शहरं
Join us  
Trending Stories
1
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
2
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
3
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
4
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
5
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
6
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
7
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
8
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
9
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी
10
Donald Trump Tariff News : अमेरिकाच टॅरिफबाबत गंडली! ट्रम्प यांची भारताबद्दल कडक भूमिका, पण परराष्ट्र मंत्रालय करतंय कौतुक
11
२ तासांचा हायव्हॉल्टेज ड्रामा, गर्लफ्रेंडच्या मिठीत सापडला नेता; पत्नीला पाहून पती पळाला, पण...
12
आकाश 'वाणी'! वैभव सूर्यवंशीमुळे स्टार विकेट किपर बॅटर संजूवर आलीये संघ सोडण्याची वेळ!
13
भारतीयांसाठी कॅनडा ठरतोय मृत्युचं घर; गेल्या ५ वर्षातील आकडे चिंताजनक!
14
प्राजक्ता माळीने वाढदिवशी घेतलं भीमाशंकरचं दर्शन; म्हणाली, "१२ ज्योतिर्लिंग यात्रा पूर्ण..."
15
चालत्या बसवर झाड कोसळलं, ५ जणांचा मृत्यू; महिला म्हणते, "आयुष्याचा प्रश्न, तुम्ही Video बनवताय"
16
BCCI: बीसीसीआय नव्या प्रशिक्षकाच्या शोधात, अर्जही मागवले! जाणून घ्या पात्रता
17
धनंजय मुंडेंनी मंत्रिपद स्वप्नातही पाहू नये, पुन्हा घेतले तर अजितदादांचा पक्ष संपेल: जरांगे
18
Video: हृदयस्पर्शी! हत्तीच्या पिंजऱ्यात पडला चिमुकला; गजराजाने जे केले त्यानं सर्वांचीच मने जिंकली
19
काय आहे युनिव्हर्सल बँकिंग? ११ वर्षांत पहिल्यांदाच RBI नं कोणत्या बँकेला दिला असा लायसन्स
20
Donald Trump Tariff News : ज्याची भीती होती तेच घडले! वॉलमार्ट अन् अमेझॉनसह अनेक कंपन्यांनी भारतातील ऑर्डर्स रोखून ठेवल्या

रेल्वे दुपदरीकरण रद्द करा; विरोधकांचा विधानसभेत सरकारवर दबाव आणण्याचा प्रयत्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 10:33 IST

हा मुद्दा विजय सरदेसाई यांनी प्रश्नकाळात उपस्थित करताना या प्रकल्पासाठी किती जमीन संपादित करण्यात येणार याची माहिती मागितली.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : रेल्वे दुपदरीकरण प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. तरीही गोव्यात या प्रकल्पाचे काम सुरू ठेवण्यात आले असून, हे आश्चयकारक आहे. त्यामुळे सरकारने हा प्रकल्पच रद्द करावा, अशी मागणी करत विरोधकांनी काल विधानसभेत सरकारवर दबाव टाकण्याचा प्रयत्न केला. मात्र, न्यायालयाची स्थगिती नसलेल्या भागात या प्रकल्पासाठी काम चालू राहील या भूमिकेवर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत ठाम राहिले.

हा मुद्दा विजय सरदेसाई यांनी प्रश्नकाळात उपस्थित करताना या प्रकल्पासाठी किती जमीन संपादित करण्यात येणार याची माहिती मागितली. त्यावर महसूलमंत्री बाबूश मोन्सेरात यांनी एकूण ३ हजार चौरस मीटरहून अधिक जमीन संपादन करण्यासाठी भारतीय रेल्वेकडून प्रक्रिया सुरू करण्यात आल्याचे सांगितले. मात्र, कर्नाटकात घाट भागात या प्रकल्पाला सर्वोच्च न्यायालयाने पर्यावरण दाखल्यामुळे स्थगिती दिली असल्याचे आमदार कार्लस फेरेरा यांनी सांगितले. घाट भागात जर या प्रकल्पाचे काम न्यायालयाने रोखले असल्यामुळे गोव्यात प्रकल्पाचे काम करून काय फायदा? घाट भागातून जोपर्यंत दुपदरीकरण जात नाही तोपर्यंत गोव्यातील दुपदरीकरणाला काहीच अर्थ नाही, असेही त्यांनी सांगितले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी भू-संपादनाचे राज्य सरकारकडे असलेले अधिकार रेल्वेकडे का देण्यात आले आणि कोणाच्या सूचनेवरून देण्यात आले, असा प्रश्न केला. या प्रकरणात मोन्सेरात यांनी रेल्वेचा प्रकल्प असल्यामुळे रेल्वेकडूनच भू-संपादन केले जाईल, असे सांगितले.

विरोधक एकवटले

आमदार युरी आलेमाव, आमदार सरदेसाई, वेन्झी व्हीएगश, एल्टन डिकॉस्टा यांनी रेल्वेचे दुपदरीकरण हे मुरगाव बंदरातून कोळसा वाहतूक करण्यासाठी असल्याचा दावा केला. गोव्याला कोळसा नको असल्यामुळे प्रकल्पच रद्द करा, अशी त्यांची मागणी होती, जी मुख्यमंत्र्यांनी फेटाळून लावली.

दुपदरीकरण कोळशासाठी नव्हे : मुख्यमंत्री सावंत

रेल्वेचे दुपदरीकरण हे कोळसा वाहतुकीसाठी करण्यात येत असल्याचा विरोधकांचा दावा चुकीचा असल्याचे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी सांगितले. गोव्याला कोळसा नको आहे, याची आपल्यालाही जाणीव आहे. मात्र, विरोधक कोळशासाठीच दुपदरीकरण करीत असल्याच्या दाव्यावर ठाम राहिले.

युरींनी वाचले 'ते' पत्र

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी रेल्वे अधिकाऱ्याने दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांना लिहिलेले पत्रच विधानसभेत सादर केले. त्यात रेल्वे अधिकाऱ्यांनी भू-संपादन राज्य सरकारकडून करून जमीन रेल्वेच्या ताब्यात देण्यात यावी, अशी सूचना केली असल्याचे त्यांनी सांगितले. ते पत्र त्यांनी सभापतींना सादर केले. 

टॅग्स :goaगोवाvidhan sabhaविधानसभाKonkan Railwayकोकण रेल्वे