शहरं
Join us  
Trending Stories
1
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती; आमदारकीही जाणार नाही, आज काय घडलं?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय; २९ देशांतील अमेरिकन राजदुतांना तडकाफडकी परत बोलावले; काय आहे कारण?
3
'मी हे विकत घेऊ शकत नाही' असे म्हणणे सोडा! रॉबर्ट कियोसाकींनी सांगितला श्रीमंतीचा नवा मंत्र
4
VIDEO : "सर्वस्व दिलं, तरीही मनासारखं नाही घडलं!" रोहित शर्मा 'त्या' गोष्टीबद्दल पहिल्यांदाच बोलला
5
आता मनमानी चालणार नाही! रुग्णालयांना आधीच सांगावा लागणार आयसीयू-व्हेंटिलेटरचा खर्च; 'यांची' मंजुरीही आवश्यक
6
थरारक घटना! टेकऑफनंतर काही मिनिटांतच Air India विमानाचा यू टर्न; हवेत अडकला प्रवाशांचा श्वास
7
सैराटची पुनरावृत्ती! आंतरजातीय विवाहामुळे बदल्याची आग; बापानेच केली गर्भवती लेकीची हत्या
8
रस्त्यांवर झाडू मारतोय भारतीय 'सॉफ्टवेअर डेव्हलपर'! महिना सव्वा लाखाची कमाई; कंपनी का देते इतके पैसे?
9
विधवा वहिनीचं दीरासोबतच सुरू झालं अफेअर अन् अचानक घरातून झाली गायब! एक महिन्यानंतर जे समोर आलं... 
10
तुम्ही वापरत असलेला चार्जर FAKE तर नाहीये ना? कसा ओळखायचा ओरिजनल चार्जर, टाळू शकता मोबाइलचं होणारं नुकसान
11
Mumbai Crime: मुंबईतील धक्कादायक प्रकार! चालत्या लोकलमधून मुलीला खाली फेकलं; Video व्हायरल, आरोपीला पकडलं
12
भीषण अपघात! इंडोनेशियात डिव्हायडरला धडकून बस महामार्गावर उलटली, १६ जणांचा मृत्यू
13
सहा पक्षांच्या जय, पराजयाचा संदेश काय? भाजपपेक्षा एकनाथ शिंदेंना सर्वाधिक यश? एवढा विस्तृत लेख कुठेच मिळणार नाही...
14
बॉलिवूडचे चर्चेतले चेहरे अक्षय खन्ना-सनी देओल २९ वर्षांनंतर एकत्र दिसणार? 'या' सिनेमाची चर्चा
15
Budh Gochar 2025: २०२५ ला निरोप देताना 'या' ७ राशींचे नशीब चमकणार, आयुष्यात येणार सुवर्णकाळ
16
लग्नाच्या आदल्या रात्री वडील ओरडले; नवरदेवाच्या लागलं मनाला, वरातीऐवजी घरातून निघाली अंत्ययात्रा!
17
कोट्यधीश होण्याचे स्वप्न आता होणार पूर्ण! २१X१०X१२ हा फॉर्म्युला वापरा; ५१ व्या वर्षी व्हाल मालामाल
18
KVP Scheme: पैसा दुप्पट करणारी सरकारी स्कीम; विना जोखीम 'इतक्या' महिन्यांत तुमचे पैसे होतील दुप्पट
19
केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू अजमेर दर्ग्यावर चादर चढवणार; म्हणाले, "दुआ करने जा रहा हूं..."
20
भाडं वाढणार; १००, २००, ५०० कोटी नाही तर, 'इतक्या' कोटींचा होणार रेल्वेला बंपर फायदा, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

ईव्हीएम विरोधातील आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; सीईओच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

By समीर नाईक | Updated: March 4, 2024 16:41 IST

अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली.

पणजी:  राष्ट्रपती यांच्याकडे विषय पोहचवणार या मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांच्या आश्वासनानंतर, ईव्हीएम विरोधातील आंदोलन लोकांनी मागे घेतले. या दरम्यान पोलिस आणि आंदोनकर्त्यांमध्ये संघर्ष  झाला, ज्यातून ॲड. प्रतिमा कुतीन्हो, मन्सूर शेख व काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

सोमवारी सकाळपासून राज्यातील लोकांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केले. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिन्हो येथील बंगल्यावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला,  ज्यातून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. 

अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली. या शिष्टमंडळमध्ये दिल्लीतील ॲड. भानुप्रताप सिंग, डी. सी कपिल, रमा काणकोणकर, शंकर पोळजी यांचा समावेश होता. सीईओच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आहे.

देशात ईव्हीएम विरोधात आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून आम्ही राज्यातही हे आंदोलन केले आहे. आमची एवढीच मागणी आहे की पुढील निवडणुका की बॅलेट पेपेर च्या माध्यमातून व्हावी. बॅलेट पेपेरद्वारे झालेली निवडणुका पारदर्शक निवडणुका असणार आहे. कारण ईव्हीएम मशीन तयार करणाऱ्या एजन्सी मधील ७ पैकी ४ हे भाजपचेच पदाधिकारी आहेत, त्यामुळे भाजपच ईव्हीएम मशीन हाताळत आहे, असाच होतो. त्या अनुषंगाने हे आंदोलन आहे, असे ॲड. भानुप्रताप सिंग यांनी  यावेळी सांगितले.

शांततेत चाललेले हे आंदोलन पोलिसांमुळे चिघळले. हे भाजप सरकारचाच आदेश असणार. यातून स्पष्ट होते की लोकांना दाबून ठेवण्यासाठी सरकार पोलिस यंत्रणेचा वापर करत आहे. जर भविष्यात भाजप सत्तेवर आल्यास, लोकशाही संपणार व हुकूमशाही  सुरू होणार आहे, असेही ॲड. सिंग यांनी यावेळी सांगितले.

 राज्यातील सुमारे १ लाख लोकांनी ईव्हीएम विरोधात हस्तांक्षर करत त्याचे पेपेर आमच्याकडे दिले आहेत. अजून आम्ही ताळागाळात पोहचलेलो नाही. ही संख्या अजून वाढणार आहे.  त्यामुळे राष्ट्रपतींनी देखील यावर विचार करणे आवश्यक आहे. गोमंतकीयांनी खूप धाडस दाखविले आहे. हे आंदोलन देशभर होत असले तरी, गोव्यापासूनच बॅलेट पेपेर वरील निवडणुका सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे, असे यावेळी रामा काणकोणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा