शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व शहरे रेल्वेने जोडणार; केंद्राकडे ५००० कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 12:55 IST

मुख्यमंत्री सावंत यांचे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन; अर्थसंकल्पात गोव्यासाठी १० हजार कोटींची तरतुद करावी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व शहरे रेल्वेने जोडण्यासाठी कोकण रेल्वेला ५००० कोटी रुपये, खाजन शेती पुनरुज्जिवित करण्यासाठी ५०० कोटी रुपये, सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात ही तरतूद करावी, अशी विनंती त्यांनी केली. केंद्रीय वित्तमंत्री सितारामन यांनी काल जैसलमेर (राजस्थान) येथे सर्व राज्यांच्या वित्तमंत्र्यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंतही त्यात सहभागी झाले.

गोव्यात जमिनीचा तुटवडा असल्याने रस्त्यांचा विस्तार आणखी शक्य नाही. त्यामुळे रेल्वेने शहरे जोडली जावीत, अशी मुख्यमंत्र्यांची मागणी आहे. राज्यात सुमारे साडेतीन हजार वर्षांपासून खाजन शेती अस्तित्वात आहेत. गोव्यातील आद्य गोमंतकीय म्हणून ओळखले जाणारे गावडा समाजाचे लोक ही शेती करत होते. परंतु आज सुमारे १८ हजार हेक्टर खाजन शेत जमीन खाऱ्या पाण्याखाली आहे. तिथे खारफुटी वाढलेली आहे. त्यामुळे शेती करता येत नाही. खाजन शेतीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी ५०० कोटी रुपये राज्य सरकारने मागितले आहेत. राज्यातील जलवाहिन्या १९६० ते ७० या दशकात घातलेल्या आहेत. त्या अत्यंत जुन्या झालेल्या असून बदलण्यासाठी १००० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात शंभर टक्के घरांना नळाची जोडणी दिली आली आहे, याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केलेला आहे.

दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगाने गोव्याला मंजूर केलेला पर्यटनासाठींचा २०० कोटी रुपयांचा निधी व हवामान बदल उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला जावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेचे जुने गोवे व पेडणे येथील बोगदे १९९२ ते १९९७ या दरम्यान बांधले होते. ते आता अत्यंत मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे नवे बोगदे बांधण्यासाठी कोकण रेल्वेला १५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पश्चिम घाट संवर्धन व कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी १ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, राज्यात यावर्षी १७३ इंच पाऊस झाला. १२४ वर्षातील ही सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होती. त्यामुळे हवामान बदलाचा परिणाम लक्षात घेता काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत