शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections: मनसेमुळे मुंबईत महाविकास आघाडी फुटीच्या उंबरठ्यावर, नेमकं कारण काय? 
2
शेख हसीना यांच्या खटल्याच्या निकालाआधी बांगलादेशात हिंसाचार, पोलिसांकडून आंदोलकांवर गोळीबार
3
पाकिस्तानात जाफर एक्सप्रेस पुन्हा टार्गेटवर; बॉम्बस्फोटाने रेल्वे ट्रॅक उद्ध्वस्त, अनर्थ टळला
4
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२५, या राशीसाठी धनलाभाच्या दृष्टीने शुभ दिवस, प्रवास संभवतात
5
कॅचच्या निर्णयावरून भारतीय खेळाडूंचा अंपायरशी वाद; पाकिस्तानकडून वैभव सूर्यवंशीच्या संघाचा पराभव
6
दिल्ली ब्लास्ट : रोहतकची डॉक्टर प्रियंका शर्मा अनंतनागमधून ताब्यात, कुटुंबीयांनी काय सांगितंल?
7
विशेष लेख: भीती, घाबरणे, घाबरवणे... आणि कधीही न घाबरणे !
8
IND A vs PAK A : भारत-पाक मॅचमध्ये Relay Catch वरुन वाद; नेमकं काय घडलं? चिटिंग झाली की...
9
ब्रेकिंग! मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईचा गॅस पुरवठा खंडित; पाईपलाईनचे मोठे नुकसान, घरगुती गॅस बंद, CNG स्टेशनवर तुटवडा
10
सैन्यभरतीसाठी गेलेल्या तरुणांच्या मोटरसायकलला उसाच्या ट्रकची धडक; दोघांचाही जागीच मृत्यू
11
भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज मॅच! वैभव सुर्यवंशीचा संघ ढेपाळला; एका मागोमाग एक १० विकेट, झालेत इतकेच रन्स...
12
मोठी बातमी! लाल किल्ला स्फोटाची जबाबदारी टीआरएफने स्वीकारली; 'पहलगाम' हल्ल्याशी जोडले स्फोटाचे धागेदोरे
13
दिल्ली ब्लास्ट प्रकरणात NIA ची मोठी कारवाई, उमरच्या जवळच्या सहकाऱ्याला अटक; याच्याच नावावर होती i-20 कार
14
'विशेष मतदार यादी सुधारणा' प्रक्रियेच्या कामाच्या ताणामुळे बीएलओ अधिकाऱ्याने आयुष्य संपविले; कर्मचारी वर्गात संताप
15
नितीश कुमार उद्या राजीनामा देणार! 'मिशन कॅबिनेट'ची तयारी पूर्ण; मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर मात्र...
16
तेजस्वी यांनी पराभवासाठी बहीण रोहिणीला ठरवलं जबाबदार; फेकली होती चप्पल? अशी आहे संपूर्ण इनसाइड स्टोरी!
17
पाकिस्तानच्या गोळीबार गमावला पाय; आता 'गौरी'ला मिळाले नवीन आयुष्य
18
दिल्ली ब्लास्टचे बांग्लादेश कनेक्शन उघड; मुर्शिदाबाद मार्गे भारतात आणली स्फोटके
19
युरोपने केलेली 'ही' मोठी चूक अमेरिकेला ३० वर्षांत गरीब करेल; जे पी मॉर्गनचा इशारा
20
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
Daily Top 2Weekly Top 5

'बालरथ' संपावर; शिक्षण खात्याकडून पगारवाढीसह काही मागण्या मान्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2023 15:24 IST

शिक्षण संचालनालयाने नोटीस जारी करुन बालरथ कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : युनायटेड बालरथ एम्प्लॉयी युनियनच्या अध्यक्षतेखाली राज्यातील सर्व बालरथ कामगार आपल्या विविध मागण्यांसाठी आज, सोमवारपासून संपावर जाणार आहेत. एकूण ४२० बालरथ बसेसमधील ८४० कामगार संपात सहभागी होणार आहेत. त्याचा फटका बालरथमधून शाळेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसणार आहे. त्यामुळे पालकांना आपल्या विद्यार्थ्यांना शाळेत पोहोचविण्याची वेळ येऊ शकते.

दरम्यान, शिक्षण संचालनालयाने नोटीस जारी करुन बालरथ कामगारांच्या काही मागण्या मान्य केल्या आहेत. बालरथ चालकांना प्रती महिना ११ हजार दिला जात होता तो आता १२ हजार केला आहे तसेच वाहकांना ५.५ हजार रुपये मिळत होते ते आता ६ हजार करण्यात आले आहे. संप करू नये असे आवाहन शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी केले आहे.

बालरथ कामगार संघटनेने पुकारलेल्या संपाची नोटीस शिक्षण खाते व सर्व शाळांना दिली आहे. आम्ही कुठल्याच कायद्याचे उल्लंघन केलेले नाही. विद्यार्थ्यांना त्रास देण्याचा आमचा हेतू नाही. मागण्यासांठी हा संप पुकारला आहे. याविषयी आम्ही सर्वांना पूर्वसूचनाही दिली आहे, असे कामगारांचे म्हणणे आहे.

मिळतो तुटपुंजा पगार 

राज्यातील सरकारी अनुदानित शाळांमध्ये ४२० बालरथ बसेस कार्यरत आहेत. चालक आणि वाहक मिळून ८४० कामगार आहेत. सर्वांचा संपात सहभाग आहे. यापूर्वी अनेकदा कामगारांनी विविध मागण्यासाठी संप पुकारला. पण, सरकारने त्यांना फक्त आश्वासने देऊन संप मागे घेण्यास भाग पाडले. बस चालकांना दरमहा फक्त ११ हजार रुपये, वाहकांना ५.५ हजार रुपये असा तुटपुंजा पगार मिळतो. पगार बँक खात्यात जमा न करता शाळांच्या व्यवस्थापनाकडे दिला जातो. व्यवस्थापनाकडून कामगारांची सतावणूक केली जाते. त्यांच्याकडून इतर कामे करून घेतली जातात, असे या कामगार संघटनेच्या नेत्या स्वाती केरकर यांनी सांगितले.

१ पगार वाढवला

दरम्यान, बालरथांसाठी शिक्षण खात्याकडून शाळांना वार्षिक ३ लाख ६६ हजार रुपये मिळत होते. ते आता ४ लाख १७ हजार केले आहेत. कामगारांना १० महिन्यांऐवजी ११ महिन्यांचा पगार मिळेल. अनुक्रमे १००० व ५०० रुपये पगारवाढ दिली आहे. वेळेवर पगार मिळेल. कामगारांच्या मागण्या काही प्रमाणात पूर्ण केल्या आहेत. कामगारांनी संप करू नये, असे आवाहन शिक्षण संचालक शैलेद्र झिंगडे यांनी केले आहे. 

संप मागे घेणार नाही

शाळा व्यवस्थापनासाठी बालरथांसाठी वार्षिक रक्कम वाढवली. त्याचा चालक- वाहकांना काहीच फायदा होणार नाही. याचा फायदा शाळांनाच होईल. आम्हाला व्यावस्थापनाकडून पैसे नकोत. थेट कामगारांच्या खात्यात पगार जमा करावा. तुटपुंजी पगारवाढ नको. शाळा व्यावस्थापन कामगारांची सतावणूक करत आहे. त्यावर शिक्षण खात्याने स्पष्टीकरण द्यावे. नोटीस जारी करुन आम्ही संप मागे घेणार नाही. कायदेशीर मार्गाने चर्चा करून मागण्या मान्य कराव्यात. -स्वाती केरकर, कामगार संघटनेच्या नेत्या

 

टॅग्स :goaगोवा