शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

खाण लुटीतील गोठवलेल्या रक्कमेतील 36 टक्के उद्योजक इम्रान खानला परत

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2018 11:03 IST

एकीकडे खाण घोटाळ्यातील लुटीची वसुली कधी करून घेणार असल्याची विचारणा न्यायालयाकडून सरकारला वारंवार केली जात आहे तर दुसरीकडे खनिज घोटाळा प्रकरणात पुराव्यांसह अटक करून ज्याची ६९ कोटी रुपयांची खाती गोठविली गेली.

- वासुदेव पागी

पणजी - एकीकडे खाण घोटाळ्यातील लुटीची वसुली कधी करून घेणार असल्याची विचारणा न्यायालयाकडून सरकारला वारंवार केली जात आहे तर दुसरीकडे खनिज घोटाळा प्रकरणात पुराव्यांसह अटक करून ज्याची ६९ कोटी रुपयांची खाती गोठविली गेली. इम्रान खानची एकूण ३६ टक्के रक्कम न्यायालयाच्या आदेशानेच परत मिळविण्यास त्यानं  मिळविले आहे. 

इम्रान खानला ३०० कोटी रुपयांच्या खनिज घोटाळा प्रकरणात खाण प्रकरणाचा तपास करणा-या विशेष तपास पथकाने अटक केली होती. तपासादरम्यान तो बेकायदेशीरपणे खनिजाचे ट्रेडिंग करीत असल्याचे आढळून आले. कोट्यवधी रुपयांची खनिजांची त्याने बेकायदेशीररित्या निर्यात केली होती. गोव्यातील काही मोठ्या खाण मालकांशीही त्याचे व्यवहार झाल्याचे पुरावे पोलिसांना मिळाले आहेत. खाण खात्याला कोट्यवधी रुपयांचे नुकसान करून खनिजे निर्यात करण्याचा ठपका एसआयटीकडून त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. मडगाव येथील एका राष्ट्रीयकृत बँकेत त्याची १०० हून अधिक खाती आढळून आली होती. काही खाती नातेवाईकांच्या नावावर खोलण्यात आली होती आणि खात्यात कोट्यवधी रुपये जमा करण्यात आले होते. त्याच्या खात्याची चौकशी सुरू झाल्यानंतर बँक अधिका-याला हाताशी धरून काही खाती बंद करून पैसे इतरत्र वळविण्याचे प्रकारही आढळून आले होते. त्यामुळे ऊर्वरीत ६९ कोटी रुपयांची खाती एसआयटीकडून गोठविण्यात आली होती. 

आपली खाती गोठविल्यामुळे आपल्या कुटुंबाला त्रास सहन करावा लागत असल्याचा दावा करून  ही खाती सोडविण्याचा आटोकाट प्रयत्न इम्रानने चालविला होता. मानवतेच्या दृष्टीकोनातून विचार करून पैसे काढू द्यावेत यासाठी त्याने दोन वेळा सत्र न्यायालात तर दोनवेळा उच्च न्यायालयात धाव घेतली. सत्र न्यायालयाने व उच्च न्यायालयाने मिळून तीन टप्प्यात त्याला एकूण २५ कोटी रुपये काढू देण्याचा आदेश एसआयटीला दिल्यामुळे जवळ जवळ ३६ टक्के  रक्कम उचलण्यात तो यशस्वी झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या पणजी खंडपीठाने ३.५ कोटी रुपये काढू देण्याचा आदेश दिला होता तर सत्र न्यायालयाने एकदा ५५ लाख रुपये तर गेल्या शुक्रवारी २१.५ कोटी रुपये काढू देण्याचा आदेश एसआयटीला दिला. 

इम्रान खान खाण घोटाळ्यात असल्याचे सिद्ध करण्याचे  प्रथमदर्शनी पुरावे जर एसआयटीने सादर केले आहेत व न्यायसंस्थेला त्यात तथ्य वाटत असेल तर त्याला पैसे काढू देणे कितपत योग्य ठरते? तसेच जर तसे पुरावे सादर करण्यास एसआयटीला अपयश आल्याचे जर न्यायसंस्थेला वाटत असेल तर त्याची गोठविण्यात आलेले सर्वच रक्कम का मुक्त करण्यात आली नाही? केवळ ३६ टकक्केच का काढू देण्यात आले? असे प्रश्न उपस्थित झाले आहेत. त्यामुळे  लुटीच्या वसुलीच्या बाबतीत निर्माण झालेली अनिच्छितता मात्र कायम राहिली आहे.

टॅग्स :Mining Scamखाण घोटाळाgoaगोवा