शहरं
Join us  
Trending Stories
1
Two-Wheeler New Rules : नवीन सर्व दुचाकींना 'एबीएस आणि दोन हेल्मेट' सक्तीचे; केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा मोठा निर्णय
2
एअर इंडियानं रद्द केली ८ उड्डाणं, आता काय घडलं? पुणे, मुंबई, दिल्लीसह अनेक मोठ्या शहरांतील प्रवाशांची अडचण
3
Debt on US: ट्रम्प अडकले... संकटात अमेरिका; कर्ज ३७ ट्रिलियन डॉलर्सच्या पार, भारताचं किती देणं लागतो US
4
क्रुझर प्रेमींची पहिली पसंत; नवीन अवतारात येणार Bajaj ची Avenger, किंमत फक्त...
5
आधी स्वत:च पत्नीचं कुंकू पुसलं, नंतर बॉयफ्रेंडसोबत लग्न लावलं; पती म्हणतो, “मला विष देऊन...”
6
इराण-इस्त्रायल युद्ध आता ट्रम्प विरुद्ध पुतिन; चीन, नॉर्थ कोरियाचा हुकुमशाह उघडपणे पुढे आले
7
पंढरपुरात मोठी घटना! मित्रासोबत विठू माऊलीच्या दर्शनाला आलेल्या तरुणाचा चंद्रभागा नदीत बुडून मृत्यू
8
'वर्षभरापूर्वीच एअर इंडियाच्या बोईंगमधील खराबीची माहिती दिलेली'; अहमदाबाद विमान अपघातावर खळबळजनक दावा
9
“पप्पा, आम्हाला भारतात बोलवा अन् फोन कट”; इराणमध्ये अडकली लेक, वडिलांना सतावतेय भीती
10
अभिषेक-करिश्मा कपूरचा झालेला साखरपुडा, पण लग्न का मोडलं? बिग बींनी केलेला खुलासा
11
बँकेत जाताय? थांबा! जुलैमध्ये १३ दिवस बँका बंद राहणार; पहा तुमच्या शहरातील सुट्ट्यांची यादी
12
मुंबई महापालिकेची निवडणूक मविआ एकत्र लढणार की नाही? शरद पवार म्हणाले, "उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेची..."
13
Ashadhi Wari 2025: वारी म्हणजे केवळ पंढरपूरला चालत जाणं नव्हे, तर वारी म्हणजे सदेह वैकुंठाची वाट चालणं!
14
प्रियकरासोबत मिळून पतीची केली हत्या, लग्नाआधीपासून सुरू होते अफेअर; हत्येनंतर रचला बनाव
15
Corona Virus : बापरे! कोरोनाने वाढवलं टेन्शन, अवघ्या ४ दिवसांच्या बाळाला आणि एका महिन्यांच्या मुलीला लागण
16
मारन कुटुंबाचा वाद आला समोर, SunTV मधील हिस्स्यावरून दोन भाऊ आमने-सामने
17
Maharashtra Rain: आषाढीपुर्वीच पंढपुरात पुराचा धोका! भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
18
भारताचा उल्लेख करत पाकिस्तानी संसदेत 'गजवा ए हिंद'चा नारा; खासदाराचं चिथावणीखोर भाषण
19
१ लाखाचे झाले १४ लाख! 'या' ५ मिडकॅप म्युच्युअल फंडांचा बंपर नफा, SIP मधूनही गुंतवणूकदार कोट्यधीश!
20
"६०-७० वर्षांच्या महिलांनाही रोमान्स हवा असतो, पण...", नीना गुप्तांचं बोल्ड वक्तव्य

पक्षांतर केलेल्यांविरुद्ध आंदोलन करू; रिव्होल्युशनरी गोवन्स पुन्हा आक्रमक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2023 14:49 IST

गणेश चतुर्थीनंतर घरासमोर मांडणार ठिय्या

लोकमत न्यूज नेटवर्क पेडणे : २०२२च्या निवडणुकीत जे आमदार म्हणून निवडून एका चिन्हावर आले आणि त्यानंतर दुसऱ्या पक्षात चतुर्थीनंतर आंदोलन केले जाईल. पक्षांतर करणाऱ्या आमदारांच्या घरासमोर ठाण मांडले जाईल, तसेच वेगवेगळी आंदोलने आणि चळवळ सुरू केली जाईल, अशी माहिती रिव्होल्युशनरी गोवन्सचे मनोज परब यांनी पेडणे येथे पत्रकार परिषदेत दिली.

आरजीचे मनोज परब यांनी पेडणे नियोजित थीम पार्क येथे प्रकल्पाविषयी पत्रकार परिषदेत माहिती देण्यासाठी आयोजन केले होते. त्यावेळी पत्रकाराने विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी आरजीने पक्षांतर करणाऱ्या आमदारांविरुद्ध आंदोलन करणार, असा इशारा दिला होता, त्याचे काय झाले, याबाबत विचारणा केल्यावर परब यांनी आपली भूमिका पुन्हा एकदा स्पष्ट केली.

आमदारांचा आवाज का गप्प झाला?

विधानसभेच्या निवडणुकीत पेडणे तालुक्यातील दोन्ही मतदारसंघातून जे उमेदवार उभे राहिले आणि निवडणूक झाल्यानंतर ते आवाज का करीत नाहीत? त्यांचा आवाज गप्प का झाला, असा प्रश्न मनोज परब यांनी उपस्थित केला. पेडणे तालुक्यातील दोन्ही उमेदवार निवडणुका झाल्यानंतर मतदारसंघातील समस्यांचा अभ्यास करून केवळ तोंडी नव्हे, तर लेखी स्वरूपात वीज, पाणी, रस्ते या समस्यांवर जनतेच्या सह्या घेऊन ठिकठिकाणी नागरिकांना भेटून सरकारला, अधिकाऱ्यांना निवेदने सादर केली आहेत. आरजी केवळ मतांसाठी काम करत नाहीत, तर मतदारांना, नागरिकांना त्यांचे हक्क मिळावेत, त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायांना वाचा फोडण्यासाठी कार्यरत असल्याचा दावा परब यांनी केला.

...म्हणून आम्ही एक वर्ष गप्प होतो

परब म्हणाले, आम्ही एक वर्ष गप्प राहिलो. कार्यकर्त्यांना एका वर्षासाठी त्यांची वैयक्तिक कामे होती ती पूर्ण करण्यास मुदत दिली. आता गणेश चतुर्थीनंतर आरजी पुन्हा नव्या जोमाने, नव्या दमाने काम करणार. ज्या आमदारांनी मतदारांचा विश्वासघात करून निवडून आल्यानंतर मतदारांना बाय-बाय केले, अशा आमदारांच्या घरासमोर ठाण मांडून आंदोलन केले जाईल.

आमदाराने विधानसभेत किती प्रश्न मांडले?

आमदार प्रवीण आर्लेकर यांनी विधानसभेत पेडणेवासीयांचे किती प्रश्न मांडले? असा सवाल उपस्थित केला. मतदारसंघातून बिगर मतदारसंघातील उमेदवार निवडून येतात. स्वतःचे कल्याण साधताना माया जमवतात आणि निघून जातात. मात्र, भूमिपुत्रांचे प्रश्न सोडवले जात नाहीत, असा आरोप मनोज परब यांनी केला.

भूमिपुत्रांवरील अन्याय; आवाज उठविणार

भूमिपुत्रांच्या हक्कांसाठी आणि भूमिपुत्रांवर अन्याय कोणत्याही क्षणी झाला, तर आरजी नेहमी तत्पर असेल. सर्वसामान्यांच्या समस्या लोकप्रतिनिधी सोडवण्यास अपयशी ठरल्याने आरजीला आता कार्यवाही करावी लागेल. त्यासाठी गावागावात संघटना मजबूत करण्याबरोबरच गावातील सर्वसामान्यांचे प्रश्न, समस्या याबाबत टप्प्याटप्याने आवाज उठवला जाईल, असेही परब म्हणाले.

थीम पार्कला थारा नाहीच : परब

मनोज परब म्हणाले, पेडणे येथील नियोजित थीम पार्क प्रकल्पाविषयी आरजीचा पूर्णपणे विरोध आहे. याप्रकरणी जमीन घोटाळ्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. थीम पार्क केवळ नावासाठी असणार, परंतु गॅम्बलिंग कॅसिनो हे प्रकार या ठिकाणी होणार असल्याने त्याला थारा दिला जाणार नाही, असा इशारा परब यांनी दिला.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण