शहरं
Join us  
Trending Stories
1
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
2
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
3
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
6
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
7
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
8
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
9
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
10
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
11
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
12
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
15
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
16
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
17
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
18
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
19
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
20
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा

राज्यातील सर्व शहरे रेल्वेने जोडणार; केंद्राकडे ५००० कोटी रुपयांची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2024 12:55 IST

मुख्यमंत्री सावंत यांचे केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना निवेदन; अर्थसंकल्पात गोव्यासाठी १० हजार कोटींची तरतुद करावी

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील सर्व शहरे रेल्वेने जोडण्यासाठी कोकण रेल्वेला ५००० कोटी रुपये, खाजन शेती पुनरुज्जिवित करण्यासाठी ५०० कोटी रुपये, सुमारे ६० ते ७० वर्षांपूर्वीच्या जुन्या जलवाहिन्या बदलण्यासाठी एक हजार कोटी रुपयांची मागणी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी शुक्रवारी केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांना सादर केलेल्या निवेदनात केली आहे.

आगामी केंद्रीय अर्थसंकल्पात ही तरतूद करावी, अशी विनंती त्यांनी केली. केंद्रीय वित्तमंत्री सितारामन यांनी काल जैसलमेर (राजस्थान) येथे सर्व राज्यांच्या वित्तमंत्र्यांची बैठक बोलावली होती. मुख्यमंत्री प्रमोद सावंतही त्यात सहभागी झाले.

गोव्यात जमिनीचा तुटवडा असल्याने रस्त्यांचा विस्तार आणखी शक्य नाही. त्यामुळे रेल्वेने शहरे जोडली जावीत, अशी मुख्यमंत्र्यांची मागणी आहे. राज्यात सुमारे साडेतीन हजार वर्षांपासून खाजन शेती अस्तित्वात आहेत. गोव्यातील आद्य गोमंतकीय म्हणून ओळखले जाणारे गावडा समाजाचे लोक ही शेती करत होते. परंतु आज सुमारे १८ हजार हेक्टर खाजन शेत जमीन खाऱ्या पाण्याखाली आहे. तिथे खारफुटी वाढलेली आहे. त्यामुळे शेती करता येत नाही. खाजन शेतीचे पुनरूज्जीवन करण्यासाठी ५०० कोटी रुपये राज्य सरकारने मागितले आहेत. राज्यातील जलवाहिन्या १९६० ते ७० या दशकात घातलेल्या आहेत. त्या अत्यंत जुन्या झालेल्या असून बदलण्यासाठी १००० कोटी रुपयांची आवश्यकता असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. राज्यात शंभर टक्के घरांना नळाची जोडणी दिली आली आहे, याचा उल्लेखही त्यांनी आवर्जून केलेला आहे.

दरम्यान, पंधराव्या वित्त आयोगाने गोव्याला मंजूर केलेला पर्यटनासाठींचा २०० कोटी रुपयांचा निधी व हवामान बदल उपाययोजनांसाठी ५०० कोटी रुपयांचा निधी वितरित केला जावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

कोकण रेल्वेचे जुने गोवे व पेडणे येथील बोगदे १९९२ ते १९९७ या दरम्यान बांधले होते. ते आता अत्यंत मोडकळीस आलेले आहेत. त्यामुळे नवे बोगदे बांधण्यासाठी कोकण रेल्वेला १५०० कोटी रुपयांची तरतूद करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पश्चिम घाट संवर्धन व कार्बन उत्सर्जन कमी करण्यासाठी १ हजार कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्र्यांनी असे म्हटले आहे की, राज्यात यावर्षी १७३ इंच पाऊस झाला. १२४ वर्षातील ही सर्वाधिक पर्जन्यवृष्टी होती. त्यामुळे हवामान बदलाचा परिणाम लक्षात घेता काही उपाययोजना कराव्या लागतील. त्यासाठी एक हजार कोटी रुपयांची आवश्यकता आहे.

 

टॅग्स :goaगोवाPramod Sawantप्रमोद सावंत