २८ सप्टेंबर २०२५: अचानक धनलाभ होईल; आनंददायी बातमी मिळेल
3
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
4
भारत विरुद्ध इंडिया; शहरी-ग्रामीण विषमतेचा अर्थ आणि परिणाम काय?
5
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
6
लेह हिंसाचार प्रकरण: वांगचूक जोधपूर तुरुंगात; पोलिसांकडून कसून चौकशी
7
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
8
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
9
बाबांचे पुस्तकप्रेम, आईची शिस्त अन् धैर्याची शिखरवारी! १३ वर्षांची धैर्या पोहोचली माउंट एलब्रुसवर
10
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
11
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
12
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
13
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
14
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
15
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
16
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
17
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
18
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
19
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
20
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता

'बालरथ' संपावर; शिक्षण खात्याकडून पगारवाढीसह काही मागण्या मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:24 IST

शिक्षण संचालनालयाने नोटीस जारी करुन बालरथ कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : युनायटेड बालरथ एम्प्लॉयी युनियनच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व बालरथ कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी आज, सोमवारपासून संपावर जाणार आहेत. एकूण ४२० बालरथ बसेसमधील ८४० कामगार संपात सहभागी होणार आहेत. त्याचा फटका बालरथमधून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची वेळ येऊ शकते.

दरम्यान, शिक्षण संचालनालयाने नोटीस जारी करुन बालरथ कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. बालरथ चालकांना प्रती महिना ११ हजार दिला जात होता तो आता १२ हजार केला आहे तसेच वाहकांना ५.५ हजार रुपये मिळत होते ते आता ६ हजार करण्यात आले आहे. संप करू नये असे आवाहन शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी केले आहे.

बालरथ कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाची नोटीस शिक्षण खाते व सर्व शाळांना दिली आहे. आम्ही कुठल्याच कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. मागण्यासांठी हा संप पुकारला आहे. याविषयी आम्ही सर्वांना पूर्वसूचनाही दिली आहे, असे कामगारांचे म्हणणे आहे.

मिळतो तुटपुंजा पगार 

राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये ४२० बालरथ बसेस कार्यरत आहेत. चालक आणि वाहक मिळून ८४० कामगार आहेत. सर्वांचा संपात सहभाग आहे. यापूर्वी अनेकदा कामगारांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला. पण, सरकारने त्यांना फक्त आश्वासने देऊन संप मागे घेण्यास भाग पाडले. बस चालकांना दरमहा फक्त ११ हजार रुपये, वाहकांना ५.५ हजार रुपये असा तुटपुंजा पगार मिळतो. पगार बँक खात्यात जमा न करता शाळांच्या व्यवस्थापनाकडे दिला जातो. व्यवस्थापनाकडून कामगारांची सतावणूक केली जाते. त्यांच्याकडून इतर कामे करून घेतली जातात, असे या कामगार संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.

१ पगार वाढवला

दरम्यान, बालरथांसाठी शिक्षण खात्याकडून शाळांना वार्षिक ३ लाख ६६ हजार रुपये मिळत होते. ते आता ४ लाख १७ हजार केले आहेत. कामगारांना १० महिन्यांऐवजी ११ महिन्यांचा पगार मिळेल. अनुक्रमे १००० व ५०० रुपये पगारवाढ दिली आहे. वेळेवर पगार मिळेल. कामगारांच्या मागण्या काही प्रमाणात पूर्ण केल्या आहेत. कामगारांनी संप करू नये, असे आवाहन शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी केले आहे. 

संप मागे घेणार नाही

शाळा व्यवस्थापनासाठी बालरथांसाठी वार्षिक रक्कम वाढवली. त्याचा चालक- वाहकांना काहीच फायदा होणार नाही. याचा फायदा शाळांनाच होईल. आम्हाला व्यावस्थापनाकडून पैसे नकोत. थेट कामगारांच्या खात्यात पगार जमा करावा. तुटपुंजी पगारवाढ नको. शाळा व्यावस्थापन कामगारांची सतावणूक करत आहे. त्यावर शिक्षण खात्याने स्पष्टीकरण द्यावे. नोटीस जारी करुन आम्ही संप मागे घेणार नाही. कायदेशीर मार्गाने चर्चा करून मागण्या मान्य कराव्यात. -स्वाती केरकर, कामगार संघटनेच्या नेत्या

 

टॅग्स :goaगोवा