शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

काजूच्या बिया घेउन जाणारा ट्रक गोव्यात दरीत कोसळला; दोघांजणांचा मृत्यू, मुख्यमंत्री सावंतही हेही बचावकार्यात आले धावून

By सूरज.नाईकपवार | Updated: March 17, 2024 16:05 IST

काजूच्या बियाघेउन महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे जाणारा एक ट्रक  गोव्यातील सासष्टीच्या कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत  घोडेव्हाळ येथे दरीत कोसळल्याने दोघाजणांचा दुदैवी मृत्यू झाला.

मडगाव: काजूच्या बियाघेउन महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे जाणारा एक ट्रक  गोव्यातील सासष्टीच्या कुंकळ्ळी पोलिस ठाण्याच्या हद्दीत  घोडेव्हाळ येथे दरीत कोसळल्याने दोघाजणांचा दुदैवी मृत्यू झाला. शनिवारी रात्री दहाच्या सुमारास अपघात घडला.याच वेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काणकोण येथील आपला दौरा संपवून परत येत असताना त्यांना ही घटना लक्षात आल्यानंतर त्यांनी स्वताहून बचावकार्यालाही धावून येउन सहकार्य केले. तर त्यांच्यासोबत असलेले समाजकल्याण मंत्री तसेच भाजपाचे प्रदेश सरचिटणीस नरेद्र सावईकर यांनीही त्यांना याकामी मदत केली. मृत पावलेल्यांची नावे देवराज सातनी व हस्कु सातनी असे असल्याची माहिती कुंकळ्ळी पोलिसांनी दिली आहे. मयत सासरा व सून असल्याचेही पोलिसांनी सांगितले असून, त्यांच्या नात्याबाबत सदया पोलिस खातरजमा करीत आहेत. ते फुगे विक्रेते असल्याचीही माहिती पोलिसांना मिळाली आहे. गोमेकॅात इस्पितळात त्यांना मृत्यू आला.

या अपघात प्रकरणात पोलिसांनी सदया त्या ट्रकचा चालक राकेश गोरे याला ताब्यात घेतले आहे. तो मूळ महाराष्ट्रातील रत्नागिरी येथील आहे. त्याला अटक केली जाईल अशी माहिती कुंकळ्ळी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक डायगो ग्रासियश यांनी दिली. या प्रकरणाचा पुढील तपास सदया उपनिरीक्षक कविता रावत या करीत आहेत.पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार शेजारच्या कर्नाटक राज्यातील मंगळुरुहून एक इचर ट्रक काजूच्या गोणपटी घेउन महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे जात होता. त्या ट्रकमध्ये १२ जण अन्यही होते. त्यांना ट्रकच्या मागे बसविले होते. घोडेव्हाळ येथे पोहचल्यानंतर ट्रकचालकाचा वाहनावरील ताबा सुटला व त्याने सरळ कठडयाला धडक दिली व ट्रक खाईत पडला.

याचवेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे काणकोणहून आपला कार्यक्रम संपवून परत येत होते. त्यांना हा प्रकार लक्षात आला. त्यांनी स्वता घटनास्थळी जाउन जखमींना मदतकार्यासाठी मदत केली. समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई हेही तेथे हजर होते, त्यांनीही बचावकार्यात सहकार्य केले. त्यानंतर जखमींना मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात नेले तेथे स्वता मंत्री फळदेसाई उपस्थित होते. ट्रक खाईत लोटल्यानंतर त्यावर असलेल्यांनी जीवांच्या आकांतानी मदतीसाठी आक्रोश केला. पाच लहान मुलेही होती. त्यांचा जीव घालमेल झाला होता. त्यांनी एकच हुंबरडा फोडला होता.

मुख्यमंत्री सावंत यांनी घटनास्थळी गेल्यानंतर मला सुरक्षा नको तुम्ही पहिल्यांदा जखमींना बाजूला काढा अशा सूचना देत रुग्णांना पहिल्यांदा इस्पितळात न्या असे सांगितले.