शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३१ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
3
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
4
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
5
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
8
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
9
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
10
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
11
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
12
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
13
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
14
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
15
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
16
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
17
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
18
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
19
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
20
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'

पक्षांतर केलेल्यांविरुद्ध आंदोलन करू; रिव्होल्युशनरी गोवन्स पुन्हा आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 14:49 IST

गणेश चतुर्थीनंतर घरासमोर मांडणार ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : २०२२च्या निवडणुकीत जे आमदार म्हणून निवडून एका चिन्हावर आले आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात चतुर्थीनंतर आंदोलन केले जाईल. पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या घरासमोर ठाण मांडले जाईल, तसेच वेगवेगळी आंदोलने आणि चळवळ सुरू केली जाईल, अशी माहिती रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी पेडणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरजीचे मनोज परब यांनी पेडणे नियोजित थीम पार्क येथे प्रकल्पाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यासाठी आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकाराने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आरजीने पक्षांतर करणाऱ्या आमदारांविरुद्ध आंदोलन करणार, असा इशारा दिला होता, त्याचे काय झाले, याबाबत विचारणा केल्यावर परब यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

आमदारांचा आवाज का गप्प झाला?

विधानसभेच्या निवडणुकीत पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातून जे उमेदवार उभे राहिले आणि निवडणूक झाल्यानंतर ते आवाज का करीत नाहीत? त्यांचा आवाज गप्प का झाला, असा प्रश्न मनोज परब यांनी उपस्थित केला. पेडणे तालुक्यातील दोन्ही उमेदवार निवडणुका झाल्यानंतर मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास करून केवळ तोंडी नव्हे, तर लेखी स्वरूपात वीज, पाणी, रस्ते या समस्यांवर जनतेच्या सह्या घेऊन ठिकठिकाणी नागरिकांना भेटून सरकारला, अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली आहेत. आरजी केवळ मतांसाठी काम करत नाहीत, तर मतदारांना, नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा परब यांनी केला.

...म्हणून आम्ही एक वर्ष गप्प होतो

परब म्हणाले, आम्ही एक वर्ष गप्प राहिलो. कार्यकर्त्यांना एका वर्षासाठी त्यांची वैयक्तिक कामे होती ती पूर्ण करण्यास मुदत दिली. आता गणेश चतुर्थीनंतर आरजी पुन्हा नव्या जोमाने, नव्या दमाने काम करणार. ज्या आमदारांनी मतदारांचा विश्वासघात करून निवडून आल्यानंतर मतदारांना बाय-बाय केले, अशा आमदारांच्या घरासमोर ठाण मांडून आंदोलन केले जाईल.

आमदाराने विधानसभेत किती प्रश्न मांडले?

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेत पेडणेवासीयांचे किती प्रश्न मांडले? असा सवाल उपस्थित केला. मतदारसंघातून बिगर मतदारसंघातील उमेदवार निवडून येतात. स्वतःचे कल्याण साधताना माया जमवतात आणि निघून जातात. मात्र, भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, असा आरोप मनोज परब यांनी केला.

भूमिपुत्रांवरील अन्याय; आवाज उठविणार

भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आणि भूमिपुत्रांवर अन्याय कोणत्याही क्षणी झाला, तर आरजी नेहमी तत्पर असेल. सर्वसामान्यांच्या समस्या लोकप्रतिनिधी सोडवण्यास अपयशी ठरल्याने आरजीला आता कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी गावागावात संघटना मजबूत करण्याबरोबरच गावातील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या याबाबत टप्प्याटप्याने आवाज उठवला जाईल, असेही परब म्हणाले.

थीम पार्कला थारा नाहीच : परब

मनोज परब म्हणाले, पेडणे येथील नियोजित थीम पार्क प्रकल्पाविषयी आरजीचा पूर्णपणे विरोध आहे. याप्रकरणी जमीन घोटाळ्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. थीम पार्क केवळ नावासाठी असणार, परंतु गॅम्बलिंग कॅसिनो हे प्रकार या ठिकाणी होणार असल्याने त्याला थारा दिला जाणार नाही, असा इशारा परब यांनी दिला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण