शहरं
Join us  
Trending Stories
1
15 दिवसांत गाझा युद्ध संपणार! आता हमासच्या जागेवर कोण राज्य करणार? नेतान्याहू-ट्रम्प यांनी घेतला मोठा निर्णय
2
आणीबाणीच्या काळात संविधानाच्या प्रस्तावनेत 'धर्मनिरपेक्ष', 'समाजवादी' शब्द जोडले गेले, समीक्षा  व्हावी; संघाची मागणी
3
"जय हिंद, जय भारत..."; आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकातून शुभांशू शुक्ला यांचं पहिलं भाषण, काय म्हणाले...?
4
“इंदिरा गांधींनी आणीबाणी उठवली, पण मतचोरी करुन निवडणुका घेतल्या नाहीत”; काँग्रेसची टीका
5
अमेरिका, रशिया,यूएई, सौदी...; 'या' यादीत लवकरच भारतही येईल, सर्व काही 'सेट'
6
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
7
“मराठी भाषा अनिवार्य, हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक”: शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे
8
शुभांशू शुक्ला यांचं आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात जबरदस्त स्वागत, ठरले अशी कामगिरी करणारे दुसरे भारतीय; बघा VIDEO
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
11
ENG vs IND : जसप्रीत बुमराहला दुसऱ्याच सामन्यात दिली जाणार विश्रांती; त्याच्या जागी कुणाची लागणार वर्णी?
12
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
13
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
14
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
15
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
16
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
17
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
18
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
19
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
20
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...

उत्तर गोव्याचा बहुतेक भाग अंधारात

By admin | Updated: June 4, 2014 01:35 IST

पणजी : वीज खात्याने मान्सूनपूर्व कामांचा न केलेला निपटारा, तसेच खात्याच्या बेजबाबदारपणाचे पितळ जोरदार वार्‍या पावसाने पुन्हा एकदा उघडे पडले.

पणजी : वीज खात्याने मान्सूनपूर्व कामांचा न केलेला निपटारा, तसेच खात्याच्या बेजबाबदारपणाचे पितळ जोरदार वार्‍या पावसाने पुन्हा एकदा उघडे पडले. उत्तर गोव्यातील बहुतांश भाग सोमवारी रात्री अंधारात बुडाला. अनेक भागांमध्ये झाडांची पडझड झाली. वीजपुरवठा खंडित राहिला. सत्तरी, डिचोली, पेडणे, तिसवाडी व बार्देस तालुक्यांना मोठा फटका बसला. बार्देसमध्ये तर अर्धा अधिक भाग सोमवारी अंधारात राहिला. त्यामुळे लोकांना रात्र जागून काढावी लागली. वीज नसल्याने पाणीपुरवठा होऊ शकला नाही व त्यामुळे लोकांचे प्रचंड हाल झाले. काही भागांत २४ तास उलटले, तरी वीजपुरवठा सुरळीत झाला नव्हता. लोकांनी सरकारच्या नावाने ठणाणा केले. राजधानीचे उपनगर मानल्या जाणार्‍या पर्वरीत तब्बल १४ तास वीज गायब होती परिणामी असह्य उकाड्याने हैराण झालेल्या पर्वरीतील रहिवाशांना सकाळी आंघोळीसाठीही पाणी न मिळाले नाही. त्यांना रजा टाकून घरी राहावे लागले. वीज गडप झाल्याने उकाड्याने हैराण झालेल्या लोकांना लाही- लाही झाले. वीज नाही म्हणून पाणीही नाही, असा प्रकार अनेक ठिकाणी घडला. पर्वरीत दिवसभर लोकांना पाणी मिळाले नाही. वीजपुरवठा खंडित झाला. त्यामुळे पंप सुरू होऊ न शकल्याने पाणी सोडता आले नाही. लोकांनी पाण्यासाठी बाटल्यांचा वापर केला. बांधकाम खात्याचे मुख्य अभियंता (पाणी विभाग) दत्तात्रय बोरकर यांना विचारले असता, वीज खंडित होण्याच्या प्रकारांमुळे पाणीपुरवठ्यात व्यत्यय आल्याचे सांगून त्यांनी वीज खात्यावरच खापर फोडले. १९ मे रोजी पहिल्या पावसातही गडगडाटामुळे थिवी उपकेंद्रातून येणारी ११0 केव्हीची वाहिनी तुटल्याने वीज गायब होऊन लोकांना मोठा त्रास झाला होता. त्यानंतर पर्वरीत दोन वेळा ‘शट डाउन’ घेऊन मान्सूनपूर्व कामे करण्यात आली; परंतु त्याचाही काही फायदा झाला नसल्याचे स्पष्ट झाले. (प्रतिनिधी)