शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
2
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
3
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
4
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
5
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
6
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
7
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
8
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
9
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
10
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
11
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
12
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
13
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
14
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
15
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
16
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
17
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?
18
Dewald Brevis: बेबी एबीनं इतिहासच बदलून टाकला, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 'अशी' कामगिरी करणारा एकटाच!
19
१४ लाखांचं पॅकेज असलेला तरुण भररस्त्यात मॉडेलसमोर अचानक उभा राहिला, पॅन्टची चेन उघडली अन्...
20
E10 च्या वाहनांमध्ये E20 पेट्रोल वापरू नका, नाहीतर...; टोयोटाचा वाहन मालकांना इशारा...

पक्षांतर केलेल्यांविरुद्ध आंदोलन करू; रिव्होल्युशनरी गोवन्स पुन्हा आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 14:49 IST

गणेश चतुर्थीनंतर घरासमोर मांडणार ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : २०२२च्या निवडणुकीत जे आमदार म्हणून निवडून एका चिन्हावर आले आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात चतुर्थीनंतर आंदोलन केले जाईल. पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या घरासमोर ठाण मांडले जाईल, तसेच वेगवेगळी आंदोलने आणि चळवळ सुरू केली जाईल, अशी माहिती रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी पेडणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरजीचे मनोज परब यांनी पेडणे नियोजित थीम पार्क येथे प्रकल्पाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यासाठी आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकाराने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आरजीने पक्षांतर करणाऱ्या आमदारांविरुद्ध आंदोलन करणार, असा इशारा दिला होता, त्याचे काय झाले, याबाबत विचारणा केल्यावर परब यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

आमदारांचा आवाज का गप्प झाला?

विधानसभेच्या निवडणुकीत पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातून जे उमेदवार उभे राहिले आणि निवडणूक झाल्यानंतर ते आवाज का करीत नाहीत? त्यांचा आवाज गप्प का झाला, असा प्रश्न मनोज परब यांनी उपस्थित केला. पेडणे तालुक्यातील दोन्ही उमेदवार निवडणुका झाल्यानंतर मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास करून केवळ तोंडी नव्हे, तर लेखी स्वरूपात वीज, पाणी, रस्ते या समस्यांवर जनतेच्या सह्या घेऊन ठिकठिकाणी नागरिकांना भेटून सरकारला, अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली आहेत. आरजी केवळ मतांसाठी काम करत नाहीत, तर मतदारांना, नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा परब यांनी केला.

...म्हणून आम्ही एक वर्ष गप्प होतो

परब म्हणाले, आम्ही एक वर्ष गप्प राहिलो. कार्यकर्त्यांना एका वर्षासाठी त्यांची वैयक्तिक कामे होती ती पूर्ण करण्यास मुदत दिली. आता गणेश चतुर्थीनंतर आरजी पुन्हा नव्या जोमाने, नव्या दमाने काम करणार. ज्या आमदारांनी मतदारांचा विश्वासघात करून निवडून आल्यानंतर मतदारांना बाय-बाय केले, अशा आमदारांच्या घरासमोर ठाण मांडून आंदोलन केले जाईल.

आमदाराने विधानसभेत किती प्रश्न मांडले?

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेत पेडणेवासीयांचे किती प्रश्न मांडले? असा सवाल उपस्थित केला. मतदारसंघातून बिगर मतदारसंघातील उमेदवार निवडून येतात. स्वतःचे कल्याण साधताना माया जमवतात आणि निघून जातात. मात्र, भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, असा आरोप मनोज परब यांनी केला.

भूमिपुत्रांवरील अन्याय; आवाज उठविणार

भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आणि भूमिपुत्रांवर अन्याय कोणत्याही क्षणी झाला, तर आरजी नेहमी तत्पर असेल. सर्वसामान्यांच्या समस्या लोकप्रतिनिधी सोडवण्यास अपयशी ठरल्याने आरजीला आता कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी गावागावात संघटना मजबूत करण्याबरोबरच गावातील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या याबाबत टप्प्याटप्याने आवाज उठवला जाईल, असेही परब म्हणाले.

थीम पार्कला थारा नाहीच : परब

मनोज परब म्हणाले, पेडणे येथील नियोजित थीम पार्क प्रकल्पाविषयी आरजीचा पूर्णपणे विरोध आहे. याप्रकरणी जमीन घोटाळ्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. थीम पार्क केवळ नावासाठी असणार, परंतु गॅम्बलिंग कॅसिनो हे प्रकार या ठिकाणी होणार असल्याने त्याला थारा दिला जाणार नाही, असा इशारा परब यांनी दिला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण