शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय सैन्य अन् पहलगाम हल्ल्यातील पीडित कुटुंबांना सर्व मॅचची फी देणार; सूर्यकुमार यादवची घोषणा
2
'४ वर्षांपूर्वीपासून...', सोनम वांगचुकच्या पाकिस्तान कनेक्शनवर त्याची पत्नी गीतांजली वांगचुक काय म्हणाल्या?
3
IND vs PAK Asia Cup Final : पाकिस्तानने आशिया कप ट्रॉफीसह टीम इंडियाची पदके चोरली, बीसीसीआयचा मोठा आरोप
4
लेहमध्ये सलग पाचव्या दिवशी सर्वत्र संचारबंदी; सोनम वांगचुक यांची त्वरित सुटका करण्याची देशभरातून मागणी
5
"आता प्रायश्चित्त घेण्याची वेळ, दसरा मेळावा रद्द करून..."; भाजपाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका
6
भारताचा आशिया चषकावर विजयी 'तिलक'; पाकिस्तानला सलग तिसऱ्यांदा नमवले! कुलदीप, तिलक यांचे मोलाचे योगदान
7
आजचे राशीभविष्य, २९ सप्टेंबर २०२५: महत्वाच्या कामासाठी खर्च झाला तरी सुद्धा आर्थिक लाभ होतील
8
पंधरा दिवसांत ६०% जास्त पाऊस! मराठवाडा, मध्य महाराष्ट्रातील चित्रच बदलले; आजही ६ जिल्ह्यांतऑरेंज अलर्ट
9
महिलांची सक्तीनं नसबंदी; ६० वर्षांनी माफी! ग्रीनलँडमध्ये ४५०० महिलांसोबत काय घडलेलं?
10
मोबाइलसारखीच लवकरच  बदलता येईल गॅसची कंपनी; काय बदल होणार? जाणून घ्या
11
आता पूर ओसरेल, मदत मिळेल... पण शेतकऱ्यांसमोर ३ वर्षे संकट! पुराने पळविले जमिनीचे पोषण, पुढील हंगामात धोका
12
विजयसाठी झुंबड ठरली जीवघेणी; तामिळनाडूच्या चेंगराचेंगरीतील मृतांची संख्या ४०वर
13
थंडगार वाळवंटात ही आग कुणी लावली? केंद्र सरकारशी बोलणी सुरू असतानाही हिंसाचार का?
14
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
15
मुत्सद्देगिरी हेच औषध! ट्रम्प यांच्या 'टॅरिफ बॉम्ब'ने भारतीय फार्मा कंपन्यांचे काय होणार?
16
केवळ ३.९ टक्के महिलाच रोज करतात व्यायाम : सामाजिक मानसिकता बदलल्याशिवाय महिलांचा फिटनेस अशक्य
17
१७ विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण, ‘बाबा’ अखेर अटकेत; आग्रा येथून घेतले ताब्यात 
18
‘साधी तक्रार पुरेशी नाही; ती पत्नीछळाचा गुन्हा ठरत नाही’; सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले?
19
क्रिकेटपटू, अभिनेते येणार आणखी अडचणीत;  ऑनलाइन बेटिंगप्रकरणी मालमत्तेवर येणार टाच
20
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत

४५ हजार विद्यार्थ्यांना मिळणार लॅपटॉप

By admin | Updated: June 15, 2017 02:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : एकूण तीन टप्प्यांमध्ये अकरावी व बारावीच्या एकूण ४५ हजार विद्यार्थ्यांना सायबर एज योजनेखाली लॅपटॉप दिले जाणार आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कपणजी : एकूण तीन टप्प्यांमध्ये अकरावी व बारावीच्या एकूण ४५ हजार विद्यार्थ्यांना सायबर एज योजनेखाली लॅपटॉप दिले जाणार आहेत. त्यासाठी गोवा इन्फोटेक कॉर्र्पोरेशनने जारी केलेली निविदा उघडण्यात आली आहे. टेक्नोवर्ल्ड कंपनीसह एकूण पंधरा कंपन्यांकडून लॅपटॉपचा पुरवठा केला जाईल, हे आता स्पष्ट झाले आहे.सायबर एज योजनेखाली अलीकडील वर्षांत विद्यार्थ्यांना लॅपटॉप मिळालेच नाहीत. गेल्या वर्षी जे विद्यार्थी बारावीत होते, त्या विद्यार्थ्यांना आणि यंदा जे विद्यार्थी अकरावी व बारावीत पोहचले आहेत, अशा विद्यार्थ्यांना लॅपटॉप दिले जातील. यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रथम पंधरा हजार लॅपटॉपचे वितरण केले जाईल. त्यानंतर पुन्हा दोन टप्प्यांमध्ये प्रत्येकी पंधरा हजार लॅपटॉप सरकारचे इन्फोटेक महामंडळ खरेदी करणार आहे. यासाठी निविदा जारी करून ती उघडण्यात आली आहे. कंत्राट मिळविण्यासाठी एकूण एकवीस कंपन्यांनी निविदा भरण्याची तयारी दाखवली होती. त्यापैकी पंधरा कंपन्यांनी शेवटी निविदा भरली. पंधरा कंपन्या पात्र ठरल्या असून टेक्नोवर्ल्ड कंपनीची निविदा ही सर्वात ‘लोवेस्ट’ आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. आता याबाबतची फाईल मंजुरीसाठी सरकारकडे पाठविली जाणार आहे. एकूण एक तृतीयांश लॅपटॉपचे वितरण टेक्नोवर्ल्डकडून केले जाणार आहे. इतर चौदा कंपन्यांनाही लॅपटॉप वितरणाच्या कामाचा वाटा मिळणार आहे. सुमारे ८५ कोटी रुपयांना सरकार हे लॅपटॉप खरेदी करून विद्यार्थ्यांना मोफत देणार आहे.