शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
2
MAYDAY, MAYDAY, MAYDAY…, उड्डाण करताच काहीच क्षणात वैमानिकाने दिला असा सिग्नल, त्यानंतर...  
3
Ahmedabad Plane Crash: टेक ऑफ करताच कोसळले! आकाशात आगीचे लोट; अहमदाबाद विमान अपघाताचे फोटो आले समोर
4
आता 'या' देशावर तुटून पडण्याच्या तयारीत इस्रायल! अमेरिकेनं दूतावासही केले खाली; का वाढली एवढी भीती?
5
"सगळं तिनेच केलं, मी नकार दिलेला अन्..."; पोलिसांनी मुसक्या आवळताच सोनमच्या बॉयफ्रेंडची पलटी! 
6
Sankashti Chaturthi 2025: संकष्टीला उपासाबरोबरच 'ही' उपासना कराल, तर होईल अधिक लाभ!
7
चांदीचा दर १ लाख ९ हजारांवर, सोनंही लाखांच्या पार; पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
Ahmedabad Plane Crash Live: भीषण! अहमदाबादमध्ये मोठी दुर्घटना, Air India चं विमान कोसळलं, होते २४२ प्रवासी
9
Ahmedabad Plane Crash: विमानाची राखरांगोळी, इमारती कोसळल्या, वाहनांचे सांगाडे; अहमदाबाद दुर्घटनेची भयावह दृश्यं...
10
Air India Plane Crash Video: लंडनच्या दिशेने झेपावले अन् काही क्षणातच कोसळले; असा झाला अपघात
11
Ahmedabad Plane Crash : 242 प्रवासी, 1:17 ला टेकऑफ अन् 1:20 ला क्रॅश...विमान अपघाताचे ताजे अपडेट
12
एअर इंडिया विमान अपघाताने टाटा ग्रुपला मोठा धक्का! 'या' शेअर्समध्ये झाली सर्वाधिक घसरण!
13
Ahmedabad Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातानंतर मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल यांनी दिले 'हे' महत्त्वाचे निर्देश! म्हणाले... 
14
Air India Plane Crash: गुजरातमध्ये विमान कोसळलं, जीवितहानीची शक्यता; देशातील ५ मोठे विमान अपघात कोणते?
15
"...तोपर्यंत चहा उकळत राहील"; हुंड्यासाठी छळाचा आरोप, तरुणाने सासरीच सुरू केली टपरी
16
Plane Crash: अहमदाबादमध्ये प्रवासी विमानाच्या अपघातानंतर एअर इंडियाचे ट्विट, दिली महत्त्वाची माहिती
17
Video: आकाशात धूरांचे लोट, अहमदाबाद विमान अपघाताचा व्हिडीओ आला समोर
18
Sankashti Chaturthi 2025: ज्येष्ठ महिन्यातील संकष्ट चतुर्थी, 'या' ९ राशींवर होणार बाप्पाचा कृपावर्षाव!
19
धक्कादायक! आधी दारू पाजली, मग गळा आवळला; प्रियकर आणि पतीच्या मदतीने जुन्या बॉयफ्रेंडचा काटा काढला!
20
'मंत्र्यांना भरसभांमध्ये तुडवल्याशिवाय गप्प बसू नका', राजू शेट्टींचे लोकांना आवाहन, महायुतीवर का भडकले?

विधानसभा अधिवेशन २ दिवसांचे; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:11 IST

अत्यंत अल्पकाळाच्या या अधिवेशनावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे केवळ दोन दिवसांचे अधिवेशन दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आले आहे. अत्यंत अल्पकाळाच्या या अधिवेशनावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

६ रोजी राज्यपालांचे अभिभाषण होईल तर ७ रोजी प्रश्नोत्तराचा तास व खासगी कामकाज असेल. केवळ दोनच दिवसात अधिवेशन आटोपणार आहे. राज्यात नोकरीकांड, कायदा सुव्यवस्था तसेच इतर प्रश्न गाजत असताना अल्पकाळाचे अधिवेशन बोलावून सरकारने पलायनवादी वृत्ती आरंभली असल्याची विरोधकांनी केली आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, नवीन वर्षात सुरुवातीलाच लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ही लोकशाहीची हत्याच आहे. पहिला दिवस राज्यपालाच्या अभिभाषणानेच संपणार आहे. जनतेची केलेली लूट, माफ न करता येण्याजोग्या केलेल्या अनेक मोठ्या चुका, जमीन घोटाळे, नोकरीकांड गाजत आहे. सरकारचे हे पळपुटे धोरण असून याचा मी निषेध करत असल्याचेही सरदेसाई म्हणाले.

लोकशाहीची थट्टा : युरी 

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव संतप्त सुरात प्रतिक्रिया देताना म्हणाले की, लोकशाहीची ही निव्वळ थट्टा होय. विरोधी आमदारांना सामोरे जाण्यास सरकार घाबरते व त्यामुळेच केवळ दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे. विरोधी आमदारांच्या हक्कांवर सरकारने गदा आणली आहे. मी या प्रकाराचा निषेध करतो.

वेंझी व्हिएगस म्हणाले, लोकांच्या समस्या आम्हाला अधिवेशनात मांडायच्या आहेत. पण सरकार हे अधिवेशन फक्त दोन दिवस घेऊन गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता सर्व मुख्य सचिवांपासून सर्व खात्यांच्या सचिवांनी हे अधिवेशन वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. जर हे अधिकारी असे करण्यात यशस्वी झाले नाही तर आम्ही त्यांची तक्रार केंद्र सरकारकडे करू, असेही ते म्हणाले.

..अन्यथा आयएएस अधिकाऱ्यांची तक्रार करू : आपचा इशारा

भाजप सरकार फक्त दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन ज्वलंत विषय दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता आयएएस अधिकाऱ्यांनी अधिवेशन वाढविण्याची जबाबदार घ्यावी, अन्यथा या सर्व आयएएस अधिकाऱ्यांची आम्ही केंद्र सरकाकडे तक्रार करणार आहोत, असा इशारा आपचे आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगस यांनी दिला. गुरुवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आपचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकरही उपस्थित होते. 

अॅड. अमित पालेकर म्हणाले, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सरकारी खात्यात काय सुरू आहे हे पाहिले जात नाही. राज्यात पोलिस, वाहतूक, सार्वजनिक बांधकाम खात्यासह विविध खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. आज पोलिस खात्यात सर्वत्र भ्रष्टाचार सुरू असून त्याची कुणीच दखल घेत नाही

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारvidhan sabhaविधानसभा