शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा अधिवेशन २ दिवसांचे; विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2025 08:11 IST

अत्यंत अल्पकाळाच्या या अधिवेशनावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : विधानसभेचे केवळ दोन दिवसांचे अधिवेशन दि. ६ व ७ फेब्रुवारी रोजी बोलावण्यात आले आहे. अत्यंत अल्पकाळाच्या या अधिवेशनावरून विरोधी पक्षाच्या आमदारांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे.

६ रोजी राज्यपालांचे अभिभाषण होईल तर ७ रोजी प्रश्नोत्तराचा तास व खासगी कामकाज असेल. केवळ दोनच दिवसात अधिवेशन आटोपणार आहे. राज्यात नोकरीकांड, कायदा सुव्यवस्था तसेच इतर प्रश्न गाजत असताना अल्पकाळाचे अधिवेशन बोलावून सरकारने पलायनवादी वृत्ती आरंभली असल्याची विरोधकांनी केली आहे.

गोवा फॉरवर्डचे आमदार विजय सरदेसाई म्हणाले की, नवीन वर्षात सुरुवातीलाच लोकशाहीचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. ही लोकशाहीची हत्याच आहे. पहिला दिवस राज्यपालाच्या अभिभाषणानेच संपणार आहे. जनतेची केलेली लूट, माफ न करता येण्याजोग्या केलेल्या अनेक मोठ्या चुका, जमीन घोटाळे, नोकरीकांड गाजत आहे. सरकारचे हे पळपुटे धोरण असून याचा मी निषेध करत असल्याचेही सरदेसाई म्हणाले.

लोकशाहीची थट्टा : युरी 

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव संतप्त सुरात प्रतिक्रिया देताना म्हणाले की, लोकशाहीची ही निव्वळ थट्टा होय. विरोधी आमदारांना सामोरे जाण्यास सरकार घाबरते व त्यामुळेच केवळ दोन दिवसांचे अधिवेशन ठेवले आहे. विरोधी आमदारांच्या हक्कांवर सरकारने गदा आणली आहे. मी या प्रकाराचा निषेध करतो.

वेंझी व्हिएगस म्हणाले, लोकांच्या समस्या आम्हाला अधिवेशनात मांडायच्या आहेत. पण सरकार हे अधिवेशन फक्त दोन दिवस घेऊन गुंडाळण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता सर्व मुख्य सचिवांपासून सर्व खात्यांच्या सचिवांनी हे अधिवेशन वाढविण्यासाठी पुढाकार घ्यावा, यासाठी आम्ही सर्व अधिकाऱ्यांना निवेदन देणार आहोत. जर हे अधिकारी असे करण्यात यशस्वी झाले नाही तर आम्ही त्यांची तक्रार केंद्र सरकारकडे करू, असेही ते म्हणाले.

..अन्यथा आयएएस अधिकाऱ्यांची तक्रार करू : आपचा इशारा

भाजप सरकार फक्त दोन दिवसांचे अधिवेशन घेऊन ज्वलंत विषय दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता आयएएस अधिकाऱ्यांनी अधिवेशन वाढविण्याची जबाबदार घ्यावी, अन्यथा या सर्व आयएएस अधिकाऱ्यांची आम्ही केंद्र सरकाकडे तक्रार करणार आहोत, असा इशारा आपचे आमदार कॅप्टन वेंझी व्हिएगस यांनी दिला. गुरुवारी पणजीत पत्रकार परिषदेत ते बोलत होते. त्यांच्यासोबत आपचे प्रदेशाध्यक्ष अॅड. अमित पालेकरही उपस्थित होते. 

अॅड. अमित पालेकर म्हणाले, प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सरकारी खात्यात काय सुरू आहे हे पाहिले जात नाही. राज्यात पोलिस, वाहतूक, सार्वजनिक बांधकाम खात्यासह विविध खात्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार सुरू आहे. आज पोलिस खात्यात सर्वत्र भ्रष्टाचार सुरू असून त्याची कुणीच दखल घेत नाही

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकारvidhan sabhaविधानसभा