शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

बोगस पद्धतीने कर्जे घेणाऱ्यांवर कारवाई; मंत्री सुभाष शिरोडकर यांचा इशारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2024 13:03 IST

माशेल येथील महिला अर्बनमधील गैरव्यवहार २०२२-२३ पूर्वी झालेले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : व्हिजनरी, माशेल येथील महिला अर्बन व डिचोली येथील अष्टगंधा बँकेतून बोगस पद्धतीने कर्जे घेतलेल्यांवर कारवाई केली केली जाईल, तसेच ज्यांनी योग्य प्रकारे कर्जे घेतलेली आहेत, ती वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी परत केल्या जातील, असे सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काल स्पष्ट केले.

पत्रकार परिषदेत विचारलेल्या प्रश्नावर बोलताना ते म्हणाले की, व्हिजनरी, माशेल येथील महिला अर्बनमधील गैरव्यवहार २०२२-२३ पूर्वी झालेले आहेत. सहकार खात्याने याची गंभीर दखल घेऊन दोन ते तीन वेळा आदेशही काढले आहेत. ज्यांनी बोगस पद्धतीने कर्जे घेतलेली आहेत, त्यांच्यावर वेगळ्या प्रकारे कारवाई करावी लागेल. आम्ही ती कडकपणे करणार आहोत. कर्जे वसूल करून ठेवीदारांच्या ठेवी येत्या डिसेंबरपर्यंत परत करण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. या तिन्ही बँका खात्याने रेड कॅटेगरीत टाकलेल्या आहेत. माशेल अर्बनमध्ये तब्बल १८ कोटी रुपयांचा घोटाळा झालेला आहे. या पतसंस्थेच्या संचालक मंडळाविरुद्ध गुंतवणूकदारांना फसवल्याप्रकरणी आर्थिक गुन्हे विभागाच्या पोलिसांकडून गुन्हेही नोंद झाले आहेत. संचालक मंडळात माजी मंत्री पांडुरंग मडकईकर यांची पत्नी जुने गोवेच्या माजी सरपंच जेनिता मडकईकर यांच्यासह बारा जणांचा समावेश आहे. काही जणांना नियमांचे उल्लंघन करून अवैधरीत्या कर्जे देण्यात आली.

म्हापसा अर्बन बँक पतसंस्था म्हणून पुनरुज्जीवित करणार

दिवाळखोरीत जाऊन बंद पडलेली म्हापसा अर्बन बँक पतसंस्था म्हणून पुनरुज्जीवित करण्याचे सरकारचे प्रयत्न असल्याची माहिती मंत्री सुभाष शिरोडकर यांनी दिली. सरकार त्या दृष्टिकोनातून सकारात्मकदृष्ट्या विचार करीत असल्याचे शिरोडकर म्हणाले. या बँकेमध्येही लोकांच्या ठेवी अडकलेल्या आहेत.

 

टॅग्स :goaगोवा