शहरं
Join us  
Trending Stories
1
अहिल्यानगर येथे रांगोळीवरून तणाव, CM फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “जाणीवपूर्वक...”
2
बैलाला साखळी घालतात तसे दिसते; अजित पवार ज्वेलरी शॉपच्या उद्घाटनाला गेले, गोल्डमॅन म्हणून वावरणाऱ्यांना फटकारले
3
एका सल्ल्यासाठी ₹११ कोटी! पीकेंच्या कमाईचे आकडे पाहून चक्रावून जाल; ₹९८ कोटी दान केले...
4
'त्या नारी शक्तीचे एक उदाहरण...', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जॉर्जिया मेलोनी यांच्या आत्मचरित्राला प्रस्तावना लिहिली
5
प्रशांत किशोर यांची 3 वर्षांची कमाई बघून थक्क व्हाल, जन सूरज पक्षाला डोनेट केले तब्बल 98 कोटी!
6
अरेरे! लहान वयात केस पिकले, नारळाच्या तेलात 'हे' मिसळा; चिंता सोडा, पांढऱ्या केसांना टाटा करा
7
'तुला तुरुंगामध्ये टाकेन हा, मी तुला सांगतोय'; अजित पवारांच्या संतापाचा कडेलोट, दीड कोटींच्या उधारीचं प्रकरण काय?
8
'हे' मेड इन इंडिया मॅसेजिंग अ‍ॅप घेणार WhatsApp ची जागा? दुर्गम भागातील लोकांना होणार फायदा?
9
एशिया कप 2025 चा हिरो: विजयाचा तिलक लावला खरा, पण कुटुंबाचे २०२२ पर्यंत स्वत:चे घर नव्हते...; वडील इलेक्ट्रीशिअन...
10
ऑटो कंपन्यांचे पाकिस्तानातून पलायन! सरकारकडून सेकंड हॅन्ड गाड्यांना आयात करण्यासाठी परवानगी
11
PM मोदींच्या 'X' पोस्टने पाकिस्तानचे मंत्री मोहसिन नकवी अन् ख्वाजा आसिफचा 'थयथयाट', म्हणाले...
12
वनप्लस १३ नंतर १४ नाही, थेट १५ सिरीज बाजारात आणणार; भारतात कधी लाँच होणार... 
13
Ahilyanagar: मुस्लीम धर्मगुरूंच्या नावाची रस्त्यावर रांगोळी; अहिल्यानगरमध्ये तणाव, 'रास्ता रोको'नंतर लाठीचार्ज
14
सणासुदीच्या काळात सावध राहा! सायबर गुन्हेगार AI वापरुन करतायेत फसवणूक; कसं राहाल सुरक्षित?
15
IND vs PAK : क्रिकेटमध्ये राजकारण आणणारा तू पहिला कॅप्टन! सूर्यानं पाक पत्रकाराला असा दिला रिप्लाय (VIDEO)
16
'अगदी बरोबर केलं...!'; पहलगाम दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झालेल्या विनय नरवाल यांचे वडील टीम इंडियावर खुश!
17
आता टीम इंडियाला मिळणार नाही आशिया चषकाची ट्रॉफी? काय आहे ICCचा नियम, जाणून घ्या
18
जन्मदातीने सोडलं, परदेशी जोडप्यानं सांभाळलं; ३८ वर्षांनी स्वित्झर्लंडची नताशा मुंबईत, खऱ्या आईला भेटली
19
भारताविरोधात लढत होता पाकिस्तानी नेव्हीचा अधिकारी, खेळलाही...; पण गुडघे टेकत पराभूत झाला...
20
ज्यांनी भावाची चौकशी केली नाही, ते गावाची काय करणार; शिवाजी सावंतांचा तानाजी सावंतांवर आरोप

गोव्यात ५० दिवसांत ३० महिलांचा कोविडने मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 24, 2020 15:09 IST

ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोविडमुळे जास्त बळी

पणजी : गेल्या साधारणत: पन्नास दिवसांमध्ये एकूण तिस महिलांचा कोविडमुळे मृत्यू झाला आहे. या महिला साठ वर्षांहून जास्त वयाच्या आहेत. अवघ्याच महिला पन्नास ते साठ वर्षे अशा वयोगटातील आहेत.

ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर व नोव्हेंबर महिन्यात कोविडमुळे जास्त बळी गेले. तुलनेने डिसेंबर महिन्यात जास्त मृत्यू झाले नाहीत. गेल्या ५० दिवसांत १०८ व्यक्तींचा कोविडने बळी घेतला. त्यात ३० महिला आहेत. बहुतांश पुरुष रुग्णांचा जीव गेला. या पुरुष रुग्णांमध्ये ९० टक्के ज्येष्ठ नागरिक आहेत.

डिसेंबर महिन्यात आतापर्यंत म्हणजे दि. २४ डिसेंबरपर्यंत एकूण ४० कोविड रुग्णांचे मृत्यू झाले. त्यात त्यात तेरा महिलांचा समावेश आहे. म्हणजेच डिसेंबरमध्ये जे एकूण कोविड रुग्ण मरण पावले, त्यात एक तृतीयांश महिला आहेत.

राज्यात आतापर्यंत कोविडने ७२७ बळी घेतले आहेत. ज्या महिला किंवा पुरुष रुग्णांचे कोविडने मृत्यू झाले, त्यापैकी अनेकांना काही गंभीर असे आजार होते. काहीजणांनी कोविड झाल्यानंतरही चाचणी करून घेण्यास व उपचार करून घेण्यास विलंब केला. काहीजण खूपच उशिरा इस्पितळात दाखल झाले.

राज्यात सक्रिय रुग्णांची संख्या गेल्या दोन दिवसांत वाढली ही चिंतेची गोष्ट मानली जाते. आता एक हजार सक्रिय रुग्ण आहेत पण २२ डिसेंबर रोजी सक्रिय रुग्ण ९४७ होते. त्यापूर्वी ९४१ संख्या होती. २० डिसेंबर रोजी मात्र संख्या ९७२ होती आणि १८ रोजी सक्रिय रुग्णांची संख्या ९६१ होती.

सात ठिकाणी कोविडग्रस्तांची संख्या खूप कमी झाली आहे. धारबांदोडा, बाळ्ळी, डिचोली, वाळपई, सारवर्णे, मये, कोलवाळे येथे आता कोविडग्रस्तांची संख्या कमी आहे. साखळीत अजून संख्या वीस आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या