शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकानांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
6
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
7
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
8
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
9
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
10
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
11
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
12
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
13
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
14
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
15
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
16
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
17
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
18
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
19
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
20
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यात लोकसंख्येच्या तुलनेत वाहनसंख्या 75 टक्के, अपघातांबाबत चिंता

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2017 12:19 IST

गोव्यात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. 15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात वाहन संख्या 12 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. गोव्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांचे प्रमाण 75 टक्के झाले आहे.

पणजी : गोव्यात वाहनांची संख्या वाढत चालली आहे. 15 लाख लोकसंख्येच्या गोव्यात वाहन संख्या 12 लाखांपेक्षा जास्त झाली आहे. गोव्याच्या लोकसंख्येच्या तुलनेत वाहनांचे प्रमाण 75 टक्के झाले आहे. वाढते अपघात ही चिंताजनक बाब बनली आहे, अशी खंत वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी गुरुवारी येथे व्यक्त केली. राष्ट्रीय रस्ता आणि महामार्ग मंत्रलयातर्फे गोवा सरकारचे वाहतूक खाते व कदंब वाहतूक महामंडळ यांच्या सहकार्याने येथे आयोजित रस्ता सुरक्षा परिषदेचे उद्घाटन केल्यानंतर मंत्री ढवळीकर बोलत होते. एकूण वाहनांमध्ये 60 टक्के प्रमाण हे दुचाकींचे आहे. हेल्मेट न घालता दुचाकीस्वार गाडी हाकतात व अपघातात बळी पडतात. आपण स्वत: गुरुवारी फोंडा ते पणजी असा सकाळी प्रवास करत असताना दोन पोलीस रस्त्यावरून समांतरपणे दुचाकी चालवत आहेत व दोघांनीही हेल्मेट घातलेले नाही, असे आपल्याला आढळून आले. 

एकाने स्टाईल म्हणून हेल्मटे हाताला घातले होते. आपण दोघांनाही थांबवले व तुम्ही पोलीस असतानादेखील हेल्मेट घालत नाही का? अशी विचारणा केली. त्यानंतर हाताला ज्याने हेल्मेट घातले होते, त्याने ते डोक्यावर परिधान केले, असा अनुभव मंत्री ढवळीकर यांनी उपस्थितांना सांगितला. मी स्वत: एकदा कारमध्ये चालकाच्या बाजूला बसलेलो असताना सीट बेल्ट घालायला विसरलो होतो. रस्ता सुरक्षेविषयी जागृत असलेल्या रोलंड मार्टिन्स या कार्यकत्र्याने काणकोण चावडी येथे माङो वाहन थांबवून मला बेल्ट घालण्याची विनंती केली होती. त्यांची ती भूमिका योग्य होती. रस्ता सुरक्षेविषयी अशा प्रकारे प्रत्येकानेच जागृत असायला हवे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.

राज्यात महामार्गाचे रुंदीकरण करण्याचे काम सरकारने हाती घेतले आहे. सहा ते आठपदरी महामार्ग सध्या बांधले जात आहेत. त्यात पुलांचाही समावेश होतो. विविध महत्त्वाच्या रस्त्यांवर दुचाकीस्वारांसाठी स्वतंत्र लेन बांधली जाईल. त्या स्वतंत्र लेनमधून दुचाकी चालविल्या जायला हव्यात. काही रस्त्यांवर सध्याही तशी तरतूद आहे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.  राज्यात जोरदार पडलेल्या पावसामुळे अनेक रस्त्यांवर खड्डे पडले आहेत पण येत्या महिन्यात राज्यातील सर्व रस्त्यांवरील सगळे खड्डे बुजविले जातील, अशी ग्वाही मंत्री ढवळीकर यांनी दिली. केंद्रीय मोटर वाहन कायद्यातील नव्या तरतुदींमुळे यापुढे वाहतूक नियमांचा भंग करणा-याला किमान एक हजार रुपयांचा दंड भरावा लागेल. मद्यपी चालकाला दहा हजारांचा दंड भरावा लागेल. जर कुणा अल्पवयीन मुलाने दुचाकी चालविताना अपघात केला व दुस:याचा बळी घेतला, तर त्या चालकासह त्याच्या पालकांनाही तुरुंगवासाची शिक्षा होईल. तशी तरतुद कायद्यात केली जात असल्याचे ढवळीकर यांनी जाहीर केले.

यावेळी वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई, कदंबचे वरिष्ठ अधिकारी संजय घाटे यांच्यासह राष्ट्रीय महामार्ग मंत्रलयाचे अधिकारी व्यासपीठावर होते. रस्ता सुरक्षेविषयी चर्चा करण्यासाठी आम्ही सर्वानीच वारंवार एकत्र यायला हवे, असे मंत्री ढवळीकर म्हणाले.

वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर

टॅग्स :Travelप्रवास