शहरं
Join us  
Trending Stories
1
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
2
Latest Marathi News LIVE Updates: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीपूर्वी कोलकातामध्ये ED ची मोठी कारवाई
3
बेरोजगार तरुणांना दरमहा ३०००, महिलांसाठीही मोठ्या घोषणा; भाजपच्या जाहीरनाम्यात आणखी काय?
4
पाकिस्तानच्या या आलिशान सेरेना हॉटेलमध्ये थांबणार अमेरिका-इराण डेलीगेशन, जाणून घ्या एका रात्रीचं भाडं
5
Video - हृदयस्पर्शी! दोन्ही पाय गमावले पण जिद्द कायम; डान्सरने जिंकली कोट्यवधी लोकांची मनं
6
Travel : सारखा गोवाच कशाला हवा? भारतातील 'या' ५ बीच डेस्टिनेशन्सचा थाटच न्यारा; एकदा जाल तर प्रेमातच पडाल!
7
अमेरिकेच्या अर्थव्यवस्थेला लागलं इराण युद्धाचं ग्रहण! महासत्ता हतबल, भारतासाठी मात्र सातत्यानं 'अच्छे दिन'
8
'१८००० बॉम्ब अन् ४००० टार्गेट्स'! इस्रायलनं इराण-लेबनॉनवर केलेल्या हल्ल्यांचा संपूर्ण हिशोबच सांगितला!
9
फलटण उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेणाऱ्या मुलीचा विनयभंग; संशयिताविरुद्ध तक्रार दाखल
10
४०६ टन वजनाची ट्रेन ओढणारी कार पाहिलीय का? ३०० फूट खेचत नेली; कोणती आहे ही...
11
३० वर्षांनी त्रिएकादश राजयोग: ८ राशींना भरपूर लाभ, प्रमोशन-पगारवाढ संधी; लक्षणीय नफा-फायदा!
12
गोमांस, नमाजची सक्ती अन् मुलांचेही धर्मांतरण; आयटी कंपन्यांनमध्ये रॅकेट सक्रिय असल्याचा महाजनांचा दावा
13
Andhra Pradesh: धबधब्यावर मौजमजा करताना दुर्दैवी घटना, एकीला वाचवायला गेल्या आणि तिघीही बुडाल्या!
14
ठाकरेंच्या खासदारांसोबत खरेच बैठक झाली का? DCM एकनाथ शिंदेंनी सगळेच सांगितले, म्हणाले...
15
Abhinav Arora: कंटेंट क्रिएटर अभिनव अरोरावर जीवघेणा हल्ला; कारच्या काचा फोडल्या, वडील जखमी - Video
16
Food : आशियातील टॉप-५० रेस्टॉरंट्समध्ये भारताची दोन 'रत्न'; एक तर आपल्या मुंबईतच! बहुतेक मुंबईकरांनाही माहीत नसेल...
17
मीटिंगला बोलवायचे अन्...,आयटी कंपनीतील काळ्या कारनाम्याचा भांडाभोड, ४० सीसीटीव्ही तपासले!
18
अमेरिकेचे सैन्य हादरले! १८०० कोटींचा हाय टेक ड्रोन होर्मुझवरून बेपत्ता; इराणने उडवले की...
19
“महाराष्ट्राच्या राजकारणात नीतीमत्ता उरलेली नाही, फोडाफोडीला ऊत”; विजय वडेट्टीवारांची टीका
20
GPay वर ॲड झालेलं Pocket Money फिचर फ्रॉड किंवा स्कॅम नाही! कसा अन् कशासाठी करता येईल वापर? वाचा..
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातून ३ वर्षांत ६८ मुले बेपत्ता

By admin | Updated: July 24, 2014 01:27 IST

पणजी : गेल्या तीन वर्षांत गोवा राज्यातून मुले बेपत्ता होण्याच्या वा त्यांचे अपहरण होण्याच्या तब्बल ६८ घटना घडल्या असून यातील एकाही प्रकरणाचा

पणजी : गेल्या तीन वर्षांत गोवा राज्यातून मुले बेपत्ता होण्याच्या वा त्यांचे अपहरण होण्याच्या तब्बल ६८ घटना घडल्या असून यातील एकाही प्रकरणाचा तपास अद्यापही लागलेला नाही. गोवा मानवी हक्क आयोगाने दिलेल्या एका आदेशाच्या अनुषंगाने गृहखात्यानेच एक अहवाल सादर केला असून कायदा आणि सतर्कता खात्याच्या पोलीस अधीक्षकांच्या सहीनिशी सादर झालेल्या या अहवालात वरील माहितीचा समावेश आहे. उत्तर गोव्यातील पणजी, जुने गोवे, म्हापसा, पर्वरी, कळंगूट, हणजूण, फोंडा व आगशी या आठ पोलीस स्थानकांत मिळून जानेवारी २०११ ते मे २०१४ या कालावधीत मुले बेपत्ता असल्याच्या २२ तक्रारींची, तर अपहरणाच्या १० प्रकरणांची नोंद झाल्याचे अहवालात नमूद केले आहे. दक्षिण गोव्यातील मडगाव, वास्को, मायणा- कुडतरी, केपे, वेर्णा, कुंकळ्ळी, सांगे, कोलवा, कुडचडे आणि मुरगाव या पोलीस स्थानकांत याच प्रकारच्या अनुक्रमे १३ आणि २३ प्रकरणांची नोंद झाली आहे. वास्को येथून २०११ सालच्या डिसेंबर महिन्यात बेपत्ता झालेल्या चार वर्षीय बालकाच्या तपासात झालेल्या अक्षम्य दिरंगाईची नोंद घेत राज्य मानवी हक्क आयोगाने पोलीस महासंचालकांकडून राज्यातील एकूण अपहरण प्रकरणांचा अहवाल मागितला होता. या प्रकरणांचा तपास करताना वायरलेस यंत्रणेद्वारे राज्यभरातील पोलीस स्थानकांना सजग करणे, पोलीस स्थानकांना अपहृतांविषयीची माहिती देणे, बसस्थानके आणि रेल्वे स्टेशनवर टेहळणी करणे तसेच अपहृताच्या निकटवर्तीयांकडून माहिती गोळा करण्याचे काम अथकपणे केले जात असल्याचेही अहवालात म्हटले आहे. दरम्यान, वास्को येथील प्रकरणाचा तपास वास्को पोलिसांकडून काढून घेत क्राईम ब्रँचकडे सोपवावा, अशी शिफारस मानवी हक्क आयोगाने या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान केली आहे. दोन आठवड्यांच्या अवधित ही प्रक्रिया पूर्ण करावी, असे आयोगाचे न्या. पी. के. मिश्रा यांनी सरकारी वकिलाना सांगितले. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतील दूरदर्शन वाहिन्यांवर या बालकाचे छायाचित्र दाखवण्याच्या संभावनेवरही विचार व्हावा, असेही आयोगाने म्हटले आहे., गुन्हा शाखेकडे अन्वेषणाची सरस साधने असल्याचा मुद्दा तक्रारदार महिलेच्या वतीने अ‍ॅड, सतीश सोनक यांनी मांडला असता आयोगाने उपरोक्त शिफारस केली. अपहृत मुलांची माता सुषमा हेब्बर यांनी वास्को पोलिसांनी तपासकार्यात शैथिल्य दर्शवल्याचा आरोप करत आयोगाकडील हे प्रकरण सीबीआयकडे सुपूर्द करण्याची याचना केली होती. गेले वर्षभर हे प्रकरण आयोगाच्या देखरेखीखाली आहे.