शहरं
Join us  
Trending Stories
1
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
2
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
3
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
4
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
5
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
6
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
7
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
8
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
9
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
10
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
11
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
12
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
13
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
14
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
15
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
16
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
17
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
18
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
19
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
20
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  

म्हादईसाठी ७५ टक्के लोकांनी केले कलश पूजन, सरकारची दिशाभूल; न्यायालयात जाण्याचा विचार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 16, 2023 08:13 IST

म्हादईसंदर्भात नेमका कोणता दिलासा मिळाला, याचे स्पष्टीकरण हवे असल्याचे निर्मला सावंत यांनी म्हटले आहे.

पणजी: राज्यातील ७५ टक्के लोकांनी म्हादईच्या रक्षणार्थ १२ रोजी कलश पूजन तसेच दिवे, पणती व मेणबत्ती पेटवून प्रार्थना केली. यामुळे म्हादई वाचवण्याच्या लढ्याला अधिक बळ प्राप्त होणार असल्याचे सेव्ह म्हादई, सेव्ह गोवाचे नेते अॅड. हृदयनाथ शिरोडकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

म्हादईप्रश्नी राज्य सरकारकडून जनतेची दिशाभूल सुरूच आहे. म्हादई जलतंटा लवादाच्या निवाड्याविरोधात ठरावीक दिवसांत सरकारने आव्हान देणे अपेक्षित होते; मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही. उलट म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयाकडून गोव्याला दिलासा मिळाला असे जे सरकार व मुख्यमंत्री सांगत आहे, ते म्हणजे जनतेच्या डोळ्याला पाणी लावत असल्याची टीका त्यांनी केली.

अॅड. शिरोडकर म्हणाले की, खरे तर कर्नाटकच्या कळसा भंडुरा प्रकल्पाला केंद्र सरकारने दिलेल्या मंजुरीला गोवा सरकारने सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणे अपेक्षित होते. तसेच या डीपीआरला न्यायालयात जाऊन स्थगिती मिळवून घेणे अपेक्षित होते. मात्र गोवा सरकारने प्रत्यक्षात तसे काहीच केले नाही. १३ रोजी सर्वोच्च न्यायालयात म्हादईप्रश्नी जी सुनावणी झाली त्यावर गोव्याला दिलासा मिळाला आहे. उलट गोवा सरकारने न्यायालयात प्रखरपणे भूमिका मांडणे आवश्यक होते. त्यासाठी त्यांनी डीपीआरला आव्हान देणे गरजे होते; मात्र त्यांनी तसे काहीच केले नाही वा तशी भूमिकाही घेतली नाही. गोवा सरकारचे हे अपयश असल्याचे त्यांनी सांगितले.

सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा, म्हादईप्रश्नी सर्वोच्च न्यायालयात जाण्याचा विचार करीत आहे. मात्र त्यावर ठोस निर्णय झालेला नाही. म्हादईच्या आंदोलनाचा भाग म्हणून पणजीत गुरुवारी (दि. १६) महाआरतीचे आयोजन केले होते. मात्र आता ही महाआरती पुढील आठवड्यात करण्याचे ठरवले असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. यावेळी महेश म्हांबरे, मनोज अडवलपालकर व अन्य उपस्थित होते.

म्हादईप्रश्नी दिलासा कोणता....?

म्हादईसंदर्भातील आदेशात गोव्याला दिलासा मिळाल्याचा दावा सरकारकडून केला जात असला तरी नेमका कोणता दिलासा मिळाला आहे याचे स्पष्टीकरण हवे असल्याचे म्हादई बचाव अभियानाच्या अध्यक्षा निर्मला सावंत यांनी म्हटले आहे. २०२० मध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेला आदेश आणि आताचा आदेश यात फरक कोणताच दिसत नाही आहे. कर्नाटकच्या डीपीआरला राष्ट्रीय जल आयोगाने दिलेल्या मंजुरीला स्थगिती दिलेली नाही आहे. वन्यजीव वॉर्डनसंबंधीच्या आदेशातही नवीन काहीच नाही. डीपीआरची प्रत गोव्याला देण्याचा आदेश दिला असला तरी ती कधी तरी गोव्याला मिळणारच होती. त्यामुळे दिलासा म्हणण्यासारखे नवीन काय आहे ते स्पष्ट व्हायला हवे असेही सावंत यांनी म्हटले आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा