शहरं
Join us  
Trending Stories
1
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
2
“शेतकऱ्यांना विमा कवच आवश्यक, नवा पॅटर्न अन्यायकारक, योजना पहिल्यासारखी सुरु ठेवा”: सपकाळ
3
'फक्त एकाला मारणार, जो लाखांच्या...!'; लॉरेंस बिश्नोई गँगची पाकला धमकी, कुणावर निशाणा?
4
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच
5
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
6
'या' स्फूर्तिदायी काव्यरचनांमधून द्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा आणि शेअर करा आकर्षक शुभेच्छा पत्रं!
7
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
8
विनायक चतुर्थी: गणपती पूजनात ‘या’ गोष्टी हव्यातच, कसे कराल व्रत? पाहा, सोपी पद्धत अन् मान्यता
9
विनायक चतुर्थी: ६ राशींना अनुकूल, अडकलेले पैसे मिळतील; नोकरीत पदोन्नती, बाप्पा चांगलेच करेल!
10
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
11
IPL 2025 : कुलदीप-रिंकू यांच्यात नेमकं काय घडलं? खरी गोष्ट आली समोर (VIDEO)
12
जातिनिहाय जनगणना होणार, मोदींनी राहुल गांधींच्या हातून मोठा मुद्दा हिसकावला, असे आहेत फायदे तोटे  
13
"सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने गुन्हा दाखल झालेल्या मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा राजीनामा कधी घेणार?’’ काँग्रेसचा सवाल 
14
IPL 2025: रोबोट कुत्र्यामुळे BCCI अडचणीत, उच्च न्यायालयाकडून मिळाली नोटीस, पण कशासाठी?
15
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
16
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
17
काय सांगता? 'असं' चालाल तर नक्कीच लवकर वजन कमी कराल; होतील फायदेच फायदे
18
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
19
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...

'बालरथ' संपावर; शिक्षण खात्याकडून पगारवाढीसह काही मागण्या मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:24 IST

शिक्षण संचालनालयाने नोटीस जारी करुन बालरथ कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : युनायटेड बालरथ एम्प्लॉयी युनियनच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व बालरथ कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी आज, सोमवारपासून संपावर जाणार आहेत. एकूण ४२० बालरथ बसेसमधील ८४० कामगार संपात सहभागी होणार आहेत. त्याचा फटका बालरथमधून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची वेळ येऊ शकते.

दरम्यान, शिक्षण संचालनालयाने नोटीस जारी करुन बालरथ कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. बालरथ चालकांना प्रती महिना ११ हजार दिला जात होता तो आता १२ हजार केला आहे तसेच वाहकांना ५.५ हजार रुपये मिळत होते ते आता ६ हजार करण्यात आले आहे. संप करू नये असे आवाहन शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी केले आहे.

बालरथ कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाची नोटीस शिक्षण खाते व सर्व शाळांना दिली आहे. आम्ही कुठल्याच कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. मागण्यासांठी हा संप पुकारला आहे. याविषयी आम्ही सर्वांना पूर्वसूचनाही दिली आहे, असे कामगारांचे म्हणणे आहे.

मिळतो तुटपुंजा पगार 

राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये ४२० बालरथ बसेस कार्यरत आहेत. चालक आणि वाहक मिळून ८४० कामगार आहेत. सर्वांचा संपात सहभाग आहे. यापूर्वी अनेकदा कामगारांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला. पण, सरकारने त्यांना फक्त आश्वासने देऊन संप मागे घेण्यास भाग पाडले. बस चालकांना दरमहा फक्त ११ हजार रुपये, वाहकांना ५.५ हजार रुपये असा तुटपुंजा पगार मिळतो. पगार बँक खात्यात जमा न करता शाळांच्या व्यवस्थापनाकडे दिला जातो. व्यवस्थापनाकडून कामगारांची सतावणूक केली जाते. त्यांच्याकडून इतर कामे करून घेतली जातात, असे या कामगार संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.

१ पगार वाढवला

दरम्यान, बालरथांसाठी शिक्षण खात्याकडून शाळांना वार्षिक ३ लाख ६६ हजार रुपये मिळत होते. ते आता ४ लाख १७ हजार केले आहेत. कामगारांना १० महिन्यांऐवजी ११ महिन्यांचा पगार मिळेल. अनुक्रमे १००० व ५०० रुपये पगारवाढ दिली आहे. वेळेवर पगार मिळेल. कामगारांच्या मागण्या काही प्रमाणात पूर्ण केल्या आहेत. कामगारांनी संप करू नये, असे आवाहन शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी केले आहे. 

संप मागे घेणार नाही

शाळा व्यवस्थापनासाठी बालरथांसाठी वार्षिक रक्कम वाढवली. त्याचा चालक- वाहकांना काहीच फायदा होणार नाही. याचा फायदा शाळांनाच होईल. आम्हाला व्यावस्थापनाकडून पैसे नकोत. थेट कामगारांच्या खात्यात पगार जमा करावा. तुटपुंजी पगारवाढ नको. शाळा व्यावस्थापन कामगारांची सतावणूक करत आहे. त्यावर शिक्षण खात्याने स्पष्टीकरण द्यावे. नोटीस जारी करुन आम्ही संप मागे घेणार नाही. कायदेशीर मार्गाने चर्चा करून मागण्या मान्य कराव्यात. -स्वाती केरकर, कामगार संघटनेच्या नेत्या

 

टॅग्स :goaगोवा