शहरं
Join us  
Trending Stories
1
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
2
"Today I say to the whole world..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
3
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
4
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
5
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...
6
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
7
आयपीएल २०२५ मध्ये हेनरिक क्लासेनं मारला सर्वात लांब षटकार, पाहा टॉप १० खेळाडूंची यादी
8
'ओयो'विरोधात तक्रार करणारा रिसॉर्ट मालकच आला अडचणीत; अग्रवाल यांच्यावर दाखल झाला होतो गुन्हा
9
...तोपर्यंत तृणमूल काँग्रेसचे खासदार साकेत गोखले यांचा पगार जप्त करा, हायकोर्टाचे आदेश, कारण काय? 
10
जबरदस्त! पाकिस्तानने जिथे घोषणा केली, त्याच समुद्रात भारताने केली Destroyer मिसाइलची चाचणी
11
पहलगाम हल्ल्यातील जखमींसाठी मुकेश अंबानींची मोठी घोषणा; म्हणाले 'दहशतवाद हा मानवतेचा शत्रू..'
12
"पहलगाममधील हल्ला एक कटकारस्थान, स्क्रिप्ट आधीच लिहिली गेली होती’’, आरजेडीच्या नेत्याचं वादग्रस्त विधान
13
दिल्ली उच्च न्यायालयाने स्विगी, झेप्टोला नोटीस पाठवली, एनजीओने दाखल केली याचिका; नेमकं प्रकरण काय?
14
नववर्षातील पहिला शुक्र प्रदोष: व्रताचरण करा, सुख-सौख्य मिळवा; महादेव भरभराट करतील
15
भारताच्या कारवाईने पाकिस्तानची 'हवा टाईट'! मिसाइल चाचणीची केली घोषणा, सर्वत्र 'हाय अलर्ट'
16
सीमा हैदर भारतातच राहणार, झाले स्पष्ट! सर्व पाकिस्तानींना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश पण...
17
मायेची फुंकर! ब्रेकअप, स्ट्रेस, रागावर फक्त एकाच थेरपीने उपचार, उशी ठरतेय वेदनांवरची डॉक्टर
18
सलग ७ दिवसांच्या वाढीला ब्रेक! एफएमसीजी आणि रिअल्टीमुळे बाजार कोसळला; 'या' शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ
19
WhatsApp वापरकर्त्यांसाठी आनंदाची बातमी! अ‍ॅडव्हान्स्ड चॅट प्रायव्हसी फीचर आले, कसे वापरायचे जाणून घ्या
20
मुंबई: 'लिव्ह इन पार्टनरने दिला गुलिगत धोका; ज्याच्यावर जडला जीव तोच सोन्याचे दागिने घेऊन फरार

पणजीनंतर आता रायबंदरवासिय स्मार्ट सिटीच्या कामाने त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2024 16:07 IST

रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत.

नारायण गावस, पणजी:स्मार्ट सिटीच्या कामाने पणजी लोक गेली अनेक वर्षे त्रास सहन करत आहेत. आता रायबंदरमध्ये स्मार्ट सिटीचे काम सुरु असल्याने या भागातील नागरिक या कामाने त्रस्त झाले आहेत. गेले वर्ष होत आले या भागातील सांडपाण्याची पाईपलाईन ाघालण्यासाठी खाेदकाम सुरु आहे. त्यामुळे येथे ठिकठिकाणी कठडे घालण्यात आले असून मोठ्या वाहनांना बंदी घातली आहे. रायबंदरवासियांना आता या स्मार्ट सिटीच्या खोदकामाचा कंटाळा आला असून काही जणांनी येथे घातलेले कठडे काढले आहेत.

कठडे घालण्यात आल्याने गाड्या घरी नेताना त्रास होत आहे. तसेच बाहेर जाताना धुरळाचा सामना करावा लागतो. घरात सर्वत्र मातीचा धूरळ परसला आहे. गेले वर्ष होत आले या ठिकाणी खोदकाम सुरु आहे. पण काम संथगतीने सुरु असल्याने सर्वांना त्रास हाेत आहे. असे आता रायबंदरवासिय लोक म्हणतात. लवकरात लवकर हे काम पूर्ण करुन रस्ता सुरळीत करावा अशी मागणी आता आता रायबंदरवासियांकडून केली जात आहे.

रायबंदराचे रहिवाशी मायकल डायस म्हणाले, गेले अनेक महिने सुरु असलेल्या या कामाचा आम्हाला आता कटाळा आला आहे. घरामध्ये सर्वत्र धूरळ पसरली आहे. अगोदरच रस्ता अरुंद त्यात हे बांधकाम असल्याने आता दुचाकी नेतानाही त्रास होता आहे. आम्हाला मोठ्या गाड्या घरी आणता येत नाही. ठिकठिकाणी कठडे घातले आहेत. धूरळावर वेळेत पाणी मारले जात नाही. तसेच स्मार्ट सिटीचे अधिकारी लक्ष घालत नसल्याने याचा फटका आम्हाला बसला आहे.

ॲड. आयरिश रॉड्रिग्ज म्हणाले, रायबंदर येथील रस्ते खोदण्याचे काम वर्षभरापासून सुरू आहे. कधीही न संपणाऱ्या अनियोजित आणि अत्यंत निकृष्ट दर्जाच्या स्मार्ट सिटी कामांमुळे अडकलेल्या रहिवाशांसह धुळीचे प्रदूषण मोठ्या प्रमाणावर झाले असून आरोग्य आणि सुरक्षिततेला गंभीर धोका निर्माण झाला आहे. आमच्या रहिवाशांच्या आरोग्याशी तडजोड केली जात असल्याने ही अत्यंत चिंतेची बाब आहे. सध्या सुरू असलेल्या कामांचे भवितव्य काय असेल हे कोणालाच माहीत नसताना सर्वसामान्यांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. या तथाकथित विकासकामांच्या गुणवत्तेची हमी स्वत: अधिकारी देऊ शकत नाही, मुख्यमंत्र्यांनी यात लक्ष घालावे.

टॅग्स :goaगोवाSmart Cityस्मार्ट सिटी