शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसामुळे लोकल ठप्प, स्टेशनवर प्रवाशांची गर्दी; मुंबईकरांचे प्रचंड हाल, घरी परतण्यासाठी तारांबळ
2
India Cotton Imports: केंद्र सरकारने कापूस आयातीवरील सीमा शुल्क हटवले; कुणाला फायदा?
3
Monorail: मोठी बातमी! मुंबईत प्रवाशांनी भरलेली मोनो रेल्वे मध्येच बंद पडली, प्रवासी अडकले; काच ब्रेक करण्याचे प्रयत्न सुरू (Video)
4
मुंबईसह राज्यात २० ऑगस्टपासून पावसाचा जोर ओसरणार; हवामान खात्याचा अंदाज, १२ तासांसाठी रेड अलर्ट
5
महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
6
Mumbai Rain Mithi River: दोरी फेकली, पण अंदाज चुकला; मिठी नदीच्या पुरात तरुण गेला वाहून
7
सुदर्शन रेड्डींमुळे चंद्राबाबू-जगन मोहन यांच्यासमोर धर्म संकट; उपराष्ट्रपतिपदासाठी विरोधकांची खेळी
8
आता आणखी दोन नव्या कलर ऑप्शन्ससह आली Tata Punch EV, मिळणार फास्ट चार्जिंग स्पीड! असे आहेत सेफ्टी फीचर्स
9
राहुल गांधींच्या गाडीची पोलिसाला धडक, 'ही तर जनतेला चिरडणारी यात्रा', भाजपची बोचरी टीका
10
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पोलीस अधिकाऱ्याचा जीव गेला; रस्त्यावर पडताच कारने चिरडले
11
"मी सुरक्षित आहे..." १३ दिवसांनी अर्चना तिवारीचा आईला फोन; बेपत्ता होण्यामागचं रहस्य उलगडणार?
12
निमिषा प्रियासाठी सरकार जनतेकडून ८ कोटी मागत आहे? परराष्ट्र मंत्रालयाने सत्य सांगितले
13
याला म्हणतात शेअर...! 24 तासांत 1 लाखाचे केले 88 लाख, एवढी तेजी आली की ट्रेडिगच थांबवावी लागली! नेमकं काय घडलं?
14
जिओने खिसा कापला...! १ जीबी, २८ दिवसांचा प्लॅन बंद केला; आता २९९ रुपये मोजावे लागणार
15
काँग्रेसने ज्या 'ट्विट'वरून निवडणूक आयोगाची गचांडी धरली, ती पोस्टच डिलीट; संजय कुमारांनी माफी का मागितली?
16
ऑनलाइन बेटिंग आता दंडनीय गुन्हा, केंद्रीय मंत्रिमंडळाचा गेमिंग विधेयकाला हिरवा कंदील
17
India Squad For Asia Cup 2025: संघ ठरला! सूर्याच्या नेतृत्वाखाली गिलकडेही आली मोठी जबाबदारी, कुणाला मिळाली संधी?
18
Viral Video : तरुणीने ट्रक चालकाशी बांधली लग्नगाठ; स्वतः सांगितलं भन्नाट कारण! व्हिडीओ होतोय व्हायरल
19
KBC च्या हॉट सीटवर अमिताभ बच्चन यांच्यासोबत खेळण्याची सुवर्णसंधी! BHIM App वर अशी करा नोंदणी
20
पत्नीचा संशयास्पद मृत्यू, अनेक महिलांशी संबंध...निळ्या ड्रम प्रकरणातील आरोपी प्रियकराचा 'कारनामा'

भाजपमुळे देशात अराजकता

By admin | Updated: November 9, 2015 01:24 IST

मडगाव : देशात अराजकता, असहिष्णुता आणि वैरभावाची भावना वाढू लागली आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या नीतीमुळे

मडगाव : देशात अराजकता, असहिष्णुता आणि वैरभावाची भावना वाढू लागली आहे. भाजप सरकारच्या चुकीच्या नीतीमुळे लोकशाही संकटात सापडल्याचे प्रतिपादन गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीचे अध्यक्ष लुईझिन फालेरो यांनी रविवारी येथे केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. गोवा प्रदेश कॉंग्रेस समितीने बाबासाहेब आंबेडकरांच्या १२५व्या जयंतीचा भाग म्हणून मडगावात या खास कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंजाबचे खासदार संतोषसिंह चौधरी, माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत, खासदार शांताराम नाईक, फ्रान्सिस्को सार्दिन, माजी आमदार प्रताप गावस, सुभाष फळदेसाई, मोती देसाई, प्रभाकर तिंबले आदी उपस्थित होते. कॉँग्रेस पक्ष असहिष्णुतेच्या विरोधात येत्या १४ तारखेला मडगावच्या लोहिया मैदानावर जनसभा घेणार असल्याचे फालेरो यांनी जाहीर केले. पंजाबचे खासदार संतोषसिंह चौधरी म्हणाले, जे दलित व गरीब लोक काही कारणामुळे कॉंग्रेस पक्षापासून दूर गेले आहेत, त्यांना पुन्हा पक्षात आणण्याचे प्रयत्न केले पाहिजेत. देशात सुमारे २० कोटी दलित लोक असून या जनतेचा आवाज कॉंग्रेस पक्ष आहे. कॉँग्रेस पक्षाने दलितांच्या उध्दारासाठी अनेक प्रयत्न केले आहेत. बाबासाहेब हे खऱ्या अर्थाने घटनेचे शिल्पकार होते. त्यांच्या विचारांचे आचरण होणे गरजेचे असल्याचे माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी या वेळी सांगितले. या वेळी प्रभाकर तिंबेले यांनी बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची माहिती करून दिली. बाबासाहेबांनी दलितांच्या उध्दारासाठी प्रयत्न केले. दलितांना आरक्षण देण्यामागे आंबेडकरांची दूरदृष्टी होती, मात्र पन्नास वर्षांनी आरक्षणावर पुन्हा विचार व्हावा, असेही आंबेडकर सांगायचे. आंबेडकरांच्या विचारांमुळे दलित एकत्र येतात हा आंबेडकर विचारांचा विजय असल्याचे तिंबले म्हणाले. एम.के. शेख यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले. आल्तिनो गोमीश यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)