शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
कसा आहे मेस्सीचा भारत दौरा? कोलकाता येथे पहिला मुक्काम; PM मोदींच्या भेटीसह सांगता; जाणून घ्या सविस्तर
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

वाहतूक नियंत्रणासाठी 800 पोलीस उतरणार रस्त्यावर

By वासुदेव.पागी | Updated: December 23, 2023 17:14 IST

पर्यटनस्थळांवर या काळात अधिक लक्ष दिले जाईल

पणजी: नववर्ष प्रारंभ आणि नाताळ या दोन्ही कारणामुळे गोव्यात मोठ्या प्रमाणावर पर्यटक येणार असल्यामुळे वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी पोलिसांनी व्यवस्था लावली आहे. संपूर्ण राज्यभर वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी ८०० पोलिसांची फौज तैनात करणार असल्याचे  वाहतूक पोलीस अधीक्षक अक्षत कौशल यांनी सांगितले आहे. 

पर्यटनस्थळांवर या काळात अधिक लक्ष दिले जाईल. २५ डिसेंबर ते २ जानेवारी या कालावधीत जास्तीत जास्त पोलीस रस्त्यावर वाहतुकीचे देखरेख करतील.  एरवी सामान्य काळात वाहतूक नियंत्रणासाठी 500 पोलीस कर्मचारी तैनात असतात. आता ती तीनशे ने वाढवली जाईल. कळंगूट आणि बागा किनारपट्टीत पर्यटकांची प्रचंड गर्दी होते. त्यामुळे येथे विशेष लक्ष दिले जाणार आहे. सनबर्न महोत्सवासाठीही २६ डिसेंबरपर्यंत वाहतूक व्यवस्थापन आराखडा तयार केला जाईल.  दारू पिऊन वाहन चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अल्कोमीटर  घेऊन तैनात असतील.  शुक्रवारी दिवसभरात २६ मद्यपी चालकांना दंड ठोठावण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले. 

दरम्यान डिसेंबरचे शेवटचे पाच दिवस तसेच नववर्षी दिनी अधिक काळजी घेऊन वाहने चालविण्याचे आवाहन त्यांनी केले.  कुठाळी नदीवरील नवीन फुलाची दुसरी बाजू ही आता वाहतुकीस तयार झाल्यामुळे वाहतुकीवरील ताण कमी होणार आहे. हा पूल 24 तारखेपासून खुला होणार आहे. राज्यातील वेगवेगळ्या हॉटेल्स मध्ये झालेल्या बुकिंग्स आणि इतर माध्यमातून मिळालेल्या माहितीनुसार 31 डिसेंबर रोजी राज्यात फार मोठ्या प्रमाणात पर्यटक येण्याची शक्यता आहे.

टॅग्स :goaगोवाPoliceपोलिस