शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

ईव्हीएम विरोधातील आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; सीईओच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

By समीर नाईक | Updated: March 4, 2024 16:41 IST

अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली.

पणजी:  राष्ट्रपती यांच्याकडे विषय पोहचवणार या मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांच्या आश्वासनानंतर, ईव्हीएम विरोधातील आंदोलन लोकांनी मागे घेतले. या दरम्यान पोलिस आणि आंदोनकर्त्यांमध्ये संघर्ष  झाला, ज्यातून ॲड. प्रतिमा कुतीन्हो, मन्सूर शेख व काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

सोमवारी सकाळपासून राज्यातील लोकांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केले. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिन्हो येथील बंगल्यावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला,  ज्यातून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. 

अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली. या शिष्टमंडळमध्ये दिल्लीतील ॲड. भानुप्रताप सिंग, डी. सी कपिल, रमा काणकोणकर, शंकर पोळजी यांचा समावेश होता. सीईओच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आहे.

देशात ईव्हीएम विरोधात आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून आम्ही राज्यातही हे आंदोलन केले आहे. आमची एवढीच मागणी आहे की पुढील निवडणुका की बॅलेट पेपेर च्या माध्यमातून व्हावी. बॅलेट पेपेरद्वारे झालेली निवडणुका पारदर्शक निवडणुका असणार आहे. कारण ईव्हीएम मशीन तयार करणाऱ्या एजन्सी मधील ७ पैकी ४ हे भाजपचेच पदाधिकारी आहेत, त्यामुळे भाजपच ईव्हीएम मशीन हाताळत आहे, असाच होतो. त्या अनुषंगाने हे आंदोलन आहे, असे ॲड. भानुप्रताप सिंग यांनी  यावेळी सांगितले.

शांततेत चाललेले हे आंदोलन पोलिसांमुळे चिघळले. हे भाजप सरकारचाच आदेश असणार. यातून स्पष्ट होते की लोकांना दाबून ठेवण्यासाठी सरकार पोलिस यंत्रणेचा वापर करत आहे. जर भविष्यात भाजप सत्तेवर आल्यास, लोकशाही संपणार व हुकूमशाही  सुरू होणार आहे, असेही ॲड. सिंग यांनी यावेळी सांगितले.

 राज्यातील सुमारे १ लाख लोकांनी ईव्हीएम विरोधात हस्तांक्षर करत त्याचे पेपेर आमच्याकडे दिले आहेत. अजून आम्ही ताळागाळात पोहचलेलो नाही. ही संख्या अजून वाढणार आहे.  त्यामुळे राष्ट्रपतींनी देखील यावर विचार करणे आवश्यक आहे. गोमंतकीयांनी खूप धाडस दाखविले आहे. हे आंदोलन देशभर होत असले तरी, गोव्यापासूनच बॅलेट पेपेर वरील निवडणुका सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे, असे यावेळी रामा काणकोणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा