शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
१ रुपया द्या आणि एसी घ्या, नव्या GST दरांवर सुरू केलं बुकिंग; ग्राहकांना खेचण्यासाठी कंपन्यांमध्ये स्पर्धा
4
'स्पोर्टिंग क्लब'च्या निवडणुकीत शिंदेसेनेला शह देण्यासाठी झाली भाजपा-मनसे-उद्धवसेनेची युती
5
TVS Success Story: इंग्रजांसमोर हार मानली नाही, बँकेची नोकरी सोडून सायकल रिपेरिंगचं काम सुरू केलं; आज आहे ₹१,६६,२०० कोटींची कंपनी
6
पुतण्या तलावात बुडाला, वाचवण्यासाठी चुलतीसह भावाची पाण्यात उडी, शेवट भयंकर!
7
१२ वर्षांच्या संसाराची काडीमोड! लोकप्रिय टीव्ही अभिनेत्याचा घटस्फोट, बायकोशी असलेलं नातं मोडलं
8
Crime: ट्यूशनसाठी गेली, नंतर तुकड्या-तुकड्यांमध्ये मिळाला मुलीचा मृतदेह; आईवडिलांचा आक्रोश, शिक्षकानेच...
9
पितृपक्ष २०२५: स्वतःचे आणि कुटुंबाचे पिंडदान केल्यावरच नागा साधू बनता येते; सविस्तर वाचा
10
आईकडे संपत्ती नसली, तरीही मुलांच्या संगोपनाचा तिला हक्क; जम्मू-काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचा निर्णय
11
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
12
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
13
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
14
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
15
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
16
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
17
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
18
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
19
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
20
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल

ओसीआय कार्डच्या बाबतीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या शुध्दिपत्रकामुळे गोव्यात नाराजी

By किशोर कुबल | Updated: May 13, 2024 14:09 IST

विरोधी पक्षांकडून केंद्र व राज्य सरकारवर हल्लाबोल

पणजी : ओसीआय कार्डच्या बाबतीत केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ४ एप्रिल रोजी काढलेल्या निवेदनाच्या बाबतीत शुध्दिपत्रक जारी केल्याने तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. विरोधी पक्षांनी राज्य व केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने ओसीआय कार्डसाठी भारतीय पासपोर्ट मागे घेतल्याचे प्रमाणपत्र पुरेसे असल्याचे निवेदनात म्हटले  होते. परंतु त्यावर आता शुध्दीपत्रक जारी करुन हा प्रस्ताव विचाराधीन असल्याचे म्हटले आहे. ४ एप्रिल रोजी काढलेल्या निवेदनात दुरुस्त्याही केल्याचे म्हटले आहे. केंद्राने याबाबत अचानक घुमजाव केल्याची गोमंतकीयांची भावना बनली आहे.

पासपोर्ट जमा केल्यानंतर ओसीआय कार्ड मिळविण्यात गोमंतकीयांना अडचणी येत आहेत. पोर्तुगालमध्ये जन्मनोंदणी असल्यामुळे भारतीय पासपोर्ट रद्द करण्याचे प्रकार गोव्यात झाले आहेत. याचा अनेक गोमंतकीयांना फटका बसला आहे.

दुटप्पी भूमिका उघड : युरी आलेमांवविरोधी पक्षनेते युरी आलेमांव यांनी सरकारवर हल्लाबोल करताना केंद्र सरकारची दुटप्पी भूमिका उघड झाली असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले कि, ‘केंद्रीय परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाने याआधीचे आपले निवेदन मागे घेऊन ओसीआय नोंदणीबाबत गोंधळ निर्माण केला आहे. येत्या ४ रोजी निकालानंतर केंद्रात इंडिया आघाडीचे सरकार सत्तेवर येईल तेव्हा हा विषय तडीस लावू.’