शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
3
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
4
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
5
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
6
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
7
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
8
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
9
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
10
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
11
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
12
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
13
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
14
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
15
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
16
मुंबई: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
17
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
18
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
19
मनसेकडून प्रतिसभागृह, आदित्य ठाकरेंना निमंत्रण; भाजपा नाराज, सहभागी होण्यास नकार
20
काळजी घ्या! कारमध्ये ठेवलेल्या बाटलीमुळे आग लागू शकते; कारणे जाणून घ्या

कुठल्याही क्षणी विधानसभा निवडणूक, उपसभापतींनी केले सूचित

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2018 20:33 IST

विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत.

म्हापसा : विद्यमान परिस्थितीत मुख्यमंत्रीपदी कायम रहावे किंवा नाही यावर योग्य तो निर्णय घेण्यास मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर सक्षम असून त्यांच्यावर कोणीच निर्णय लादू शकत नाही. पण, सध्याच्या राज्यातील राजकीय तसेच प्रशासकीय परिस्थितीवर लोक बरेच नाराज आहेत. लोकांमध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे. त्यामुळे पुढील काळात कधीही निवडणुका होण्याची शक्यता आहे, असे उपसभापती मायकल लोबो यांनी म्हटले. तसेच, आगामी निवडणुकीत मतदार नेत्यांना आपली जागा दाखवून देताना राज्यात बदल घडवून आणतील, असा दावाही लोबो यांनी केली आहे. 

कळंगुट येथे एका कार्यक्रमाच्या वेळी पत्रकारांशी लोबो बोलत होते. सध्या ज्या गतीने राजकीय हालचाली सुरू आहेत. प्रशासनातील कामकाज सुरू आहे ते पाहता राजकारणात त तसेच लोकात प्रचंड अस्वस्थता निर्माण झाली आहे. लोकांना गृहीत धरुन चालले जात आहे. त्यामुळे विद्यमान परिस्थिती पाहता विधानसभेच्या निवडणुका कुठल्याही क्षणाला होवू शकतात, असा दावा लोबो यांनी केला आहे. राज्याच्या राजकीय परिस्थितीला लोक कंटाळले आहेत. मतदार शहाणा झाला असल्याने येणाऱ्या निवडणुकीत मतदार राज्यात बदल घडवून आणणार असल्याचे ते म्हणाले. 

मतदार लोकप्रतिनिधींना आपली कामे करुन घेण्यासाठी निवडत असतात. त्यामुळे लोकांच्या अपेक्षाही बऱ्याच मोठ्या असतात. अशा मतदारांच्या अपेक्षा भंग करुन स्वत:च्या स्वार्थापायी दुसºया पक्षात प्रवेश करणे व लोकांना गृहीत धरुन चालणे चुकीचे असल्याचे ते म्हणाले. काँग्रेस पक्षातून भाजपात प्रवेश केलेल्या दोन आमदारांच्या नावाचा उल्लेख न करता त्यांनी हे विधान केले आहे. भाजपात आलेल्या दोन आमदारां व्यतिरिक्त आणखीन दोन आमदार भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा असून तसा निर्णय त्या दोन आमदारांनी घेतल्यास त्याचे परिणाम त्यांना भोगावे लागतील व लोकांच्या अपेक्षेचा भंग होणार असल्याचे लोबो म्हणाले. राज्यातील सरकार यशस्वीपणे चालवायचे असल्यास सक्षम विरोधी पक्षाची गरज आहे; पण सध्याचा विरोधी पक्ष आपली भूमिका सक्षमपणे पार पाडण्यास असमर्थ ठरला आहे. विरोधकांकडून विषयांची मांडणी योग्य प्रकारे केली जात नाही. त्यांनी योग्य भूमिका मांडली असती, सरकारातील उणीवांवर बोट ठेवले असते तर सरकार सुद्धा चांगल्या प्रकारे चालले असते असेही लोबो यांनी सांगितले.

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आजारा संबंधी लोबो यांना विचारले असता त्यांनी त्यावर स्वत: निर्णय घेणे गरजेचे असल्याचे सांगितले; पण सरकार चांगल्या प्रकारे चालण्यासाठी लोकांना चांगले प्रशासन उपलब्ध करुन देण्यासाठी जबाबदार व्यक्तीची गरज गोव्याला असल्याची पुष्ठी त्यांनी पुढे जोडली. सरकारातील जेष्ठ मंत्री सुदीन ढवळीकर ही जबाबदार व्यक्ती असू शकते का असा प्रश्न त्यांना केला असता त्यावर पक्ष पातळीवर काय ते ठरवले जावू शकते असेही लोबो म्हणाले. काही दिवसापूर्वी अमेरिकेत उपचार घेवून गोव्यात आलेले माजी मंत्री अ‍ॅड. फ्रान्सिस डिसोझा यांनी त्यांना वगळल्याबद्दल काढलेल्या नाराजीच्या सुरावर विचारले असता, त्यांना ज्याप्रकारे वगळण्यात आले त्यावर डिसोझा यांनी नाराजी व्यक्त करणे योग्य असल्याचे लोबो म्हणाले. ती त्यांची वैयक्तीक नाराजी असून एकेकाळी पक्षाला राज्यात उभारी देण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान डिसोझा यांनी दिल्याचेही लोबो यांनी सांगितले.   

टॅग्स :goaगोवाManohar Parrikarमनोहर पर्रीकरElectionनिवडणूकvidhan sabhaविधानसभा