शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

... तर तब्बल १६ हजार कुटुंबांना हलवावे लागेल; व्याघ्र प्रकल्पाने जनजीवनावर होऊ शकतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 14:22 IST

एका सत्तरी तालुक्यातून सोळा हजार कुटुंबांना अन्यत्र हलवावे लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरीः व्याघ्र प्रकल्पाशी निगडीत अधिसूचना सरकारने जारी केली व त्या अधिसूचनेनुसार पूर्ण म्हादई अभयारण्य हे व्याघ्र राखीव क्षेत्रात रुपांतरित झाले तर एका सत्तरी तालुक्यातून सोळा हजार कुटुंबांना अन्यत्र हलवावे लागेल. त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे लागेल, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

म्हादईच्या क्षेत्रात सध्या सोळा हजार कुटुंबे आहेत. एक वाघ तीनशे किलोमीटर क्षेत्रात फिरतो असे अपेक्षित धरले जाते. गोव्याहून खोतीगावपर्यंत एक कोरिडोअर अपेक्षित धरले तर ८ विधानसभा मतदारसंघांचा संबंध येईल. एका म्हादई अभयारण्यातच व्याघ्र प्रकल्प केला तर १६ हजार कुटुंबे म्हणजेच ७० हजार लोकांना अन्यत्र हलवावे लागेल. व्याघ्र क्षेत्रात राहू शकत नाहीत, असे एक अभ्यासक आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर म्हणाले.

लोक अडचणीत येतील: दिव्या राणे

म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाले, तर त्या परिसरात राहणाऱ्या १५ हजार लोकांना त्याचा फटका बसेल, अशी चिंता पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केली.

म्हादई वाचवण्यासाठी म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर होणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र, म्हादई वाचवण्यासाठी हाच एकमेव उपाय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राणे म्हणाल्या की, म्हादई अभयारण्य परिसर हा खोतीगावपर्यंत व्यापलेला आहे. या परिसरात हजारो संख्येने लोक राहात असून, त्यांची संख्या १५ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे जर म्हादई अभयारण्य परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाले तर त्याचा फटका या १५ हजार लोकांना बसण्याची भीती आहे. अशातच त्या लोकांचे पुनर्वसन करणे हे आव्हान आहे. एकवेळ त्यांचे पुनर्वसन केले जाईलही, मात्र त्यांच्या उपजीविकेच्या साधनाचे काय करणार? हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. उच्च न्यायालयाने त्यावर निवाडाही दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री तसेच वनमंत्री यावर निर्णय घेतील. लोकांना फटका बसू नये यासाठी म्हादई अभयारण्य परिसर हा व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर होऊ नये, असे वाटते असेही त्या म्हणाल्या.

सत्तरीतील जंगल हे सह्याद्री पर्वतरांगांमधील महत्वपूर्ण घटक आहे. गोवा सीमेवर असलेल्या डोंगराळ जंगलामुळेच समुद्राच्या दिशेने येणारे मोसमी वारे अडवले जाते व पाऊस पडतो. हे जंगल संपले तर दुष्काळ निर्माण होणार आहे म्हणून विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश होत असेल तर त्याला विकास नावाचा विनाश म्हणावा लागेल. शेवटी माणूस पैसे खाऊ शकणार नाही. आज पैसे असलेले लोक शुद्ध हवा, पाणी व अन्नधान्य मिळण्याची अपेक्षा करतात. आमचे हे नैसर्गिक धन सरकारने हिसकाऊन आम्हाला अपंग करू नये. - देवेंद्र तवडकर, आमोणे-पैंगीण.

 

टॅग्स :goaगोवाTigerवाघ