शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

२०२७ मध्ये गोव्यात ३० पार! इंडिया आघाडीची घोषणा 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 6, 2024 11:23 IST

विधानसभा, पंचायत निवडणुकीतही फॉर्म्युला

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: विरोधी पक्ष एकत्र आल्यामुळे काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडीला दक्षिण गोव्यात लोकसभा निवडणुकीत विजय मिळाला. तसाच विजय विधानसभा निवडणुकीतही मिळविणार आणि दोन्ही जिल्ह्यांत मिळून ३० जागा जिंकणार, अशी घोषणा इंडिया आघाडीकडून काँग्रेस हाऊसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आली.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, दक्षिण गोव्यात काँग्रेसला ९ विधानसभा मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. उत्तर गोव्यात तीन मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. त्यामुळेच एकत्र येऊन लढलो, तर इंडिया आघाडीला दक्षिण गोव्यात १७, तर उत्तर गोव्यात १३ जागा मिळू शकतात, हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे २०२७ मधील गोवा विधानसभेच्या निवडणुकीत ३० पार अशीच इंडिया आघाडीची घोषणा राहणार असल्याचेही ते म्हणाले.

इंडिया आघाडी बनेल लोकांचा आवाज : अमित पाटकर

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी ही भाजपच्या पतनाची सुरुवात असल्याचे म्हटले आहे. आघाडी पंचायत ते विधानसभेपर्यंत गोव्यात इंडिया आघाडी बनली आहे. ती लोकांचा आवाज बनून राहणार असल्याचे विजय सरदेसाई यांनी सांगितले. ही आघाडी केवळ लोकसभा निवडणुकीपुरतीच सीमित नव्हती तर ग्रामपंचायत स्तरापासून विधानसभा स्तरावरही एकत्र येऊनच लढणार आहेत. त्यामुळे भाजपला कुठेही डोके वर काढू दिले जाणार नाही, असेही ते म्हणाले.

फुटीर आमदार मताधिक्क्य मिळविण्यात अपयशी

इंडिया आघाडीचा घटक पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डचे विजय सरदेसाई यांनीही युरी आलेमाव यांच्या सुरात सूर मिळविताना तशीच घोषणा केली. ते म्हणाले की, गोव्यात इंडिया आघाडी कायम टिकणार आहे. भाजपचा अहंकार अशामुळेच जिरविणे शक्य होणार आहे. भाजपने ८ आमदार फोडले म्हणून हे फोडलेले आमदार भाजपला मते मिळवून देऊ शकले नाहीत. देवाचा माणूस म्हणविणाऱ्याचीही परिस्थिती मडगावात दयनीय झाली आहे, असे ते म्हणाले. नवनिर्वाचित खासदार विरियातो फर्नाडिस यांनी आपण दिल्लीत गोमंतकियांचा आवाज बनणार असल्याची ग्वाही दिली. प्रचारादरम्यान लोकांची दुःखे, समस्या पाहिल्या आहेत, जाणून घेतल्या. 

टॅग्स :goaगोवाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडी