शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला 'वर्ल्ड कप' पराभवानंतर कर्णधाराकडून खेळाडूंना मारहाण; वरिष्ठ खेळाडूच्या आरोपाने क्रिकेटविश्व हादरले
2
देव दिवाळीच्या मुहुर्तावर सोनं पुन्हा स्वस्त...! पटापट चेक करा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
3
ढाका पोहोचण्याआधीच जाकिर नाईकला मोठा 'झटका'! भारताच्या दबावापुढे बांगलादेश झुकला?
4
राहुल गांधींनी ज्या ब्राझिलियन मॉडेलचा उल्लेख केला तो फोटोग्राफर निघाला; पहा मॅथ्यूज फरेरो नेमके कोण? 
5
राहुल गांधीचा हायड्रोजन बॉम्ब! 'एका महिलेचे 223 वेळा नाव; हरियाणात 25 लाख मतांची चोरी'
6
Health Tips: शरीरावर असलेले लाल चामखीळ कशाचे लक्षण? त्यात काही काळजीचे कारण असते की... 
7
Plane Crash: उड्डाणानंतर काही मिनिटांतच विमान कोसळलं; भयानक घटना कॅमेऱ्यात कैद!
8
१ फोटो, १ मतदारसंघ अन् १०० मते...; राहुल गांधींच्या 'हायड्रोजन बॉम्ब'नं निवडणूक आयोगाची उडाली झोप
9
UPI की Net Banking? पर्सनल लोनचा EMI भरण्यासाठी सर्वात प्रभावी पर्याय कोणता? जाणून घ्या फायदे आणि तोटे
10
सुंदर पिचाईंची मोठी घोषणा; Googleची अंतराळात झेप, सौर उर्जेवर चालणाऱ्या AI डेटा सेंटरची यशस्वी चाचणी
11
न्यूयॉर्कचे पहिले मुस्लीम मेअर बनलेल्या जोहरान ममदानींचं बॉलिवूडशी खास नातं, आई प्रसिद्ध दिग्दर्शिका
12
Rahul Gandhi : कधी सीमा, कधी स्वीटी, कधी सरस्वती... हरियाणात एका तरुणीची २२ मतं, राहुल गांधींचा मोठा दावा
13
“मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर अनेकांची वक्रदृष्टी, पंचांग काढून राहु-केतु...”; ठाकरेंचा टोला
14
थंडीच्या दिवसांत घरातील फ्रीजचं तापमान नेमकं किती ठेवावं? एका चुकीमुळे भरमसाठ वाढू शकतं बिल!
15
ट्रम्प, थोडा आवाज वाढवा, ज्या न्यूयॉर्क शहराने तुम्हाला जन्माला घातले...; ममदानींचा राष्ट्राध्यक्षांना थेट इशारा
16
Devendra Fadnavis: "विकास सोडून फक्त विधानेच!" उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावर फडणवीसांची तिखट प्रतिक्रिया
17
BSNL Recharge Plan: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीचा रिचार्ज प्लान आहेत बेस्ट; मिळणार जबरदस्त बेनिफिट्स, जाणून घ्या
18
Bilaspur Train Accident : सीटमध्ये पाय अडकलेला, डोळ्यांसमोर मृतदेहांचा खच...; बिलासपूर अपघाताचं भीषण दृश्य!
19
शरद पवारांची यादी मान्य! कोकणवासीयांना मोठा दिलासा; ‘या’ २ ठिकाणी ८ सुपरफास्ट ट्रेनना थांबा
20
एसटी चालक, वाहकाचे प्रसंगावधान; एमएसईबीच्या माजी अधिकाऱ्याची तब्येत बिघडली, वेगाने नातेपुते गाठत वाचविले...

... तर तब्बल १६ हजार कुटुंबांना हलवावे लागेल; व्याघ्र प्रकल्पाने जनजीवनावर होऊ शकतो परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2023 14:22 IST

एका सत्तरी तालुक्यातून सोळा हजार कुटुंबांना अन्यत्र हलवावे लागेल.

लोकमत न्यूज नेटवर्क, सत्तरीः व्याघ्र प्रकल्पाशी निगडीत अधिसूचना सरकारने जारी केली व त्या अधिसूचनेनुसार पूर्ण म्हादई अभयारण्य हे व्याघ्र राखीव क्षेत्रात रुपांतरित झाले तर एका सत्तरी तालुक्यातून सोळा हजार कुटुंबांना अन्यत्र हलवावे लागेल. त्यांचे अन्यत्र पुनर्वसन करावे लागेल, असे काही अभ्यासकांचे म्हणणे आहे.

म्हादईच्या क्षेत्रात सध्या सोळा हजार कुटुंबे आहेत. एक वाघ तीनशे किलोमीटर क्षेत्रात फिरतो असे अपेक्षित धरले जाते. गोव्याहून खोतीगावपर्यंत एक कोरिडोअर अपेक्षित धरले तर ८ विधानसभा मतदारसंघांचा संबंध येईल. एका म्हादई अभयारण्यातच व्याघ्र प्रकल्प केला तर १६ हजार कुटुंबे म्हणजेच ७० हजार लोकांना अन्यत्र हलवावे लागेल. व्याघ्र क्षेत्रात राहू शकत नाहीत, असे एक अभ्यासक आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर म्हणाले.

लोक अडचणीत येतील: दिव्या राणे

म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाले, तर त्या परिसरात राहणाऱ्या १५ हजार लोकांना त्याचा फटका बसेल, अशी चिंता पर्येच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी व्यक्त केली.

म्हादई वाचवण्यासाठी म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर होणे आवश्यक असल्याचे सामाजिक कार्यकर्ते म्हणत आहेत. मात्र, म्हादई वाचवण्यासाठी हाच एकमेव उपाय नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. राणे म्हणाल्या की, म्हादई अभयारण्य परिसर हा खोतीगावपर्यंत व्यापलेला आहे. या परिसरात हजारो संख्येने लोक राहात असून, त्यांची संख्या १५ हजारांच्या आसपास आहे. त्यामुळे जर म्हादई अभयारण्य परिसर व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर झाले तर त्याचा फटका या १५ हजार लोकांना बसण्याची भीती आहे. अशातच त्या लोकांचे पुनर्वसन करणे हे आव्हान आहे. एकवेळ त्यांचे पुनर्वसन केले जाईलही, मात्र त्यांच्या उपजीविकेच्या साधनाचे काय करणार? हा मोठा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले.

म्हादई अभयारण्य परिसर हे व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर व्हावे, यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी प्रयत्न केले. उच्च न्यायालयाने त्यावर निवाडाही दिला. त्यामुळे आता मुख्यमंत्री तसेच वनमंत्री यावर निर्णय घेतील. लोकांना फटका बसू नये यासाठी म्हादई अभयारण्य परिसर हा व्याघ्र संरक्षित क्षेत्र म्हणून जाहीर होऊ नये, असे वाटते असेही त्या म्हणाल्या.

सत्तरीतील जंगल हे सह्याद्री पर्वतरांगांमधील महत्वपूर्ण घटक आहे. गोवा सीमेवर असलेल्या डोंगराळ जंगलामुळेच समुद्राच्या दिशेने येणारे मोसमी वारे अडवले जाते व पाऊस पडतो. हे जंगल संपले तर दुष्काळ निर्माण होणार आहे म्हणून विकासाच्या नावाखाली पर्यावरणाचा नाश होत असेल तर त्याला विकास नावाचा विनाश म्हणावा लागेल. शेवटी माणूस पैसे खाऊ शकणार नाही. आज पैसे असलेले लोक शुद्ध हवा, पाणी व अन्नधान्य मिळण्याची अपेक्षा करतात. आमचे हे नैसर्गिक धन सरकारने हिसकाऊन आम्हाला अपंग करू नये. - देवेंद्र तवडकर, आमोणे-पैंगीण.

 

टॅग्स :goaगोवाTigerवाघ