शहरं
Join us  
Trending Stories
1
५ जूनलाच केलेली मोठ्या विमान अपघाताची भविष्यवाणी; अ‍ॅस्ट्रो शर्मिष्ठाची पोस्ट होतेय व्हायरल... 
2
Ahmedabad Plane Crash : सुनील तटकरे यांच्या कुटुंबातील व्यक्ती एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर...
3
Ahmedabad Plane Crash: विमानाने टेक ऑफ केले अन् काही वेळात क्रॅश झाले; त्या ८ मिनिटांत नेमके काय झाले?
4
"माझ्या मुलाने दुसऱ्या मजल्यावरून मारली उडी अन्...! ज्या वस्तिगृहावर विमान कोसळलं तेथेच जेवणासाठी गेला होता"
5
अहमदाबाद विमान अपघातावर पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया, बिलावल भुट्टो म्हणाले...
6
Air India Plane Crash: अनेकांचे गेले जीव, आतापर्यंत १०० जणांचे मृतदेह मिळाले! विमान पडले तेव्हा वसतिगृहात होते ५० विद्यार्थी
7
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
8
Ahmedabad Plane Crash: कोणती अशी २ कारणे, ज्यामुळं टेकऑफ घेताच प्लेन क्रश होऊ शकतं?; तज्ज्ञांनी सांगितले
9
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
10
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
11
Ahmedabad Plane Crash : "माझी वहिनी लंडनला जात होती, १ तासातच मला..."; अपघातानंतर कुटुंबीयांची रुग्णालयात धाव
12
डॉक्टरांच्या वसतिगृहावर कोसळलं एअर इंडियाचं विमान, इमारतीवर अडकलेला दिसला प्लेनचा मागचा भाग
13
MAYDAY कॉल म्हणजे काय?, तो तीन वेळाच का देतात? अहमदाबादहून 'टेक ऑफ'नंतर पायलटने दिलेल्या 'त्या' कॉलबद्दल...
14
भारतातील सर्वात आव्हानात्मक विमानतळ, लँडिंग-टेक ऑफ करताना पायलटचाही हात कापतो
15
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावे, खासदार तटकरेंच्या नातेवाईकांचा समावेश
16
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
17
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
18
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
19
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
20
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?

गोव्यातील दोन जलमार्गावर सौर उज्रेवरील फेरीबोटी, कोचीला भेट दिल्यानंतर गोव्याच्या मंत्र्याचे सूतोवाच

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 24, 2017 20:16 IST

हळदोणा ते पणजी व्हाया पोंबुर्पा आणि सावर्डे ते पणजी व्हाया शिरोडा अशा दोन मोठय़ा जलमार्गावर सौर उज्रेवर चालणा:या फेरीबोटी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे

पणजी : हळदोणा ते पणजी व्हाया पोंबुर्पा आणि सावर्डे ते पणजी व्हाया शिरोडा अशा दोन मोठय़ा जलमार्गावर सौर उज्रेवर चालणा:या फेरीबोटी सुरू करण्याचा सरकारचा विचार आहे, असे गोव्याचे नदी परिवहन खात्याचे मंत्री सुदिन ढवळीकर यांनी शुक्रवारी येथे जाहीर केले. केरळमधील कोची येथील फेरीबोटीची मंत्री ढवळीकर यांनी पाहणी केली व गोव्याविषयी सूचवोच केले.

गोव्यात सध्या बेती ते पणजी, चोडण ते रायबंदर वगैरे विविध मार्गावर फेरीबोट सेवा आहे. ही फेरीसेवा मोफत आहे. प्रवाशांकडून तिकीट आकारले जात नाही. कोची येथे मंत्री ढवळीकर, अधिकारी मिलिंद भोबे व इतरांनी भेट दिली व तेथील फेरीबोटीमध्ये बसून प्रत्यक्ष अनुभव घेतला. नदी परिवहन खात्याचे अधिकारीही त्यांच्यासोबत होते. केरळच्या जलवाहतूक खात्याच्या अधिका:यांसोबत ढवळीकर व इतरांची बैठक झाली. मंत्री ढवळीकर यांनी लोकमतला सांगितले, की गोव्यात सौर उज्रेवरील दोन फेरीबोटी प्रथम आणाव्यात असा विचार आहे. त्यासाठीच आम्ही कोचीला भेट दिली. तेथील फेरीबोटमधून प्रवासही केला. तिथे प्रवाशांकडून तिकीट आकारले जाते. गोव्यातही तिकीट आकारावे लागेल.

मंत्री ढवळीकर म्हणाले, की सावर्डेहून पणजीला बसगाडीने येण्यासाठी जेवढा खर्च येतो, त्यापेक्षा कमी तिकीट फेरीबोटीमध्ये आकारले जाईल. तिस ते पस्तीस रुपये आकारणो योग्य ठरेल. सौर उज्रेवरील फेरीबोटमधून प्रवास केल्यास केवळ एक तासात सावर्डेहून पणजीत पोहचता येईल. शिवाय अपघाताचाही धोका संभवत नाही. सावर्डे ते शिरोडा, बोरी, दुर्भाट, बाणस्तारी, जुनेगोवे, चोडण व पणजी असा प्रवास फेरीबोटीने करता येईल. सरकार त्यासाठी प्रयत्नशील आहे. 

ढवळीकर म्हणाले, की हळदोणा ते पणजी अशीही सौर उज्रेवरील फेरीबोट सेवा आम्हाला सुरू करायची आहे. अशा प्रकारच्या पंचाहत्तर आसनांच्या एका बोटीच्या निर्मितीवर एकूण सुमारे सव्वा दोन कोटी ते अडिच कोटी रुपयांचा खर्च येतो. ताशी चाळीस किलोमीटर वेगाने फेरीबोट धावू शकते. जेवढा वेग वाढविला जातो, तेवढी सौर उर्जा जास्त लागते. गोव्यात या फेरीबोटींचा प्रयोग सरकार करून पाहील. फक्त सध्याप्रमाणो मोफत प्रवास करता येणार नाही.