शहरं
Join us  
Trending Stories
1
बडगुजर यांच्या प्रवेशावरून भाजपमध्ये घमासान, बावनकुळे अंधारात, गिरीश महाजन यांचा पुढाकार
2
अश्रूंचा बांध फुटला... राजवीर यांना शेवटचा निरोप देताना पत्नी कर्नल दीपिका चौहान भावूक ( Video )
3
MHT CET 2025 Result: एमएचटी सीईटीच्या परीक्षेत पीसीएममध्ये राज्यातील २२ जण अव्वल!
4
इराण-इस्त्रायल यांच्यातील युद्धात कोण बनणार शांतीदूत?; चीन आणि रशियानेही दिली ऑफर
5
Sonam Raghuwanshi: सोनम आणि तिच्या बॉयफ्रेंडने कशी केली राजाची हत्या? पोलीस आरोपींना घेऊन 'त्या' ठिकाणी
6
प्रक्षेपण सुरू असतानाच झाला होता हल्ला, आता इस्राइलच्या नाकावर टिच्चून त्या महिला अँकरने दिल्या बातम्या  
7
"भारतीय एजंट्सनं अपहरण केलं होतं..," फरार हिरे व्यापारी मेहुल चोक्सीचा खळबळजनक दावा
8
आर. अश्विनच्या टीमवरील बॉल टेम्परिंगचा आरोप खरा की, खोटा? TNPL आयोजकांनी निर्णय दिला, आता...
9
तुम्ही 'या' क्षेत्रात काम करताय का? सरकार दरमहा देणार ३,००० रुपये, आजच अर्ज करा!
10
अहमदाबाद विमान अपघातात २३ वर्षीय क्रिकेटपटूचा दुर्दैवी मृत्यू; टीमने वाहिली श्रद्धांजली
11
कधीही अण्वस्त्र तयार करू शकणार नाही इराण? G7 शिखर परिषदेतून तेहरानला इशारा; या सर्व देशांचा इस्रायलला पाठिंबा
12
Groww, Zerodha सह टॉप ब्रोकर्सनं २ महिन्यांत गमावले ४.७ लाख अ‍ॅक्टिव्ह ग्राहक, काय आहे कारण?
13
Israel Iran Conflict : अमेरिका आता इराणवर हल्ला करणार? ट्रम्प यांनी दिला इशारा; म्हणाले, तेहरान रिकामे करा...
14
'केवळ एका फोन कॉलने इराण-इस्रायल युद्ध थांबवता येऊ शकतं..."; परराष्ट्र मंत्री अराघची यांचा दावा
15
"इराणच्या अयातुल्ला खामेनींना संपवल्यानंतरच हा संघर्ष थांबेल"; बेंजामिन नेतन्याहूंचे मोठे विधान
16
Devendra Fadnavis: स्थलांतरित शाळाबाह्य मुलांना जबरदस्तीने शाळेत आणा, मुख्यमंत्र्यांचे आवाहन
17
'सैराट'मधील हा अभिनेता लवकरच गर्लफ्रेंडसोबत बांधणार लग्नगाठ, ती दिसायला आहे खूप सुंदर
18
UPI Changes: ट्रान्झॅक्शन टाईम, बॅलन्स चेक लिमिट... UPI शी निगडीत या मोठ्या बदलांबाबत जाणून घ्या 
19
रस्त्यावरील लोखंडी वस्तूमुळे पायाला पडले १८ टाके, महापालिकेचा ढिसाळ कारभार अभिनेत्रीला पडला महागात
20
नाशिक भाजपाचा आज प्रवेशोत्सव ! माजी मंत्री बबनराव घोलप, उद्धव सेनेचे सुधाकर बडगुजर यांच्यासह दहा ते बारा माजी नगरसेवक कमळ हातात घेणार 

सुमारे दोन हजार बारना दिलासा

By admin | Updated: March 28, 2017 03:06 IST

पणजी : राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांपासून पाचशे मीटरमधील २ हजार ७०० बार आणि दारू दुकानांपैकी १ हजार ९११ बार

पणजी : राज्यातील राज्य व राष्ट्रीय महामार्गांपासून पाचशे मीटरमधील २ हजार ७०० बार आणि दारू दुकानांपैकी १ हजार ९११ बार आणि दुकानांना सोमवारी राज्य सरकारतर्फे दिलासा मिळाला. किरकोळ दारू विक्री करणारी ७८९ दुकाने मात्र बंद करावी लागतील. घाऊक दारू विक्री करणारी दुकाने, बार व रेस्टॉरंट्स बंद करावी लागणार नाहीत, अशी भूमिका पर्रीकर सरकारने स्पष्ट केली.सर्वोच्च न्यायालयाने राज्य आणि राष्ट्रीय महामार्गांपासून पाचशे मीटरमधील बार आणि दारू दुकाने बंद करण्याचा आदेश दिलेला आहे. परिणामी एक एप्रिलपासून अशा आस्थापनांच्या परवान्यांचे नूतनीकरण केले जाणार नाही. या पार्श्वभूमीवर व्यावसाययिक धास्तावले आहेत. न्यायालयाच्या आदेशानंतर अबकारी खात्याने मामलेदारांमार्फत अशी पाहणी केली असता सुमारे २ हजार ७०० बार व दारू दुकानांच्या परवान्यांचे नूतनीकरण करून द्यायचे नाही, अशी भूमिका अबकारी खात्याने पार्सेकर सरकार अधिकारावर असताना घेतली होती. दरम्यान निवडणुका होऊन मनोहर पर्रीकर सरकार सत्तारूढ झाले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी अ‍ॅडव्होकेट जनरल व अन्य कायदेतज्ज्ञांचा सल्ला घेतला. न्यायालयाचा आदेश नेमका कोणत्या आस्थापनांना लागू होतो हे त्यांनी जाणून घेतले.महामार्गांच्या बाजूने पाचशे मीटरच्या अंतरात असलेली बार व रेस्टॉरंट्स तसेच घाऊक विक्रीची दुकाने बंद करण्याची गरज नाही, असा निष्कर्ष मुख्यमंत्री पर्रीकर यांनी कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्यानंतर काढला आहे. फक्त दोन-तीन बाटल्या याप्रमाणे किरकोळ दारू विक्री करणारी ७८९ दुकाने बंद करावी लागतील. राज्य महामार्गांचे जिल्हा मार्गांमध्ये रूपांतर करावे वगैरे मागण्या मद्य व्यावसायिक करत आहेत; पण कायद्याच्या दृष्टिकोनातून तसे करणे अजून तरी सरकारला शक्य झालेले नाही, असे सूत्रांनी सांगितले. राज्यातील सर्व महामार्गांच्या बाजूच्या मद्यालयांचे व दारू दुकानांचे परवाने नूतनीकरण थांबले होते. येत्या ३१ रोजी मुदत संपत असल्याने परवान्यांचे नूतनीकरण येत्या दि. २९ पासून सुरू होईल, असे सूत्रांनी सांगितले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी घेतलेल्या निर्णयाच्या अनुषंगाने लेखी आदेश येत्या २९ रोजी जारी होईल. मात्र, सर्वोच्च न्यायालय अन्य राज्यांच्या फेरविचार याचिकांवर कोणता निर्णय घेते याकडेही गोवा सरकारचे लक्ष आहे. त्यामुळे पर्रीकर यांचा सध्याचा निर्णय हा फेरविचार याचिकांद्वारे येणाऱ्या फलनिष्पत्तीवरही अवलंबून आहे.(खास प्रतिनिधी)