शहरं
Join us  
Trending Stories
1
Monorail Mumbai: मोनो रेल्वे पुन्हा बंद पडली, भर पावसात प्रवाशांना काढले बाहेर
2
Maharashtra Rain: आजचा दिवस पावसाचा, संपूर्ण महाराष्ट्राला झोडपणार; चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट
3
४० हजार एन्ट्री फी, अख्खी रात्र 'Nude Party'; विना कपडे येणार होते २१ मुले-मुली, आयोजकांना अटक
4
पाकिस्तानवर ‘फिरकी बाॅम्ब’; इंडियाचा मैदानावरही 'बदला'; हायव्होल्टेज सामन्यात पाकचा दणदणीत पराभव
5
सकाळपासून ते रात्री झोपेपर्यंतच्या सर्व उत्पादनांवर जीएसटी सवलत मिळणार; निर्मला सीतारामण यांचा दावा
6
आजचे राशीभविष्य- १५ सप्टेंबर २०२५: रागावर नियंत्रण ठेवा, कुटुंबियांशी वादविवाद टाळावेत!
7
‘जिल्हा परिषदां’ना बळ मिळेल? पूर्वी जिल्हा परिषद अध्यक्षांना राज्यमंत्री पदाचा दर्जा होता
8
सायबर भामट्यांनी साेडले खात्यात केवळ ८६ रुपये; बोलण्यात गुंतवून पाठवली लिंक
9
मी शिवभक्त, विष गिळून टाकतो, पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; काँग्रेसने घुसखोरांना प्रोत्साहन दिले, गरिबांना नाकारले
10
महाराष्ट्रात एका वर्षात ‘आयुष्मान’चे लाभार्थी तिप्पट; ग्रामीण भागापर्यंत विस्तार करण्याचे राज्यासमोर आव्हान
11
पूजा खेडकरांच्या घरातून अपहृत चालकाची सुटका; ऐरोलीत अपघात, कारमध्ये कोंबून नेले पुण्याला
12
मोबाइलमध्ये अडकलेली तरुणाई सरस्वतीच्या दरबारात नेणार : विश्वास पाटील
13
प्रभादेवी तिकीट कार्यालयाचे स्थलांतर कुठे? २ ते ३ दिवसांमध्ये जागा निश्चित करणार
14
बांधकामातील बदल, कराने वाढला कोस्टल रोडचा खर्च; महत्त्वाकांक्षी प्रकल्पाच्या शेवटच्या टप्प्यात २ हजार कोटींची वाढ
15
नेपाळच्या आगीत कोण आपली पोळी भाजते आहे?
16
साहित्य संमेलनाध्यक्षपदी ‘पानिपत’कार विश्वास पाटील ; १ ते ४ जानेवारीदरम्यान संमेलन होणार
17
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
18
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
19
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”

सरकारी कार्यालयांमध्ये एजंटांचा सुळसुळाट वाढला; मायकल लोबोंचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2024 10:54 IST

फाइल्स संमतीसाठी उकळतात पैसे

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सरकारी कार्यालयात फाइल्स संमत करण्यासाठी पैसे उकळणाऱ्या एजंटांचा सुळसुळाट वाढला आहे. अधिकान्यांचेही त्यांच्याशी संगनमत असते. जमिनींचे म्यूटेशन व अन्य बाबतीत अनेक घटना समोर आल्याचा घणाघाती आरोप सत्ताधारी आमदार मायकल लोबो यांनी केला आहे. विधानसभेत अर्थसंकल्पावरील चर्चेवेळी ते बोलत होते. 

अनेक ठिकाणी कार्यालयांत एजंट तयार झाले आहेत जे चार दिवसांत हे काम करून देतो, असे सांगतात. या एजंटांशी अधिकाऱ्यांचेही संबंध असून, हा प्रकार यांचविण्यासाठी कठोर पावले उचलावीत कारवाई व्हायला हवी. एखादा होतकरू तरुण स्वयंरोजगार उभारण्यासाठी स्टार्टअपक्करिता कार्यालयांमध्ये जातो, तेव्हा जमिनीचे म्युटेशन किंवा इतर बाबतीत त्याला प्रचंड अडचणी आणल्या जातात, असे होता कामा नये. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणांमध्ये लक्ष घालायला हवे, असेही लोबो म्हणाले.

आयआयटीसारख्या संस्थेला गोव्यात अजून जागा मिळत नाही ही शोकांतिका आहे. तीन ठिकाणी जागा पाहिल्या, परंतु, त्या बदलाव्या लागल्या. १५ लाख लोकसंख्येपैकी केवळ दोन-तीनशे लोक विरोध करतात आणि जागा सोडून दिल्या जातात. मुख्यमंत्र्यानी शिक्षण मंत्री म्हणून यावर गंभीरपणे विचार कराया.

राज्यातील रस्ते चांगले आहेत. परंतु, अपघातामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सौरउर्जेच्या गोष्टी आम्ही करतो. परंतु, विधानसभा संकुलालाच अजून सौरउर्जा नाही. सर्व शाळांमध्ये सौरउर्जेची व्यवस्था करा, सौर उपकरणे तेथे बसवा आणि पौडला वीज विकून पैसे मिळवा पवनचक्क्यांद्वारे वीजनिर्मिती करा, असे आवाहन त्यांनी केले. केवळ तालाव देणे, हा उपाय नव्हे. या खात्याने गोवेकर टैक्सी व्यावसायिकांमध्येच भांडणे लावली, गोवा माइल्स आणि स्थानिक टॅक्सीवाले असे दोन गट पडले असून मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालायला हवे.

५ हजार शुल्क का?

टॅक्सीवाल्यांना डिजिटल मीटर बसवण्याची सक्त्ती केली, बारा हजार रुपये भरून त्यांनी मीटरही बसवले. परंतु, आता दरवर्षी मीटरच्या नूतनीकरणासाठी म्हणून पाच हजार रुपये शुल्क आकारले जाते. टॅक्सीवाले हातावर पोट भरणारे आहेत, त्यांना हे परवडत नाही. नूतनीकरणाची एवडी फी का म्हणून आकारता? असा संतप्त सवाल लोबो यांनी केला. एकीकडे स्वयंरोजगारासाठी तरुणांना प्रोत्साहन देण्याची भाषा करायची आणि दुसरीकडे त्यांना अशी भरमसाठ फी आकारायची हे योग्य नव्हे, असे ते म्हणाले.

बार्देशला दोन दिवस पाणी नाही

लोबो यांनी बार्देशमधील पाणीटंचाईचा विषय उपस्थित केला. ते म्हणाले की, गेले दोन दिवस बार्देश तालुक्याला पा पाणी मिळालेले नाही, शिघोली मतदारसंघात हणजूष्ण व शापोरा भागात दिवसाआडही पाणी येत नाही. सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी, अभियंते भरमसाट पगार घेतात. परंतु लोकांना पाणी मिळत नाहीं, याचे कोणतेही सोयर सुतक या अधिकाऱ्यांना किंवा खात्याला नाही.

गोवा बदनाम होत आहे

राज्यात चोया, दरोडे खुनाच्या घटना वाडल्याने लोबो यांनी चिंता व्यक्त केली. गोव्यात येणाऱ्या परप्रांतीयांचे पोलिस व्हेरिफिकेशन केले जात नाही. फांदोळी येथे ज्येष्ठ नागरिकाचा खून झाला. सीसीटीव्ही कॅमे-यावरील व्यवत्तीची पोलिस व्हेरिफिकेशन नसल्याने ओळख पटू शकली नाही. त्यामुळे त्याला शोधून काढण्यासाठी पोलिसांना आता कह घ्यावे लागत आहेत. आसगाव येथील घर पाढल्याच्या प्रकरणात परिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांचा सहभाग तसेच इतर गोष्टी शरमेच्या ठरल्या. मुरुवमंत्र्यांनी गृहमंत्री म्हणून यात लक्ष घालायला हवे. उत्तर प्रदेश, बिहार, मध्य प्रदेशातून नोकरीसाठी म्हणून परप्रांतीय येतात आणि गुन्हे करतात, गोव्याचे नाय बदनाम होत आहे, असे लोबो म्हणाले.

कला अकादमीचेही वाभाडे

ते म्हणाले की, कला अकादमी नाटधगृहातील साऊंड सिस्टम सदोषच आहे. मलाही याचा वाईट अनुभव आला आहे. काही दिवसांपूर्वी भरत नाट्यमच्या एका कार्यक्रमासाठी तालीम घेताना साऊंड सिस्टम चालत नसल्याचे आढळून आल्यावर प्रयोगावेळी भाड्याने ती आणावी लागली, त्यासाठी मी माझ्या खिशातील ८० हजार रुपये दिले. कला अकादमी संकुलाला गळती लागल्याचे प्रकरण गंभीर आहे. मुख्यमंत्र्यांनी किया संबंधित खात्याच्या मंत्र्यांनी याप्रकरणी कंत्राटदार किंवा अन्य कोणी जवाबदार आहे. त्याची जबाबदारी निश्चित करून कठोर कारवाई कराची च हे प्रकरण धसास लावावे. ते पुढे म्हणाले की, लोकप्रतिनिधी माणून आम्हाला निवडून दिलेले आहे. त्यामुळे असा प्रकाराबद्दल लोक आमच्याकडे विचारणा करत असतात.

 

 

टॅग्स :goaगोवाVidhan Bhavanविधान भवनvidhan sabhaविधानसभा