शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

गोव्यामध्ये नगरपालिकांवर सल्लागार समित्या येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 14, 2018 19:57 IST

राज्यातील सर्व नगरपालिकांवर यापुढे जबाबदार नागरिकांच्या सल्लागार समित्या येणार आहेत.

पणजी : राज्यातील सर्व नगरपालिकांवर यापुढे जबाबदार नागरिकांच्या सल्लागार समित्या येणार आहेत. पालिकांवर निवडून येणारे नगरसेवकांचे मंडळच सल्लागार समिती नेमणार आहे पण तशी तरतूद आता प्रथमच सरकारकडून पालिका कायद्यात केली जाणार आहे. ग्रामसभांप्रमाणोच या सल्लागार समिती काम करतील.

नगरपालिकांवरील सल्लागार समित्यांवर पालिका क्षेत्रतील जबाबदार नागरिकांची नियुक्ती केली जाईल. ग्रामसभांच्या जशा बैठका होतात व पंचायत क्षेत्रतील प्रश्नांवर चर्चा होते, तशा सभा पालिकांमध्ये भरत नाहीत. नगराध्यक्ष, नगरसेवक यांची मंडळे जो काही निर्णय घेतात, तोच अंतिम ठरत असतो. ग्रामपंचायतींवर मंडळांना ग्रामसभांकडून तरी जाब विचारला जातो. पालिकांना जाब विचारणारे कुणी नाहीत. या पार्श्वभूमीवर नगरपालिकांवर काही प्रतिष्ठित नागरिकांच्या सल्लागार समित्या नेमल्या तर पालिका क्षेत्रतील प्रश्न, समस्या, एखादा प्रकल्प व एकूणच विकास कामे याविषयी चर्चा करून योग्य व अयोग्य काय ते ठरवता येईल, असे सरकारला वाटते.

नगर विकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी शनिवारी येथे लोकमतला सांगितले, की पालिका कायदा पूर्णपणे बदलला जाणार असून मसुदा तयार झाला आहे. सरकारने सर्व पालिकांकडे सूचना मागविल्या होत्या. अजून मसुदा आम्ही खुला केलेला नाही पण पालिका कायद्यात कोणत्या आणखी तरतुदी करणे पालिकांना अपेक्षित आहे हे सुचवण्यास आम्ही पालिकांना सांगितले होते. सर्वानी प्रतिसाद दिला नाही. मसुदा यापुढे खुला केला जाईल. 

मंत्री डिसोझा म्हणाले, की पालिका कायद्यात अनेक महत्त्वपूर्ण तरतुदी केल्या जातील. पालिकांच्या ताब्यात अनेक दुकाने असतात. पालिकांनी ती दुकाने ज्याला भाड्यावर दिलेली असतात, तो मग आपले दुकान तिस-यालाच सबलिजवर देतो. अशा प्रकारे सबलिजवर देणे हे बेकायदा असते पण बहुतांश पालिका क्षेत्रांमध्ये दुकाने अशीच दिली गेली आहेत. यापुढे सबलिजवर देताना पालिकेशी करार करावा लागेल. पालिकेला ठराविक शुल्क द्यावे लागेल. सबलिजवर देण्यास बंदी केली जाणार नाही पण लिज ट्रान्सफर करताना पालिकेला कल्पना द्यावी लागेल व पालिकेला हस्तांतरण शुल्कही भरावे लागेल.