शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
2
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
3
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
4
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
5
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
6
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
7
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
8
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
9
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
10
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
11
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
12
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
13
दिवसभर उड्या मारतात, एका जागी बसतंच नाहीत... हायपर एक्टिव्ह मुलांशी नेमकं वागायचं तरी कसं?
14
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
15
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
16
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
17
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
18
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
19
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
20
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे

३ वर्षांत ३,४३६ बेकायदा बांधकामाच्या तक्रारी नोंद; 'आरटीआय'मध्ये माहिती उघड

By किशोर कुबल | Updated: November 6, 2024 09:12 IST

असे असले तरी अशा बांधकामांची संख्या प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे. 

किशोर कुबल, लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: पंचायत खात्याकडे २०२१ पासून गेल्या तीन वर्षांच्या कालावधीतच बेकायदा बांधकामांबाबत तब्बल ३,४३६ तक्रारी नोंद झालेल्या आहेत. असे असले तरी अशा बांधकामांची संख्या प्रत्यक्षात त्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त असण्याची शक्यता आहे. 

कुचेली येथे सरकारी व कोमुनिदादच्या जमिनीत एक, दोन नव्हे तर तब्बल १४० बेकायदा घरे बांधली जाईपर्यंत सरकारी यंत्रणा झोपली होती का? ही बेकायदा बांधकामे तेव्हाच का रोखली नाहीत? आदी प्रश्न उपस्थित होत आहेत.

पंचायत खात्याच्या बेकायदा बांधकाम विभागाकडे गेल्या तीन वर्षाच्या कालावधीत नोंद झालेल्या तक्रारी है हिमनगाचे टोक आहे सरकारी जमिनींमध्ये अतिक्रमण करून अशी हजारो बांधकामे राज्यात ठिकठिकाणी बांधलेली आहेत, हे नाकारून चालणार नाही, असे मत नाव उघड न करण्याच्या अटीवर सरकारी अधिकारीही व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, माहिती अधिकारात विचारण्यात आलेल्या बांधकाम परवान्यांच्या बाबतीत किती पंचायत सचिव अथवा गट विकास अधिकाऱ्यांवर कारवाई केली? या प्रश्नावर तसेच ग्रामसभा वेळेत न घेणे किंवा पंचायत राज कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी किती पंचायतींवर करवाई केली, याचेही उत्तर मिळू शकले नाही.

एखाद्या बांधकामाला आवश्यक ते सर्व कायदेशीर सोपस्कार पूर्ण केले असतानाही व त्या अनुषंगाने दस्तऐवज सादर केले असूनही बांधकाम परवाना देण्यास पंचायतीने ३० दिवसांपेक्षा अधिक काळाचा विलंब लावल्यास पंचायतीच्या सचिवाने प्रकरण गटविकास अधिकाऱ्यांकडे पाठवायचे असते. 

गट विकास अधिकाऱ्यांनेही त्यापुढील ३० दिवसांत निर्णय न घेतल्यास परवाना दिल्याचे गृहित धरले जाते. अशा किती प्रकरणात ६० दिवसानंतर परवाने मिळाले?, या प्रश्नावर सर्व बाराही गट विकास कार्यालयात स्वतंत्र अर्ज करून माहिती मिळवा, असे उत्तर देण्यात आले.

 

टॅग्स :goaगोवाRTI Activistमाहिती अधिकार कार्यकर्ताRight to Information actमाहिती अधिकारState Governmentराज्य सरकार