शहरं
Join us  
Trending Stories
1
“राज ठाकरे यांना जवळ करणे राजकीय सोय, ठाकरे गटाचे ७५ नगरसेवक शिंदेंकडे गेले”: चंद्रकांत पाटील
2
पाऊस थांबला! लगेच आकाश दीपचा 'हमला'! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन विकेट्स अन् इंग्लंडचा अर्धा संघ तंबूत (VIDEO)
3
मतदारयाद्यांतील गैरप्रकार रोखण्यास काँग्रेसची समिती; अध्यक्ष पृथ्वीराज चव्हाण अहवाल देणार
4
अंत्यसंस्कारासाठी मृतदेह घेऊन निघाले अन् घरी जिवंत सापडली 'ती' व्यक्ती; जळगावातील प्रकार
5
“जीवनात ही घडी अशीच राहू दे”; फोटो शेअर करत बाळा नांदगावकरांची पांडुरंगाकडे प्रार्थना
6
मनातलं सगळंच सांगितलं; प्रताप सरनाईकांचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना ३ पानी खुलं पत्र
7
बर्मिंगहॅमच्या मैदानात पावसाची बॅटिंग! इंग्लंडच्या ७ विकेट्स घेण्यासाठी टीम इंडियाला किती षटके मिळणार?
8
“एकाचं भाषण अपूर्ण अन् दुसऱ्याचं अप्रासंगिक, तर पूर्ण कार्यक्रम अवास्तव”; भाजपाची टीका
9
१६ वर्षे अत्याचार झालेल्या मुलींच्या मृतदेहाची लावत होता विल्हेवाट; एका घटनेमुळे केला खुलासा
10
आधी कॅब चालकांची करायचे हत्या, दऱ्यांमध्ये फेकायचे मृतदेह; सीरियल किलरला अखेर अटक
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसानचा २०वा हप्ता 'या' दिवशी खात्यात येणार? आत्ताच यादी तपासा!
12
राज्यात सुरू असलेल्या भाषा वादावर बाबा रामदेव यांची पहिली प्रतिक्रिया, स्पष्टच बोलले; दिला असा सल्ला
13
सोलापूर : 'तुझ्यामुळेच माझी बायको...'; सावत्र दिराने भावजयीच्या मानेवर कुऱ्हाडीने केला वार, जागेवरच गेला जीव
14
“विठ्ठला...! सरकारला कर्जमाफी देण्याची सद्बुद्धी दे...”; आषाढी एकादशीला बच्चू कडूंची पोस्ट
15
ऐकवं ते नवलंच! पोलिसात भरती झाला, पण १२ वर्षे ड्युटीवरच गेला नाही; तरीही मिळाली ₹२८ लाख पगार
16
हाफिज सईद आणि मसूद अजहर भारताकडे सोपवू, पण...; बिलावल भुट्टो यांची 'ती' मागणी काय?
17
ENG vs IND : इंग्लंड टेस्ट मॅच ड्रॉ करण्यासाठी खेळणार? कोच म्हणाला, आम्ही एवढेही मूर्ख नाही की,...
18
'देशात गरीब वाढत चाललेत आणि काही श्रीमंताच्या हातात संपत्ती चाललीये'; नितीन गडकरींनी व्यक्त केली चिंता
19
"२० कोटी दिले तरी ...", बिग बॉस १९ मध्ये सहभागी होण्याच्या चर्चांवर राम कपूरने सोडलं मौन
20
ज्या घटनेमुळे बापाने केली हत्या, त्यात आईचा होता सहभाग; कोल्हापुरातील प्रकरणात काय आले समोर?

विधानसभा निवडणुका साडेतीन वर्षानंतरच; भाजपचा दावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 22:06 IST

मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला.

पणजी : गोवा विधानसभा निवडणुका येत्या लोकसभा निवडणुकीसोबत घेण्याचा मुळीच विचार नाही. विद्यमान सरकार पाच वर्षांचा कालावधी पूर्ण करील. येत्या साडेतीन वर्षानंतरच मग विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकर यांनी शनिवारी येथे सांगितले. मंत्रिमंडळ विस्ताराच्या विषयावरून कार्यकर्त्यांनी त्यांची मते व्यक्त केली तरी, आम्ही चर्चा करून कार्यकर्त्यांना विषय पटवून दिला व त्यामुळे वाद मिटला असा दावा तेंडुलकर यांनी केला.

भाजपच्या राज्य कार्यकारिणीची बैठक शनिवारी पर्वरी येथे पार पडली. त्यानंतर तेंडुलकर, खासदार नरेंद्र सावईकर व सरचिटणीस सदानंद तानावडे यांनी पणजीत संयुक्त पत्रकार परिषद घेतली. भाजप कार्यकर्त्यांमधील व काही आमदारांमधील असंतोषाविषयी पत्रकारांनी विचारताच तेंडुलकर म्हणाले, की कार्यकर्त्यांना आपण भेटलो. त्यांचे म्हणणे ऐकले व मंत्रिमंडळ विस्ताराचा विषय त्यांना पटवून दिला. त्यामुळे कार्यकर्त्यांमधील वाद आता मिटला. लोकसभा निवडणुकीवर गोव्यात त्याचा काही परिणाम होणार नाही. 

मुख्यमंत्री पर्रीकर व आमदार पांडुरंग मडकईकर हे कधी परत येतील, असे पत्रकारांनी विचारताच तेंडुलकर म्हणाले की पर्रीकर परत येतील पण ते केव्हा येतील याची कल्पना नाही. मडकईकर यांची प्रकृती सुधारली आहे पण ते लगेच चालत रोज सचिवालयात येऊ शकणार नाहीत. त्यामुळे त्यांच्याऐवजी निलेश काब्राल यांच्याकडे वीज खाते सोपवावे लागले. काब्राल यांना मंत्री करावे लागले. वीजेचे प्रश्न तातडीने सोडवावे लागतात. काब्राल ते काम करतील. फोंडय़ातील वादळानंतरही त्यांनी जलदगतीने काम केले. मडकईकरांचे आरोग्य पूर्ण सुधारल्यानंतर व ते पूर्ण बरे झाल्यानंतर त्यांच्याविषयी मुख्यमंत्री काय तो निर्णय घेतील. 

भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने घेतलेल्या विविध निर्णयांची माहिती राज्य कार्यकारिणी बैठकीत देण्यात आली. महात्मा गांधी जयंतीला दीडशे वर्षे पूर्ण झाल्याने भाजपकडून देशभर येत्या दि. 2 ऑक्टोबरपासून दि. 3 जानेवारीपर्यंत पदयात्रा काढली जाईल. गांधीजींनी दिलेला स्वच्छतेचा संदेश व त्यांचा वारसा सर्वत्र पोहचविला जाईल. निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून गोव्यात पक्षाचे काम वाढविणे, बूथस्तरापासून संघटना मजबूत करणे हे सगळे सुरू आहे, असे खासदार सावईकर यांनी सांगितले.

दोन तासांत बैठक आटोपलीदरम्यान, भाजपची राज्य कार्यकारिणी बैठक ही पूर्वी एक दिवसाची होत असे. नंतर ती अर्ध्या दिवसाची होऊ लागली. शनिवारी फक्त दोन तासांत कार्यकारिणी बैठक आटोपली. प्रत्येक राज्य कार्यकारिणी बैठकीत राज्य सरकारच्या कामाचा आढावा घेऊन सरकारने केलेल्या प्रगतीविषयी अभिनंदन करण्याचा ठराव संमत करून घेतला जात असे. मात्र, शनिवारच्या बैठकीत तसा कोणताच ठराव घेतला गेला नाही, असे बैठकीस उपस्थित राहिलेल्या काही सदस्यांनी लोकमतला सांगितले. पर्रीकर यांना एनआयटीने डिलीट पदवी दिल्यामुळे पर्रीकर यांचे अभिनंदन करणारा ठराव तेवढा घेतला गेला. तसेच सर्जिकल स्ट्राईकविषयी पंतप्रधानांच्या निर्णयाचे अभिनंदन केले गेले.  

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाManohar Parrikarमनोहर पर्रीकर