शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
6
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
7
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
8
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
9
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
10
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
11
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
12
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
13
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
14
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
15
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
16
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
17
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
18
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
19
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
20
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...

विधानसभा अधिवेशन २ दिवसांचे; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:11 IST

अत्यंत अल्पकाळाच्या या अधिवेशनावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे केवळ दोन दिवसांचे अधिवेशन दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आले आहे. अत्यंत अल्पकाळाच्या या अधिवेशनावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

६ रोजी राज्यपालांचे अभिभाषण होईल तर ७ रोजी प्रश्नोत्तराचा तास व खासगी कामकाज असेल. केवळ दोनच दिवसात अधिवेशन आटोपणार आहे. राज्यात नोकरीकांड, कायदा सुव्यवस्था तसेच इतर प्रश्न गाजत असताना अल्पकाळाचे अधिवेशन बोलावून सरकारने पलायनवादी वृत्ती आरंभली असल्याची विरोधकांनी केली आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, नवीन वर्षात सुरुवातीलाच लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ही लोकशाहीची हत्याच आहे. पहिला दिवस राज्यपालाच्या अभिभाषणानेच संपणार आहे. जनतेची केलेली लूट, माफ न करता येण्याजोग्या केलेल्या अनेक मोठ्या चुका, जमीन घोटाळे, नोकरीकांड गाजत आहे. सरकारचे हे पळपुटे धोरण असून याचा मी निषेध करत असल्याचेही सरदेसाई म्हणाले.

लोकशाहीची थट्टा : युरी 

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव संतप्त सुरात प्रतिक्रिया देताना म्हणाले की, लोकशाहीची ही निव्वळ थट्टा होय. विरोधी आमदारांना सामोरे जाण्यास सरकार घाबरते व त्यामुळेच केवळ दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे. विरोधी आमदारांच्या हक्कांवर सरकारने गदा आणली आहे. मी या प्रकाराचा निषेध करतो.

वेंझी व्हिएगस म्हणाले, लोकांच्या समस्या आम्हाला अधिवेशनात मांडायच्या आहेत. पण सरकार हे अधिवेशन फक्त दोन दिवस घेऊन गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता सर्व मुख्य सचिवांपासून सर्व खात्यांच्या सचिवांनी हे अधिवेशन वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. जर हे अधिकारी असे करण्यात यशस्वी झाले नाही तर आम्ही त्यांची तक्रार केंद्र सरकारकडे करू, असेही ते म्हणाले.

..अन्यथा आयएएस अधिकाऱ्यांची तक्रार करू : आपचा इशारा

भाजप सरकार फक्त दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन ज्वलंत विषय दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता आयएएस अधिकाऱ्यांनी अधिवेशन वाढविण्याची जबाबदार घ्यावी, अन्यथा या सर्व आयएएस अधिकाऱ्यांची आम्ही केंद्र सरकाकडे तक्रार करणार आहोत, असा इशारा आपचे आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगस यांनी दिला. गुरुवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आपचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकरही उपस्थित होते. 

अॅड. अमित पालेकर म्हणाले, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सरकारी खात्यात काय सुरू आहे हे पाहिले जात नाही. राज्यात पोलिस, वाहतूक, सार्वजनिक बांधकाम खात्यासह विविध खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. आज पोलिस खात्यात सर्वत्र भ्रष्टाचार सुरू असून त्याची कुणीच दखल घेत नाही

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारvidhan sabhaविधानसभा