शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
2
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
3
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
4
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
5
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
6
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
7
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
8
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
9
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
10
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
11
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
12
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
13
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
14
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
15
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
16
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
17
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
18
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक
19
T20I मधून निवृत्ती घेण्याच्या निर्णयात घाई झाली का? विराट कोहली म्हणाला- "तो विचार पूर्णपणे..."
20
वादळी वाऱ्याने लग्नाचा मंडप उडाला; नवरदेव-नवरीला चिखलातून खांद्यावर न्यावे लागले

३०० कर्मचाऱ्यांचे उपोषण

By admin | Updated: December 2, 2014 00:57 IST

पणजी : एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंट सोसायटीअंतर्गत गोमेकॉ, आझिलो, कला अकादमी तसेच वेगवेगळ्या खात्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तसेच अन्य काम करणाऱ्या

पणजी : एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंट सोसायटीअंतर्गत गोमेकॉ, आझिलो, कला अकादमी तसेच वेगवेगळ्या खात्यांमध्ये सुरक्षा रक्षक म्हणून तसेच अन्य काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी सेवेत कायम केले जावे यासाठी सोमवारपासून बेमुदत उपोषण सुरू केले आहे. येथील बंदर कप्तान जेटीसमोर सुमारे ३00 आंदोलक उपोषणास बसले आहेत. त्यात महिलांचाही समावेश आहे. सुरक्षा रक्षक, चालक, मेडिकल अटेंडंट, लॅब असिस्टंट म्हणून काम करणारे हे कर्मचारी गोवा ट्रेड युनियन कॉन्फिडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अजितसिंह राणे यांच्या नेतृत्वाखाली सकाळी या ठिकाणी जमले आणि बेमुदत उपोषण सुरू केले. एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंट सोसायटीअंतर्गत साळावली धरण, दंत महाविद्यालय, मानसोपचार इस्पितळ, हॉस्पिसिओ इस्पितळ या ठिकाणीही हे कर्मचारी गेली काही वर्षे कामाला आहेत. या कर्मचाऱ्यांची एकूण संख्या १७00 आहे. सेवेत कायम करण्याबरोबरच एम्प्लॉयमेंट रिक्रुटमेंट सोसायटी बरखास्त करावी व सर्व विषय मनुष्यबळ विकास महामंडळाकडे सोपवावेत, महिना १३,0५५ रुपये पगार मिळणे आवश्यक असताना कर्मचाऱ्यांना ४,९५0 रुपयेच दिले जातात ते वाढवावेत, कामाचे तास निश्चित करावेत आदी १४ मागण्या आहेत. ३ ते ७ वर्षे हे कामगार सेवत असूनही त्यांना कायम केले गेलेले नाही. २७ आॅक्टोबर रोजी कर्मचाऱ्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आल्तिनो येथील शासकीय बंगल्यावर मोर्चा काढून त्यांना निवेदन सादर केले होते. गोवा ट्रेड युनियन कॉन्फिडरेशनचे अध्यक्ष अ‍ॅड. अजितसिंह राणे यांनी या प्रतिनिधीस सांगितले की, कर्मचारी मागण्यांवर ठाम आहेत. त्यांना न्याय मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नाही. सरकारला संपाची कायदेशीर नोटीस दिली होती. सरकारने किमान चर्चेसाठी तरी बोलवायला हवे होते. मागण्या मांडणे हा मानवी अधिकार आहे. सरकारने पारदर्शकता ठेवली पाहिजे. महांसघाचे सदस्य गणेश चोडणकर म्हणाले की, हे कर्मचारी ज्या खात्यांमध्ये काम करतात तेथे रिक्त जागा आहेत. त्या जागांवर त्यांची भरती केली जावी. सरकारी सेवेत २४0 दिवस झाले की कायम सेवेत घेण्यासाठी दावा केला जाऊ शकतो. सर्वोच्च न्यायालयाचा तसा आदेश आहे. (प्रतिनिधी)