शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतासारख्या कणखर सहकाऱ्यासोबतचे संबंध खराब करू नका"; ट्रम्प यांना निकी हेली यांनी सुनावले
2
खेड प्रेम प्रकरण: "मठाच्या नावाखाली अनेक..."; प्राजक्ताच्या वडिलांचे विश्वनाथ गोसावीवर गंभीर आरोप
3
Video: "आता मी हिंदीत बोलू????"; मराठीत बोलत असतानाच काजोल भडकली, बघा काय घडलं?
4
Palghar Video : कामगारांनी कार अडवली, संतापलेल्या मालकिणीने थेट अंगावरच घातली; प्रकरण का चिघळलं? 
5
हीरक महोत्सवी महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान, वाचा विजेत्यांची संपूर्ण यादी
6
खूशखबर... नागपूर-पुणे वंदे भारत एक्स्प्रेसचा लवकरच शुभारंभ; PM मोदी दाखविणार हिरवा झेंडा 
7
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
8
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
9
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
10
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
11
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
12
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
13
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
14
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
15
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
16
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
17
Dharali floods: ताशी 43 किमी वेग... 1230 फूट उंचावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
18
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
19
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
20
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?

खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह झाडे करपली

By आप्पा बुवा | Updated: May 14, 2023 18:01 IST

अप्पा बुवा / फोंडा  लोकमत न्यूज नेटवर्क  फोंडा    गावणे -बांदोडा परिसरात खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह माड, पोफळी, ...

अप्पा बुवा / फोंडा लोकमत न्यूज नेटवर्क फोंडा   गावणे -बांदोडा परिसरात खारे पाणी शेतात घुसल्याने शेतीसह माड, पोफळी, फणस, मिरी व अन्य झाडे करपून गेली आहेत. सदर नैसर्गिक आपत्तीमुळे सुमारे २०-२५ शेतकऱ्याचे मोठे नुकसान झाले आहे. अंदाजे ६-७ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. गेल्या ६-७ महिन्यापासून खारे पाणी शेतात घुसण्याचा प्रकार घडत असून अजून पर्यंत तरी सरकारतर्फे तोडगा काढण्याचा प्रयत्न झालेला नाही. अशी कैफियत शेतकऱ्यांनी मांडली आहे.बांदोडा व मडकई येथील सीमारेषेवर असलेल्या मानसीचे दरवाजे बंद केल्यास खारे पाणी घुसण्याचा प्रकार त्वरित बंद होवू शकतो. त्यासाठी सरकारने पावसाळ्यापूर्वी मानसीचे दरवाजे बंद करून दिलासा देण्याची मागणी शेतकरी वर्ग करीत आहे.    गावणे येथील शेतात गेल्या सहा महिन्यापूर्वी मानसीचे दरवाजे खुले केल्याने खारे पाणी घुसून बागायती तसेच शेती नष्ट झाली आहे. परिसरातील सुमारे ३५० पेक्षा अधिक माड व पोफळीची झाडे करपून मोठे नुकसान झाले असल्याने शेतकरी सध्या सरकारच्या सहकार्याची अपेक्षा बाळगत आहे.एका महिन्यापूर्वी स्थानिक सरपंचांना माहिती दिल्यानंतर पाहणी करून विविध खात्याला निवेदने पाठविण्यात आली होती. परंतु अजून पर्यंत सरकारने शेतकऱ्यांचा प्रश्न गांभीर्याने घेतला नसल्याने शेतकरी वर्ग नाराजी व्यक्त करीत आहे. खाऱ्या पाण्याचा फटका वेलिंग परिसरातील शेतकऱ्यांना सुद्धा बसला असून नुकसानीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त होत आहे.     यासंबधी अधिक माहिती देताना शशिकांत गावडे म्हणाले कि  गेल्या ६ -७ महिन्यापासून खारे पाणी पूर्णपणे शेतात घुसून परिसरातील माड, पोफळीची झाडे व अन्य झाडे पूर्णपणे करपून गेली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वी मानसीचे दरवाजे बंद न केल्यास संपूर्ण शेती कायमची सोडण्याची वेळ शेतकऱ्यांवर येणार येऊ शकते. सरकारने यासंबधी गांभीर्याने लक्ष देवून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.   म्हाद्दू नाईक म्हणतात 'खाऱ्या पाण्यामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले असून सरकारने वेळीच दखल घेतली नाही तर भविष्यात इथला शेती व्यवसाय इतिहास जमा होईल.पूर्वजांनी लागवड केलेली बागायती गेल्या ६ महिन्यात खाऱ्या पाण्यामुळे नष्ट होण्याचा मार्गावर आहे. बागायती दररोज काळजी घेण्यात येत होती. परंतु खाऱ्या पाण्यामुळे माड व पोफळीची झाडे करपत असल्याचे पाहून दुःख वाटत आहे. सरकारने यासंदर्भात लक्ष देवून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे असल्याचे जुजे सिल्वेरा यांनी सांगितले.   बांदोडा पंचायतीचे सरपंच सर्वानंद कूर्पासकर यांनी खारे पाणी शेतात घुसल्यांची माहिती मिळाल्यावर स्थानिक पंच व्यंकटेश नाईक सह  स्वतः जाऊन पाहणी केली होती. ते म्हणतात की यासंबधी विविध खात्याना निवेदने देवून आवश्यक तोडगा काढण्याची मागणी पंचायततर्फे करण्यात आली होती. त्यानुसार येत्या आठवड्यात संयुक्तपणे पाहणी करण्यात येणार आहे.