शहरं
Join us  
Trending Stories
1
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
2
नव्या भारताकडे दहशवाद्यांना मातीत गाडण्याची अन् शत्रूला घरात घुसून संपवण्याची क्षमता- योगी आदित्यनाथ
3
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले
4
शाळांना राजकारणापासून दूर ठेवा; आंध्र प्रदेश सरकारचा कौतुकास्पद निर्णय, नवी नियमावली वाचा
5
रशियाकडून कच्चं तेल खरेदी करणं बंद केलंय का? ट्रम्प यांच्या दाव्यावर भारतानं दिलं उत्तर
6
राज्यसभेत भाजपाचं 'शतक' पार! ३ वर्षांनी पुन्हा गाठली शंभरी; 'असा' रेकॉर्ड करणारा दुसरा पक्ष ठरला
7
Shravan Shanivar 2025: श्रावण शनिवारी केलेले 'हे' सोपे उपाय देतात शनी पीडेपासून मुक्ती!
8
एका बॅगेमुळे नवी दिल्ली स्टेशनवर झाला १८ जणांचा मृत्यू; रेल्वे मंत्र्यांनी लोकसभेत दिली अपघाताची माहिती
9
२०१५मध्ये ड्रायव्हिंग लायसन्स, २०२०मध्ये पासपोर्टही बनवला; १० वर्षे भारतात लपून राहिलेला अफगाणी कसा पकडला गेला?
10
'या' देशात राहातात सर्वाधिक लिव्ह-इन रिलेशनशिप जोडपी, भारतात हा ट्रेंड किती?
11
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
12
'एकाच शॉटमध्ये दोन पुरुषांसोबत टॉपलेस सीन केला अन्...', मराठी अभिनेत्रीचा खुलासा
13
Tarot Card: पुढचा सप्ताह, वेगवान घडामोडींचा; नक्की काय काय घडणार? वाचा टॅरो भविष्य
14
रिकाम्या दारूच्या बाटलीवर मिळणार २० रुपये कॅशबॅक; 'या' राज्य सरकारनं आणली अजब योजना
15
Viral Video : इंडिगोच्या विमानात प्रवाशाने दुसऱ्या प्रवाशाच्या कानशिलात लगावली; मोठा राडा, व्हिडीओ व्हायरल
16
४००० कोटींच्या 'रामायण'साठी रणबीर कपूरने 'या दिग्गज गायकाचा' बायोपिक सोडला, अनुराग बसू म्हणाले..
17
Anil Ambani: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या, समन नंतर आता लुकआऊट सर्क्युलर जारी
18
भारतात पहिल्यांदा पार पडली 'लॅप्रोस्कोपिक' शस्त्रक्रिया; 'श्री' नावाच्या कासवाला मिळाली संजीवनी
19
शाहरुख खानला 'जवान'साठी राष्ट्रीय पुरस्कार, मात्र चाहत्यांनी विचारले भलतेच प्रश्न; रंगली चर्चा
20
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स

ईव्हीएम विरोधातील आंदोलना दरम्यान कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात; सीईओच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

By समीर नाईक | Updated: March 4, 2024 16:41 IST

अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली.

पणजी:  राष्ट्रपती यांच्याकडे विषय पोहचवणार या मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांच्या आश्वासनानंतर, ईव्हीएम विरोधातील आंदोलन लोकांनी मागे घेतले. या दरम्यान पोलिस आणि आंदोनकर्त्यांमध्ये संघर्ष  झाला, ज्यातून ॲड. प्रतिमा कुतीन्हो, मन्सूर शेख व काही कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात.

सोमवारी सकाळपासून राज्यातील लोकांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन केले. या दरम्यान त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या आल्तिन्हो येथील बंगल्यावर मोर्चा नेण्याचा प्रयत्न केला,  ज्यातून पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये चकमक झाली. 

अखेर या लोकांमधील काही नेत्यांनी शिष्टमंडळ मुख्य निर्वाचन अधिकारी (सीईओ) यांची भेट घेत त्यांच्याकडे हा विषय मांडला, व राष्ट्रपतींकडे हा विषय पोहचविण्याची विनंती केली. या शिष्टमंडळमध्ये दिल्लीतील ॲड. भानुप्रताप सिंग, डी. सी कपिल, रमा काणकोणकर, शंकर पोळजी यांचा समावेश होता. सीईओच्या आश्वासनानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आहे.

देशात ईव्हीएम विरोधात आंदोलन मोठ्या प्रमाणात सुरू आहे, त्याचाच भाग म्हणून आम्ही राज्यातही हे आंदोलन केले आहे. आमची एवढीच मागणी आहे की पुढील निवडणुका की बॅलेट पेपेर च्या माध्यमातून व्हावी. बॅलेट पेपेरद्वारे झालेली निवडणुका पारदर्शक निवडणुका असणार आहे. कारण ईव्हीएम मशीन तयार करणाऱ्या एजन्सी मधील ७ पैकी ४ हे भाजपचेच पदाधिकारी आहेत, त्यामुळे भाजपच ईव्हीएम मशीन हाताळत आहे, असाच होतो. त्या अनुषंगाने हे आंदोलन आहे, असे ॲड. भानुप्रताप सिंग यांनी  यावेळी सांगितले.

शांततेत चाललेले हे आंदोलन पोलिसांमुळे चिघळले. हे भाजप सरकारचाच आदेश असणार. यातून स्पष्ट होते की लोकांना दाबून ठेवण्यासाठी सरकार पोलिस यंत्रणेचा वापर करत आहे. जर भविष्यात भाजप सत्तेवर आल्यास, लोकशाही संपणार व हुकूमशाही  सुरू होणार आहे, असेही ॲड. सिंग यांनी यावेळी सांगितले.

 राज्यातील सुमारे १ लाख लोकांनी ईव्हीएम विरोधात हस्तांक्षर करत त्याचे पेपेर आमच्याकडे दिले आहेत. अजून आम्ही ताळागाळात पोहचलेलो नाही. ही संख्या अजून वाढणार आहे.  त्यामुळे राष्ट्रपतींनी देखील यावर विचार करणे आवश्यक आहे. गोमंतकीयांनी खूप धाडस दाखविले आहे. हे आंदोलन देशभर होत असले तरी, गोव्यापासूनच बॅलेट पेपेर वरील निवडणुका सुरू करण्याचा आमचा निर्धार आहे, असे यावेळी रामा काणकोणकर यांनी सांगितले. 

टॅग्स :goaगोवा