शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईन ठप्प; केवळ सीएसएमटी ते वाशीपर्यंतच लोकल सुरु, ट्रान्स हार्बरवही परिणाम
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
4
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
5
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
6
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
7
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
8
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
9
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
10
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
11
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
12
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
13
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
14
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
15
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
16
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
17
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
18
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
19
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
20
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत

२०२७ मध्ये २७ जागा? भाजपाला शक्य होईल का? दामू नाईकांसमोर आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 09:29 IST

मगच २०२७ साली किती जागा मिळू शकतात, याचा खरा अंदाज नेतृत्वाला येईल.

गोवा विधानसभेसाठी येत्या २०२७ मध्ये निवडणूक होईल. भाजप प्रदेशाध्यक्ष दामू नाईक आतापासूनच उत्साहात सांगू लागलेत की, भाजपला २०२७ च्या निवडणुकीत २७ जागा जिंकायच्या आहेत. कदाचित ३० जागा देखील भाजप जिंकू शकतो, असा विश्वास दामू व्यक्त करत आहेत. गेल्या आठवड्यातही ते तसे बोलले व परवा एका दैनिकाच्या वर्धापन दिन सोहळ्यातही त्यांनी तशा अर्थाचे विधान केले. दामू नाईक यांना कार्यकर्त्यांत उत्साह आणि चैतन्य जागविण्यासाठी तसे बोलावेच लागेल. ती एक राजकीय रणनीतीच असते. मात्र, वस्तुस्थिती काय आहे, लोकांच्या सरकारकडून काय अपेक्षा आहेत, जनसामान्यांना शासकीय स्तरावरील भ्रष्टाचार किंवा नोकरशाहीचा अकार्यक्षमपणा कसा त्रासदायक ठरतोय, हे दामू नाईक यांना ठाऊक असेलच.

२०२७ च्या मार्चमध्ये निवडणूक होईल, असे गृहीत धरले तर केवळ दोनच वर्षे म्हणजे २४ महिनेच शिल्लक आहेत. २४ पैकी शेवटचे ४ महिने केवळ निवडणुकीच्या धामधुमीचे असतात, तेव्हा मोठीशी कामेही होत नाहीत. प्रत्यक्ष दीड वर्षच शिल्लक आहे, असे म्हणता येते. २०२६ साल हे निवडणूक वर्ष असे मानून सर्व विरोधी राजकीय पक्ष त्या वर्षीच कामाला लागतील. मात्र, भाजपने आतापासूनच २०२७ च्या निवडणुकीची पूर्वतयारी सुरू केलीय, असे म्हणता येते. एका अर्थाने ते चांगलेही आहे. भाजपच्या केंद्रीय नेतृत्वाने खूप विचार करून प्रदेशाध्यक्षपद दामू नाईक यांच्याकडे सोपवले आहे. दामू आता ५३ वर्षांचे, तर मुख्यमंत्री प्रमोद सावंत ५१ वर्षांचे आहेत. दोघांचा वयोगट समान असून, उत्साहदेखील समान पातळीवर आहे. 

मुख्यमंत्री सावंत दिवसरात्र भाजपच्या सर्व कार्यक्रमांमध्ये, बैठकांमध्ये सहभागी होत असतात. दामू नाईक व प्रमोद सावंत यांच्यात सुसंवाद राहिला, तर भाजपलाच लाभ होईल, पण जनभावना काय आहे, याचा आढावाही प्रदेशाध्यक्षांना घ्यावा लागेल. प्रत्येक मंत्र्याच्या कामकाजाची पद्धत व प्रगतीचा गंभीरपणे व तटस्थपणे आढावा घेऊन रिपोर्ट कार्ड तयार करावे लागेल. दामू नाईक यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर लगेच जाहीर केले होते की, मंत्र्यांचे रिपोर्ट कार्ड आपला पक्ष तयार करील. दामू गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना भेटून आले. ते दोनवेळा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनादेखील भेटले. दामू नाईक यांना शाह यांनी योग्य मार्गदर्शन केले, अशी माहिती मिळते. गोव्यात संघटनात्मक पातळीवर किंवा मंत्रिमंडळातदेखील जे बदल यापुढे होतील त्याची माहिती कदाचित दामू नाईक यांच्याकडे असेल, पण त्यांनी ती गुप्त ठेवली आहे. गोव्याच्या मंत्रिमंडळात काही बदल करून आता सरकार अधिक लोकाभिमुख झाले आहे, असा संदेश द्यावा लागेल. 

सरकारी कार्यालयांमध्ये कित्येक खेपा मारूनही कामे होत नाहीत, ही लोकांची समस्या आहे. गोवा सरकार मोठमोठ्या प्रकल्पांना लाखो चौरस मीटर क्षेत्रफळाच्या जमिनी सक्तीने देऊ पाहते. याविरुद्ध जनतेत असंतोष निर्माण होतोय, हे लक्षात घ्यावे लागेल. मयेवासीयांशी खेळण्याचा प्रयत्न सरकार करतेय. कधी धारबांदोड्याची, कधी थिवीची, तर कधी पेडण्यातील सुपीक जमीन केंद्रीय प्रकल्पांना देण्याचा प्रयत्न होतोय. हे प्रकल्प गोंयकारांना किती नोकऱ्या मिळवून देतात? किती गोमंतकीयांना रोजगार संधी मिळते हे एकदा तपासून पाहावे लागेल. सांकवाळ भागात भुतानी प्रकल्पाविरुद्ध लोकांमध्ये असलेला रोष, तसेच डिचोली तालुक्यात मायनिंगविरुद्ध सुरू असलेले आंदोलन याकडे भाजप दुर्लक्ष करू शकत नाही. तो आगीशी खेळ ठरेल. 

सरकारने धारगळमध्ये सनबर्न लादला होता व पोलिसांचा वापर करून जनतेचा आवाज बंद केला होता. दामू नाईक प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साह व सकारात्मक भावना वाढली, हे मान्य करावे लागेल. निष्ठावान कार्यकर्त्याला आपल्या पक्षात सर्वोच्च स्थान दिले जाते, हा सुखद धक्का भाजपच्या कार्यकर्त्यांना आवडला. पूर्वी भाजप सोडून गेलेले अनेकजण पुन्हा पक्षात येऊ पाहात आहेत. मात्र, दामूंना पुढील काळात तरी राज्यभर जनसंपर्क यात्रा काढावी लागेल. लोकांमध्ये थेट जाऊन जनतेची मते जाणून घ्यावी लागतील. मगच २०२७ साली किती जागा मिळू शकतात, याचा खरा अंदाज नेतृत्वाला येईल. 

टॅग्स :goaगोवाBJPभाजपाPoliticsराजकारण