शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

पणजीनंतर आता रायबंदरवासिय स्मार्ट सिटीच्या कामाने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2024 16:07 IST

रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत.

नारायण गावस, पणजी:स्मार्ट सिटीच्या कामाने पणजी लोक गेली अनेक वर्षे त्रास सहन करत आहेत. आता रायबंदरमध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने या भागातील नागरिक या कामाने त्रस्त झाले आहेत. गेले वर्ष होत आले या भागातील सांडपाण्याची पाईपलाईन ाघालण्यासाठी खाेदकाम सुरु आहे. त्यामुळे येथे ठिकठिकाणी कठडे घालण्यात आले असून मोठ्या वाहनांना बंदी घातली आहे. रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत.

कठडे घालण्यात आल्याने गाड्या घरी नेताना त्रास होत आहे. तसेच बाहेर जाताना धुरळाचा सामना करावा लागतो. घरात सर्वत्र मातीचा धूरळ परसला आहे. गेले वर्ष होत आले या ठिकाणी खोदकाम सुरु आहे. पण काम संथगतीने सुरु असल्याने सर्वांना त्रास हाेत आहे. असे आता रायबंदरवासिय लोक म्हणतात. लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन रस्ता सुरळीत करावा अशी मागणी आता आता रायबंदरवासियांकडून केली जात आहे.

रायबंदराचे रहिवाशी मायकल डायस म्हणाले, गेले अनेक महिने सुरु असलेल्या या कामाचा आम्हाला आता कटाळा आला आहे. घरामध्ये सर्वत्र धूरळ पसरली आहे. अगोदरच रस्ता अरुंद त्यात हे बांधकाम असल्याने आता दुचाकी नेतानाही त्रास होता आहे. आम्हाला मोठ्या गाड्या घरी आणता येत नाही. ठिकठिकाणी कठडे घातले आहेत. धूरळावर वेळेत पाणी मारले जात नाही. तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी लक्ष घालत नसल्याने याचा फटका आम्हाला बसला आहे.

ॲड. आयरिश रॉड्रिग्ज म्हणाले, रायबंदर येथील रस्ते खोदण्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. कधीही न संपणाऱ्या अनियोजित आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या स्मार्ट सिटी कामांमुळे अडकलेल्या रहिवाशांसह धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले असून आरोग्य आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आमच्या रहिवाशांच्या आरोग्याशी तडजोड केली जात असल्याने ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सध्या सुरू असलेल्या कामांचे भवितव्य काय असेल हे कोणालाच माहीत नसताना सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या तथाकथित विकासकामांच्या गुणवत्तेची हमी स्वत: अधिकारी देऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे.

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी