शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
2
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
3
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
4
इम्रान खान आणि बुशरा बीबीला १७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा; 'तोशाखाना-२' प्रकरणात पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना मोठा धक्का!
5
Infosys ADR News: इन्फोसिसच्या एडीआरमध्ये ४० टक्क्यांची तेजी; ट्रेडिंगही थांबवलं, पाहा नक्की काय आहे प्रकरण
6
२००० किमी दूर रशियाच्या जहाजावर युक्रेनचा सर्वात मोठा हल्ला; याचा बदला घेणारच, पुतिन संतापले
7
ठाकरेंना जय महाराष्ट्र, भाजपचा आणखी एक धक्का! लोकसभा लढवणारे संजोग वाघेरेंचा मोठा निर्णय
8
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
9
“काँग्रेसमध्ये पाठिंबा नाही, काम करणे कठीण; शिंदेसेनेत येताच महिला नेत्यांनी सगळे सांगितले
10
मल्लिका शेरावतने डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत व्हाईट हाऊसमध्ये केलं ख्रिसमस डिनर; फोटो केले शेअर
11
"आता टॅरिफ माझा 5वा आवडता शब्द...!"; असं का म्हणाले डोनाल्ड ट्रम्प? अमेरिकेसाठी केली मोठी घोषणा
12
जागांवर तडजोड नाही, शिंदेसेना ठाम, भाजपाही मागे हटेना; अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट पडणार?
13
"मी शाहरुख खान, कृपया मला कॉल कर...", राधिकाला आलेला किंग खानचा मेसेज; म्हणाली...
14
'आयात' विरुद्ध 'निष्ठावंत' भाजपात वाढला संघर्ष; मूळ कार्यकर्ते अस्वस्थ, बंडखोरी वाढणार
15
Google नं पहिल्यांदाच आणलं क्रेडिट कार्ड, लगेच मिळणार कॅशबॅक आणि रिवॉर्ड; काय आहे खास?
16
अयोध्या राम मंदिरात ७० नवे पुजारी घेतले जाणार, ट्रस्टचा निर्णय; परिसरातील मंदिरात सेवा करणार
17
२१ डिसेंबर रोजी सुरु होणार पौष मास 'भाकड मास' का म्हटला जातो? शुभ कार्यालाही लागतो विराम!
18
पतीनं पत्नीकडून घरखर्चाचा हिशोब मागणं क्रूरता?; सुप्रीम कोर्टाने सुनावला महत्त्वाचा निकाल
19
Mumbai Crime: शीतपेयातून गुंगीचा पदार्थ, मुंबईत अल्पवयीन मुलींवर ४५ वर्षाच्या व्यक्तीने...; व्हिडीओही बनवला
20
Post Office ची धमाल स्कीम, व्हाल मालामाल; मॅच्युरिटीवर मिळतील ४० लाख रुपये, किती गुंतवणूक करावी लागणार?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील सर्व शहरे रेल्वेने जोडणार; केंद्राकडे ५००० कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 12:55 IST

मुख्यमंत्री सावंत यांचे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन; अर्थसंकल्पात गोव्यासाठी १० हजार कोटींची तरतुद करावी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व शहरे रेल्वेने जोडण्यासाठी कोकण रेल्वेला ५००० कोटी रुपये, खाजन शेती पुनरुज्जिवित करण्यासाठी ५०० कोटी रुपये, सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात ही तरतूद करावी, अशी विनंती त्यांनी केली. केंद्रीय वित्तमंत्री सितारामन यांनी काल जैसलमेर (राजस्थान) येथे सर्व राज्यांच्या वित्तमंत्र्यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंतही त्यात सहभागी झाले.

गोव्यात जमिनीचा तुटवडा असल्याने रस्त्यांचा विस्तार आणखी शक्य नाही. त्यामुळे रेल्वेने शहरे जोडली जावीत, अशी मुख्यमंत्र्यांची मागणी आहे. राज्यात सुमारे साडेतीन हजार वर्षांपासून खाजन शेती अस्तित्वात आहेत. गोव्यातील आद्य गोमंतकीय म्हणून ओळखले जाणारे गावडा समाजाचे लोक ही शेती करत होते. परंतु आज सुमारे १८ हजार हेक्टर खाजन शेत जमीन खाऱ्या पाण्याखाली आहे. तिथे खारफुटी वाढलेली आहे. त्यामुळे शेती करता येत नाही. खाजन शेतीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी ५०० कोटी रुपये राज्य सरकारने मागितले आहेत. राज्यातील जलवाहिन्या १९६० ते ७० या दशकात घातलेल्या आहेत. त्या अत्यंत जुन्या झालेल्या असून बदलण्यासाठी १००० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात शंभर टक्के घरांना नळाची जोडणी दिली आली आहे, याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केलेला आहे.

दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगाने गोव्याला मंजूर केलेला पर्यटनासाठींचा २०० कोटी रुपयांचा निधी व हवामान बदल उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला जावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेचे जुने गोवे व पेडणे येथील बोगदे १९९२ ते १९९७ या दरम्यान बांधले होते. ते आता अत्यंत मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे नवे बोगदे बांधण्यासाठी कोकण रेल्वेला १५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पश्चिम घाट संवर्धन व कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी १ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, राज्यात यावर्षी १७३ इंच पाऊस झाला. १२४ वर्षातील ही सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होती. त्यामुळे हवामान बदलाचा परिणाम लक्षात घेता काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत