शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर प्रशासक येणार!; राष्ट्रपतींची गोव्याच्या कायदा दुरुस्ती विधेयकाला मंजुरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2024 11:44 IST

सरकारचा मार्ग मोकळा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गैरव्यवहार करणाऱ्या संस्थांवर प्रशासक नेमण्याचे अधिकार सरकारला देणाऱ्या सोसायटी रजिस्ट्रेशन (गोवा दुरुस्ती) विधेयकाला राष्ट्रपती राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी मंजुरी दिली आहे. विधानसभेच्या गेल्या पावसाळी अधिवेशनात हे दुरुस्ती विधेयक संमत झाले होते.

राज्यात अनेक सोसायट्या (संस्था) एक तर आर्थिक व्यवहारांचा योग्य हिशोब न ठेवणे किंवा निवडणूक प्रक्रियेतील गैरप्रकारांमुळे चर्चेत आहेत. भंडारी समाजाची निवडणूक अशाच कारणामुळे सध्या गाजत आहे. राज्यातील अनेक संस्थांमध्ये गैरप्रकार घडत असल्याने प्रशासक नेमण्याची तरतूद राज्य सरकारला कायदा दुरुस्तीतून आणावी लागली. हा विषय केंद्र व राज्य सरकार अशा दोघांच्याही अखत्यारित येत असल्याने राज्यपालांना गेल्या ७ ऑगस्ट रोजी विधानसभेत संमत झालेले हे विधेयक मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवावे लागले.

एखाद्या सोयायटीमध्ये गैरकारभार किंवा कोणत्याही प्रकारचा गैरव्यवहार झालेला असेल आणि संस्था महानिरीक्षकांनी तसा अहवाल दिला असेल किंवा अन्य कोणत्याही माध्यमातून सरकारचे कारवाई करण्याबाबत कारणासंबंधी समाधान झालेले असेल तर अशा सोसायट्यांवर आता सरकारला थेट प्रशासक नेमता येईल. यासाठी कायद्यात कलम २० अ, अ चा अंतर्भाव केला आहे.

कलम २० ई-मध्ये दुरुस्ती करून महानिरीक्षकांनाही वरील नवीन कलमानुसार संरक्षण दिलेले आहे. सोसायटीने पोटनियमांचे उल्लंघन केलेले असेल, योग्य हिशोब ठेवलेला नसेल, निवडणूक प्रक्रियेत गैरप्रकार केलेला असेल तर या संस्था आता सरकारच्या रडारवर येतील.

सरकारला 'बळ'

सोसायटीचा सदस्य नसलेल्या कोणत्याही व्यक्तीला प्रशासक नेमता येईल किंवा तिघांची प्रशासकीय समिती नेमता येईल. तसेच यापैकी एकाला समितीच्या अध्यक्षपदी नेमता येईल. प्रारंभी ही समिती सहा महिन्यांपेक्षा अधिक कालावधीची नसावी. नंतर लेखी स्वरूपाची विनंती आल्यास सरकारला आपल्या मर्जीनुसार कालावधी दर सहा महिन्यांनी वाढवता येईल. कमाल चार वर्षांपर्यंतच प्रशासक किंवा प्रशासकीय समिती ठेवता येईल.

भंडारी समाज निवडणूक : तरतुदींचा पाडला कीस

सोसायटी रजिस्ट्रेशन कायद्याचा भंडारी समाजाच्या प्रकरणातही वकिलांनी कीस पाडला होता. संस्था महानिरीक्षकांनी भंडारी समाजाचे अध्यक्ष अशोक नाईक यांच्या नेतृत्वाखालील समिती बेकायदा ठरवणारा निवाडा दिला होता. हा निवाडा २५ ऑक्टोबर रोजी हायकोटनि तांत्रिक कारणावरून रद्द ठरविला होता. यावेळी सुनावणीत नाईक गटाच्या वकिलांनी या कायद्यातील कलम २० अ वर युक्तिवाद केला होता. सोसायटी नोंदणी कायद्याच्या कलम २० अ अंतर्गत आवश्यकतेनुसार अशोक नाईक पॅनलला योग्य कारणे दाखवा नोटीस जारी केली गेली नाहीत, असे म्हणणे वकिलांनी मांडले होते व संस्था महानिरीक्षकांचा निवाडा कसा अन्याय्य आहे, हे दाखवून दिले होते.

 

टॅग्स :goaगोवाPresidentराष्ट्राध्यक्षState Governmentराज्य सरकार