शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोव्यातील 30 टक्के सरकारी कर्मचाऱ्यांचे इतर धंदे, चौकशी करणार - रोहन खंवटे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2019 16:43 IST

गोवा सरकारचे नवे रोजगार धोरण तयार होत आहे. त्या धोरणासाठी उद्योजक, कामगार, उद्योगांमधील एचआर विभागाचे अधिकारी यांची मते जाणून घेण्याच्या हेतूने मजुर खात्याने संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता.

पणजी : राज्यात एकाबाजूने सरकारी नोकरीसाठी हजारो शिक्षित युवक रांगेत उभे आहेत आणि दुस-या बाजूने गोव्याच्या प्रशासनातील किमान 30 टक्के कर्मचारी तरी सरकारी सेवेत राहूनही विविध प्रकारचे अन्य धंदे करत असतील, असे मजूर खात्याचे मंत्री रोहन खंवटे यांनी शुक्रवारी येथे सांगितले व एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाला तोंड फोडले. अशा कर्मचा-यांची चौकशी करून घेतली जाईल व त्यासाठी आपण मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना लवकरच पत्र लिहिन असेही खंवटे यांनी जाहीर केले.

गोवा सरकारचे नवे रोजगार धोरण तयार होत आहे. त्या धोरणासाठी उद्योजक, कामगार, उद्योगांमधील एचआर विभागाचे अधिकारी यांची मते जाणून घेण्याच्या हेतूने मजुर खात्याने संवादाचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यावेळी प्रमुख पाहुणो या नात्याने मंत्री खंवटे बोलत होते. जे कुणी विविध व्यवसाय-धंदे करतात, त्यांनी ते करावेच. त्यांच्या स्वयंरोजगार कौशल्याची मी प्रशंसा करतो पण सरकारी सेवेतील जागा अडवून हे करता येणार नाही. अनेकदा कर्मचारी व अधिकारी सरकारी सेवेला व स्वत:च्या पदाला न्यायच देत नाहीत. ते महत्त्वाचा वेळ खासगी धंद्यांसाठीच देतात. अशा कर्मचा-यांनी सरकारी नोकरी सोडावी व त्यांचे साईड बिझनेस सांभाळावेत, असे मंत्री खंवटे म्हणाले.

मोठ्या संख्येने असे कर्मचारी असतील. मुख्यमंत्री सावंत यांच्याकडे पर्सनल खाते असल्याने आपण त्यांना चौकशी करण्याची विनंती करणारे पत्र लिहीन. वार्षिक हजारो पदवीधर व अन्य कौशल्ये असलेले मनुष्यबळ तयार होत असते. प्रशासनात नव्या रक्ताला वाव मिळू द्या, असे खंवटे म्हणाले.

परप्रांतीयांचा डेटा द्या राज्यातील उद्योगांमध्ये सध्या गोमंतकीय किती काम करतात व परप्रांतीय किती आहेत याविषयीचा डेटा उद्योगांनी सादर करावा. काही उद्योजक याविषयी सहकार्य करत नाहीत. आम्ही डेटा कुणाची सतावणूक करण्यासाठी मागत नाही. गोमंतकीयांमधील बेरोजगारीच्या समस्येवर उपाय काढण्यासाठी हा डेटा हवा आहे. कोणत्या उद्योगाला कशा प्रकारचे मनुष्यबळ हवे, कौणते कौशल्य युवकांमध्ये विकसित व्हायला हवे हे आम्हाला डेटामुळेच कळेल. उद्योगांनी यापुढे डेटा दिला नाही तर खास पथके नियुक्त करून डेटा मिळविण्यासाठी ही पथके उद्योगांमध्ये पाठविता येतील. गोव्यातील उद्योग अनेकदा परप्रांतांमधील मनुष्यबळ आणतात. गोव्यात मनुष्यबळ तयार आहे. गोव्यातील माणसाला जर बाहेरील राज्यात नोकरी मिळते तर, ती गोव्यात का मिळत नाही असा प्रश्न निर्माण होतो, असे खंवटे म्हणाले.