शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

विधानसभा निवडणुका साडेतीन वर्षानंतरच; भाजपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:06 IST

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला.

पणजी : गोवा विधानसभा निवडणुका येत्या लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा मुळीच विचार नाही. विद्यमान सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करील. येत्या साडेतीन वर्षानंतरच मग विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी येथे सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पर्वरी येथे पार पडली. त्यानंतर तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर व सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी पणजीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजप कार्यकर्त्यांमधील व काही आमदारांमधील असंतोषाविषयी पत्रकारांनी विचारताच तेंडुलकर म्हणाले, की कार्यकर्त्यांना आपण भेटलो. त्यांचे म्हणणे ऐकले व मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय त्यांना पटवून दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील वाद आता मिटला. लोकसभा निवडणुकीवर गोव्यात त्याचा काही परिणाम होणार नाही. 

मुख्यमंत्री पर्रीकर व आमदार पांडुरंग मडकईकर हे कधी परत येतील, असे पत्रकारांनी विचारताच तेंडुलकर म्हणाले की पर्रीकर परत येतील पण ते केव्हा येतील याची कल्पना नाही. मडकईकर यांची प्रकृती सुधारली आहे पण ते लगेच चालत रोज सचिवालयात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी निलेश काब्राल यांच्याकडे वीज खाते सोपवावे लागले. काब्राल यांना मंत्री करावे लागले. वीजेचे प्रश्न तातडीने सोडवावे लागतात. काब्राल ते काम करतील. फोंडय़ातील वादळानंतरही त्यांनी जलदगतीने काम केले. मडकईकरांचे आरोग्य पूर्ण सुधारल्यानंतर व ते पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांच्याविषयी मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील. 

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती राज्य कार्यकारिणी बैठकीत देण्यात आली. महात्मा गांधी जयंतीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याने भाजपकडून देशभर येत्या दि. 2 ऑक्टोबरपासून दि. 3 जानेवारीपर्यंत पदयात्रा काढली जाईल. गांधीजींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश व त्यांचा वारसा सर्वत्र पोहचविला जाईल. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गोव्यात पक्षाचे काम वाढविणे, बूथस्तरापासून संघटना मजबूत करणे हे सगळे सुरू आहे, असे खासदार सावईकर यांनी सांगितले.

दोन तासांत बैठक आटोपलीदरम्यान, भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक ही पूर्वी एक दिवसाची होत असे. नंतर ती अर्ध्या दिवसाची होऊ लागली. शनिवारी फक्त दोन तासांत कार्यकारिणी बैठक आटोपली. प्रत्येक राज्य कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेऊन सरकारने केलेल्या प्रगतीविषयी अभिनंदन करण्याचा ठराव संमत करून घेतला जात असे. मात्र, शनिवारच्या बैठकीत तसा कोणताच ठराव घेतला गेला नाही, असे बैठकीस उपस्थित राहिलेल्या काही सदस्यांनी लोकमतला सांगितले. पर्रीकर यांना एनआयटीने डिलीट पदवी दिल्यामुळे पर्रीकर यांचे अभिनंदन करणारा ठराव तेवढा घेतला गेला. तसेच सर्जिकल स्ट्राईकविषयी पंतप्रधानांच्या निर्णयाचे अभिनंदन केले गेले.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर