शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 20:33 IST

विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत.

म्हापसा : विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे उपसभापती मायकल लोबो यांनी म्हटले. तसेच, आगामी निवडणुकीत मतदार नेत्यांना आपली जागा दाखवून देताना राज्यात बदल घडवून आणतील, असा दावाही लोबो यांनी केली आहे. 

कळंगुट येथे एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी लोबो बोलत होते. सध्या ज्या गतीने राजकीय हालचाली सुरू आहेत. प्रशासनातील कामकाज सुरू आहे ते पाहता राजकारणात त तसेच लोकात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकांना गृहीत धरुन चालले जात आहे. त्यामुळे विद्यमान परिस्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणाला होवू शकतात, असा दावा लोबो यांनी केला आहे. राज्याच्या राजकीय परिस्थितीला लोक कंटाळले आहेत. मतदार शहाणा झाला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदार राज्यात बदल घडवून आणणार असल्याचे ते म्हणाले. 

मतदार लोकप्रतिनिधींना आपली कामे करुन घेण्यासाठी निवडत असतात. त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही बऱ्याच मोठ्या असतात. अशा मतदारांच्या अपेक्षा भंग करुन स्वत:च्या स्वार्थापायी दुसºया पक्षात प्रवेश करणे व लोकांना गृहीत धरुन चालणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्या दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी हे विधान केले आहे. भाजपात आलेल्या दोन आमदारां व्यतिरिक्त आणखीन दोन आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून तसा निर्णय त्या दोन आमदारांनी घेतल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील व लोकांच्या अपेक्षेचा भंग होणार असल्याचे लोबो म्हणाले. राज्यातील सरकार यशस्वीपणे चालवायचे असल्यास सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे; पण सध्याचा विरोधी पक्ष आपली भूमिका सक्षमपणे पार पाडण्यास असमर्थ ठरला आहे. विरोधकांकडून विषयांची मांडणी योग्य प्रकारे केली जात नाही. त्यांनी योग्य भूमिका मांडली असती, सरकारातील उणीवांवर बोट ठेवले असते तर सरकार सुद्धा चांगल्या प्रकारे चालले असते असेही लोबो यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारा संबंधी लोबो यांना विचारले असता त्यांनी त्यावर स्वत: निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले; पण सरकार चांगल्या प्रकारे चालण्यासाठी लोकांना चांगले प्रशासन उपलब्ध करुन देण्यासाठी जबाबदार व्यक्तीची गरज गोव्याला असल्याची पुष्ठी त्यांनी पुढे जोडली. सरकारातील जेष्ठ मंत्री सुदीन ढवळीकर ही जबाबदार व्यक्ती असू शकते का असा प्रश्न त्यांना केला असता त्यावर पक्ष पातळीवर काय ते ठरवले जावू शकते असेही लोबो म्हणाले. काही दिवसापूर्वी अमेरिकेत उपचार घेवून गोव्यात आलेले माजी मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी त्यांना वगळल्याबद्दल काढलेल्या नाराजीच्या सुरावर विचारले असता, त्यांना ज्याप्रकारे वगळण्यात आले त्यावर डिसोझा यांनी नाराजी व्यक्त करणे योग्य असल्याचे लोबो म्हणाले. ती त्यांची वैयक्तीक नाराजी असून एकेकाळी पक्षाला राज्यात उभारी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान डिसोझा यांनी दिल्याचेही लोबो यांनी सांगितले.   

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा