शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

पक्षांतर केलेल्यांविरुद्ध आंदोलन करू; रिव्होल्युशनरी गोवन्स पुन्हा आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 14:49 IST

गणेश चतुर्थीनंतर घरासमोर मांडणार ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : २०२२च्या निवडणुकीत जे आमदार म्हणून निवडून एका चिन्हावर आले आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात चतुर्थीनंतर आंदोलन केले जाईल. पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या घरासमोर ठाण मांडले जाईल, तसेच वेगवेगळी आंदोलने आणि चळवळ सुरू केली जाईल, अशी माहिती रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी पेडणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरजीचे मनोज परब यांनी पेडणे नियोजित थीम पार्क येथे प्रकल्पाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यासाठी आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकाराने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आरजीने पक्षांतर करणाऱ्या आमदारांविरुद्ध आंदोलन करणार, असा इशारा दिला होता, त्याचे काय झाले, याबाबत विचारणा केल्यावर परब यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

आमदारांचा आवाज का गप्प झाला?

विधानसभेच्या निवडणुकीत पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातून जे उमेदवार उभे राहिले आणि निवडणूक झाल्यानंतर ते आवाज का करीत नाहीत? त्यांचा आवाज गप्प का झाला, असा प्रश्न मनोज परब यांनी उपस्थित केला. पेडणे तालुक्यातील दोन्ही उमेदवार निवडणुका झाल्यानंतर मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास करून केवळ तोंडी नव्हे, तर लेखी स्वरूपात वीज, पाणी, रस्ते या समस्यांवर जनतेच्या सह्या घेऊन ठिकठिकाणी नागरिकांना भेटून सरकारला, अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली आहेत. आरजी केवळ मतांसाठी काम करत नाहीत, तर मतदारांना, नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा परब यांनी केला.

...म्हणून आम्ही एक वर्ष गप्प होतो

परब म्हणाले, आम्ही एक वर्ष गप्प राहिलो. कार्यकर्त्यांना एका वर्षासाठी त्यांची वैयक्तिक कामे होती ती पूर्ण करण्यास मुदत दिली. आता गणेश चतुर्थीनंतर आरजी पुन्हा नव्या जोमाने, नव्या दमाने काम करणार. ज्या आमदारांनी मतदारांचा विश्वासघात करून निवडून आल्यानंतर मतदारांना बाय-बाय केले, अशा आमदारांच्या घरासमोर ठाण मांडून आंदोलन केले जाईल.

आमदाराने विधानसभेत किती प्रश्न मांडले?

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेत पेडणेवासीयांचे किती प्रश्न मांडले? असा सवाल उपस्थित केला. मतदारसंघातून बिगर मतदारसंघातील उमेदवार निवडून येतात. स्वतःचे कल्याण साधताना माया जमवतात आणि निघून जातात. मात्र, भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, असा आरोप मनोज परब यांनी केला.

भूमिपुत्रांवरील अन्याय; आवाज उठविणार

भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आणि भूमिपुत्रांवर अन्याय कोणत्याही क्षणी झाला, तर आरजी नेहमी तत्पर असेल. सर्वसामान्यांच्या समस्या लोकप्रतिनिधी सोडवण्यास अपयशी ठरल्याने आरजीला आता कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी गावागावात संघटना मजबूत करण्याबरोबरच गावातील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या याबाबत टप्प्याटप्याने आवाज उठवला जाईल, असेही परब म्हणाले.

थीम पार्कला थारा नाहीच : परब

मनोज परब म्हणाले, पेडणे येथील नियोजित थीम पार्क प्रकल्पाविषयी आरजीचा पूर्णपणे विरोध आहे. याप्रकरणी जमीन घोटाळ्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. थीम पार्क केवळ नावासाठी असणार, परंतु गॅम्बलिंग कॅसिनो हे प्रकार या ठिकाणी होणार असल्याने त्याला थारा दिला जाणार नाही, असा इशारा परब यांनी दिला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण