शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

काश्मिरच्या घटनेनंतर गोव्याच्या खास दर्जाचा मुद्दा संपुष्टात

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2019 23:01 IST

गोव्याला खास दर्जा देणो शक्य नाही हे यापूर्वी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे.

पणजी : गोव्याला खास दर्जा देण्याचा मुद्दा आता जवळजवळ पूर्णपणोच संपुष्टात आला आहे. काश्मिरचा खास दर्जा केंद्र सरकारने काढून घेतल्यानंतर गोव्याला खास दर्जा मिळणो शक्यच नाही हे अधिक स्पष्ट झाले आहे. सरकारसह विरोधी पक्षातीलही अनेकांना ही  गोष्ट पटली आहे.गोव्याला खास दर्जा देणो शक्य नाही हे यापूर्वी केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे. लक्ष्मीकांत पार्सेकर मुख्यमंत्रीपदी असताना त्यांनीही गोव्याला खास दर्जा मिळणार नाही हे स्पष्ट केले होते. विद्यमान मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनीही खास दर्जाचा मुद्दा निकालात काढला आहे. तथापि, प्रत्येक निवडणुकीवेळी सर्व पक्षांकडून गोव्याला खास दर्जा दिला जाण्याची ग्वाही दिली जाते. केंद्र सरकारने अलिकडील काळात कुठच्याच राज्याला खास दर्जा दिला नाही. प्रसंगी या विषयावरून केंद्रातील भाजपने घटक पक्षांसोबत संघर्षही केला. गोव्याला आर्थिक पॅकेज नको पण जमिनी आणि अस्मिता राखण्यासाठी खास दर्जा द्यायला हवा, अशी भूमिका यापूर्वी राज्यातील काही एनजीओंनी घेतली होती. भाजपनेही या भूमिकेला तत्वत: मान्यता दिली होती व काँग्रेसचीही तिच भूमिका होती. 2क्14 सालच्या लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी गोवा भेटीवर आले असता, त्यांनी या भूमिकेचे कौतुक केले होते. गोमंतकीय आर्थिक पॅकेज मागत नाहीत तर शेत जमिनी, संस्कृती- अस्मिता राखण्यासाठी खास दर्जा  मागतात याचे कौतुक वाटते असे मोदी तेव्हा म्हणाले होते. मात्र काश्मिरचा खास दर्जा मागे घेतला गेल्यानंतर कुठलेच राज्य खास दर्जा मागण्यास आता पुढे येणार नाही याची कल्पना सर्वानाच आली आहे. गोवा सरकार उलट आता गोव्यासाठी आर्थिक पॅकेज मागत आहे. जमिनी व अस्मितेचे रक्षण करण्यासाठी स्थानिक कायद्यांमध्येच तरतुदी करता येतील अशी भूमिका काही मंत्र्यांनी घेतली आहे. गोव्याला खास दर्जा मिळावा म्हणून झालेल्या चळवळीत आमदार अॅलिना साल्ढाणा ह्या देखील होत्या. त्यांनी या विषयावर आता मौन पाळले आहे. गोवा म्हणजे स्वतंत्रच काही तरी आहे असा दावा सातत्याने करत आलेला गोव्यातील एक विशिष्ट वर्गही आता गोव्याला खास दर्जा द्या अशी मागणी करण्याचे धैर्य गमावून बसला आहे.दरम्यान, काश्मिरचा खास दर्जा हटविण्याच्या केंद्राच्या निर्णयाला दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही पाठींबा दिला. गोव्यातील आम आदमी पक्षाला याविषयी काय वाटते असा प्रश्न जाहीरपणे आता वकील आणि सामाजिक विषयांचे भाष्यकार राधाराव ग्रासियस यांनी केला आहे. आपने गोव्याला खास दर्जाचे आश्वासन दिले नव्हते काय अशीही विचारणा ग्रासीयस यांनी केली आहे.

टॅग्स :goaगोवा