शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूर'च्या यशाबद्दल रेल्वेने तिकिटावर छापला PM मोदींचा फोटो; म्हणाले, "हा तर शौर्याला सलाम..."
2
भारत धर्मशाळा नाही की कुणीही यावे अन् स्थायिक व्हावे, आश्रयाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाचे परखड मत
3
"पहलगाम हल्ला दहशतवाद्यांची नाही, पर्यटकांची चूक"; पोलिसांसमोर ज्योती काय काय म्हणाली?
4
पाकच्या विजयासाठी चीनने लावता होता पूर्ण जोर, भारताची हेरगिरीही केली; अहवालातून माहिती समोर
5
“अमेरिका तहव्वूर राणाचे प्रत्यार्पण करू शकते, तर पाक सईद-लख्वी भारताला का देऊ शकत नाही”
6
आजचे राशीभविष्य २० मे २०२५ : थकबाकी मिळण्यास, व्यापारातील वसुली होण्यास उत्तम दिवस
7
धोरण बदलले अन् २२ दहशतवादी पाकमध्येच मारले; पाकिस्तानात खतरनाक दहशतवादी सैफची हत्या हे भारताच्या सक्रिय धोरणाचेच संकेत
8
जगबुडी नदीत कार कोसळून मुंबईच्या पाच जणांचा मृत्यू, वडिलांच्या अंत्यविधीसाठी जाताना मुलीचा अंत
9
चार कोटींचे आंबे अमेरिकेने नाकारले; फेकून देण्याची वेळ
10
आंतरजातीय/धर्मीय अल्पवयीन जोडप्यांनाही सुरक्षा, जिल्ह्यांतील विश्रामगृहात राहणार विशेष कक्ष
11
कोरोनाने डोके वर काढताच ठाणे पालिका ‘अलर्ट’; हाँगकाँग, सिंगापूरमुळे खबरदारी, रुग्णालय सज्ज
12
ज्योतीची एनआयए, आयबीकडून चौकशी
13
विधानभवनच्या गेटवर आग; सहा मिनिटांत आटोक्यात
14
मुंबईच्या स्मशानात २ वर्षांत ४ लाख क्विंटल लाकडं जाळणार; पर्यावरणवाद्यांनी सुचवला मोक्षकाष्ठचा पर्याय, राेजगारही मिळेल 
15
मोठी बातमी! छगन भुजबळांची महायुती सरकारमध्ये घरवापसी! सकाळी दहा वाजता मंत्रि‍पदाचा शपथविधी
16
ज्योती मल्होत्राच्या मोबाईलममध्ये ISI च्या शाकिरचा नंबर कोणत्या नावाने? पाकिस्तानमध्ये भेटलेले ते दोन अधिकारी कोण?
17
MI vs DC : वानखेडेचं मैदान मारा अन् Playoffs चं तिकीट मिळवा! मुंबई इंडियन्स फक्त एक पाऊल दूर, पण...
18
SRH नं पंतच्या LSG चा खेळ केला खल्लास! आता MI अन् DC मध्ये प्लेऑफ्सची चुरस
19
IPL 2025 : भर मैदानात अभिषेक अन् दिग्वेश यांच्यात वाजलं; नेमकं काय घडलं? (VIDEO)
20
'काश्मीरला जा आणि लष्कराच्या छावणीचे फोटो घेऊन ये"; ISI एजंटने भारतातील गुप्तहेराला कोणते काम दिले होते?

चार वाघांच्या हत्येमुळे गोव्यात वन खात्यावर टीकेचा भडीमार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2020 12:44 IST

म्हादई अभयारण्यातील एकूण सातपैकी चार वाघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण गोवा हादरला आहे.

पणजी - म्हादई अभयारण्यातील एकूण सातपैकी चार वाघांचा मृत्यू झाल्याने पूर्ण गोवा हादरला आहे. विष घालून वाघांना मारले गेले. वन खाते वाघांचा मृत्यू रोखू शकले नाही व त्यामुळे वन खात्यावर प्रथमच सर्वबाजूंनी टीकेचा भडीमार होऊ लागला आहे. वन खाते मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे सांभाळत असून स्वत: सावंत हे देखील वाघ हत्येमुळे व्यथित झाले आहेत.

तिघा बछड्यांसह चार वाघांची हत्या झाली ही घटना मन सून्न करणारी आहे. खरोखर मलाही फार वाईट वाटले, असे मुख्यमंत्री सावंत यांनी लोकमतला सांगितले. एका धनगर कुटूंबातील गाय व म्हस वाघांनी मारली होती. त्यामुळे त्या कुटूंबातील काहीजणांनी विष घातले व वाघांचा जीव घेतला. आठ वर्षाची वाघिण आणि तिचे एक ते दीड वर्षाचे बछडे विषबाधेने मेले. त्यापैकी दोघा बछडय़ांना आरोपींकडून पुरले गेल्याचेही उघड झाले. अजून या प्रकरणाचा पूर्ण छडा लागलेला नाही. केंद्रीय वन व पर्यावरण मंत्रलयाने चौकशी पथक स्थापन केले आहे. वाघ मेल्यानंतर आपण वाघांना पुरले पण विष घालून त्यांना मारल्याचे काम आपण केलेले नाही अशी भूमिका एका आरोपीने घेतली आहे. या प्रकरणी गुंता वाढला आहे. त्यामुळे वन खात्याने आपल्या आणखी पाच अधिकाऱ्यांना चौकशीच्या कामासाठी नेमले आहे.

धनगर कुटूंबियांच्या दुभत्या जनावरांवर वाघ हल्ले करत होते तेव्हा वन खाते निष्क्रीय राहिले. खात्याने उपाययोजना करायला हवी होती. वाघांचा शिरकाव लोकवस्तीकडे होऊ नये म्हणूनही वन खात्याने उपाययोजना केली नाही, असे पर्यावरणप्रेमी राजेंद्र केरकर तसेच मगोपचे आमदार सुदिन ढवळीकर म्हणाले. गोवा फॉरवर्ड पक्षानेही अशाच प्रकारची टीका केली. म्हादई अभयारण्यातील वाघ हत्येची सखोल चौकशी करावी अशी मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी तसेच माजी मुख्यमंत्री प्रतापसिंग राणे, उपसभापती इजिदोर फर्नाडिस आदींनी केली. अभयारण्य परिसरातील लोकांना जर इच्छा असेल तर त्या लोकांचे सरकार अन्यत्र पुनर्वसन करील, असे मुख्यमंत्री म्हणाले. 

टॅग्स :goaगोवाTigerवाघPramod Sawantप्रमोद सावंत