शहरं
Join us  
Trending Stories
1
मंत्री उदय सामंत चौथ्यांदा 'शिवतीर्थ'वर; मनसे प्रमुख राज ठाकरेंची घेतली भेट, कारण काय?
2
सीमेवर बंदुका थंडावल्या, पण एअर इंडिया, गो इंडिगोने विमानफेऱ्या रद्द केल्या; या विमानतळांवर आजही...
3
हिंडन विमानतळावरून बंगळुरू, लुधियाना, नांदेडसाठी आजपासून विमानसेवा सुरू; मुंबई, गोव्यासाठी केव्हा सुरू होणार?
4
Stock Market Today: विक्रमी तेजीनंतर शेअर बाजारात घसरण; ५०० पेक्षा जास्त अंकांनी आपटला, तरीही फार्मा सेक्टरमध्ये तेजी का?
5
सावधान! 'या' नंबरवरून पाकिस्तानी हॅकर्सचा भारतीयांना फोन; सुरक्षा यंत्रणेचा मोठा अलर्ट
6
धक्कादायक! अमृतसरमध्ये विषारी दारूमुळे १२ जणांचा मृत्यू, ५ जणांची प्रकृती गंभीर
7
India retaliatory tariff: चीननंतर भारताचं अमेरिकेला जोरदार प्रत्युत्तर, स्टील-अ‍ॅल्युमिनिअम टॅरिफवर मोठी घोषणा
8
'ऑपरेशन सिंदूर'वेळी भारतावर १५ लाख सायबर हल्ले; पाकिस्तान,बांगलादेशसह या ५ देशातील हॅकर्स
9
भीमा कोरेगाव प्रकरण: आज आयोगापुढे शरद पवार हजर राहणार?
10
स्पष्ट विजय! भारताच्या 'या' दोन मिसाइलला तोड नाही, पाकनं नांगी टाकली...; ऑपरेशन सिंदूरवर ऑस्ट्रियन इतिहासकाराचा मोठा दावा
11
गोळीबार नको, बॉर्डरवरील सैनिकांची संख्या कमी करावी; भारत-पाकिस्तान DGMO मध्ये चर्चा
12
"ज्या गोष्टी लढून मिळवायच्या, त्या मागून मिळत नाहीत..."; उद्धवसेनेचा PM मोदींवर निशाणा
13
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
14
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
15
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
16
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
17
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
18
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
19
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
20
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय

सर्व व्यवहार थेट जपानी बँकेकडून

By admin | Updated: September 20, 2015 01:56 IST

सध्या गाजत असलेल्या लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांचा हात आहे का

सुशांत कुंकळयेकर ल्ल मडगाव सध्या गाजत असलेल्या लुईस बर्जर लाचखोरी प्रकरणात माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत व सार्वजनिक बांधकाम खात्याचे माजी मंत्री चर्चिल आलेमाव यांचा हात आहे का? नेमका हाच मुद्दा सिध्द करून दाखविणे, हे गुन्हा अन्वेषण विभागासमोरील (क्राईम ब्रँच) खरे आव्हान आहे. ज्या प्रकल्पात राज्याकडून पैशांचा व्यवहार झालाच नाही, त्या प्रकल्पात लाचखोरी कशी झाली, हे या विभागाला सिध्द करून दाखवावे लागेल. २0१३चा महालेखापाला (कॅग)चा अहवाल पाहिल्यास हे सिध्द करणे गुन्हे अन्वेषण विभागाला शक्यच होणार नाही, असे स्पष्ट होते. ‘लोकमत’च्या हाती जी कागदपत्रे आली आहेत आणि कॅगचा हल्लीच प्रसिध्द झालेला अहवाल आला आहे, त्यातून अनेकप्रश्न निर्माण होतात. ही कथित लाचखोरी खरेच झाली का? त्यात दिगंबर कामत व चर्चिल आलेमाव यांंचा हात आहे का? की केवळ राजकीय सूड उगविण्यासाठीच या प्रकरणाचा वापर भाजपाकडून केला जात आहे? ‘लोकमत’कडे जी कागदपत्रे उपलब्ध झाली. त्यानुसार, या प्रकल्पाच्या सल्लागार आणि कंत्राटदारांना जी बिले फेडली आहेत ती थेट बँक आॅफ इंडियाच्या टोकियो शाखेतून फेडली गेली आहेत. यातील एकही पैसा राज्य सरकारच्या तिजोरीतून फेडला गेलेला नाही. कॅगच्या अहवालातही त्यावर शिक्कामोर्तब केलेले आहे. ३१ मार्च २0१३ रोजी कॅगने जो अहवाल दिला आहे त्यात नमूद केले आहे ते म्हणजे या प्रकल्पासाठी जपान बँकेने जे कर्ज मंजूर केले आहे. त्याचे पैसे बँकेकडून कंत्राटदारांना थेट फेडले गेले आहेत. कन्सल्टंट व प्रोजेक्ट इम्प्लिमेंटेशन युनिट (पीआययु) यांनी प्रमाणित केल्यानंतरच ही कर्जाची रक्कम दिली आहे. २00९ ते १३ या दरम्यान जपान बँकेने कंत्राटदारांना ३२९.0१ कोटी रुपयांचे कर्ज दिले. ही बिले केंद्र सरकारच्या वित्त खात्याच्या कंट्रोलर आॅफ एड अकाउंट्स अ‍ॅण्ड आॅडिट यांनी मंजूर केली आहेत. यापैकी २८१.८९ कोटी रुपये पाणीपुरवठ्यासाठी तर ४६.१२ कोटी रुपये सांडपाणी प्रकल्पासाठी दिले आहेत. यावरून हा पैशांचा सारा व्यवहार करताना राज्य सरकारचा त्यात कोणताही संबंध नसल्याचे स्पष्ट करतो. कॅगने आपल्या अहवालात सरकारने हा खर्च आपल्या हिशोबात दाखविला नाही, याबद्दल हरकत घेतली आहे. कॅगने जरी अशी हरकत घेतली असली तरी जी रक्कम गोवा सरकारने खर्चच केली नाही ती हिशोबात दाखविण्यात तरी कशी येईल? कॅगचा अहवाल पाहिला तर ज्या व्यवहारात गोवा सरकारने कोणताही पैशांचा व्यवहार केला नाही त्या व्यवहारात राज्यस्तरावर पैशांची देवाणघेवाण झाली या मुद्द्यावर सामान्यांचा विश्वास बसणे जरा कठीणच आहे. या व्यवहारासंदर्भात आणखी एक प्रश्न उपस्थित होतो तो असा, कन्सल्टंसीसंदर्भातील हा सारा व्यवहार १८ मार्च २00८ या दिवशी सुरू होऊन १९ जून २00९ या दिवशी पूर्ण झाला आहे. सध्या जी लाचखोरी झाल्याचा दावा आहे ती २0१0 मध्ये झाल्याचा गुन्हे अन्वेषण विभागाचा दावा आहे. जो व्यवहार जून २00९ मध्येच पूर्ण झाला त्यासाठी २0१0 मध्ये लाच का दिली गेली? गुन्हा अन्वेषणने सध्या दिगंबर कामत यांना मिळालेला अटकपूर्व जामीन रद्द करावा यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासाठी त्यांनी कामत यांच्याकडून यासंदर्भात महत्त्वाची फाईल गायब केल्याचा दावा केला आहे. कॅगचाच अहवाल पाहिल्यास गुन्हा अन्वेषणच्या याही दाव्यात काही दम नाही, हे स्पष्ट होते. कॅगने आपला जो अहवाल दिला आहे तो अहवाल २00८-0९ ते २0१२-१३ या वर्षांतील सर्व फाईल्स तपासून दिला आहे. याचाच अर्थ जी फाईल गायब झाल्याचा दावा केला जातो ती फाईल यापूर्वीच कॅगकडे गेल्याचे स्पष्ट होते. जर ही फाईल कॅगकडे आहे तर ती मिळविण्यास गुन्हा अन्वेषणसमोर अडचण कोणती आहे? यासारखे प्रश्न निर्माण होतात. कॅगचा हा संपूर्ण अहवाल पाहिल्यास गुन्हे अन्वेषणतर्फे जे दावे केले आहेत त्यात खरेच तथ्य आहे का, असा प्रश्न कोणालाही पडावा. सध्या ज्या पध्दतीने या प्रकरणाचा तपास केला जात आहे, ते पाहिल्यास यात पुरावे कमी आणि राजकारण जास्त तर नाही ना, असे वाटते. मडगावचे उद्योजक नितीन नाईक यांच्या घरावर चतुर्थीच्या आदल्या दिवशी ज्या पध्दतीने छापा घातला गेला ते पाहिल्यास दुसरी शक्यताच अधिक वाटते. त्यामुळे लाचखोरीचा हा आरोप गुन्हे अन्वेषण विभाग खरेच सिध्द करू शकेल का, हा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. (क्रमश:)