शहरं
Join us  
Trending Stories
1
मदरसे, मशिदी तीन दिवसांत ओस पडल्या! स्ट्राईक होणार या शक्यतेने दहशतवादी पळाले
2
आले किती, गेले किती...! एकट्या दिल्लीत ५००० पाकिस्तानी, IB ने यादी सोपविली; पुढे काय...
3
"मला अनुभव आला तो मांडला, तरी दिलगिरी व्यक्त करतो"; पोलिसांविषयी वादग्रस्त वक्तव्य करुन गायकवाडांचा माफीनामा
4
"एक दिवस पाकिस्तानी स्वतःच्याच सरकारविरोधात बंड पुकारतील" विजय देवरकोंडा स्पष्टच बोलला
5
बायकोसोबत काश्मिरमध्ये अडकलेल्या मराठी कलाकाराचा सुन्न करणारा अनुभव, म्हणाला- "गेल्या पाच दिवसात आम्हाला..."
6
Cars24 ने एकाच वेळी २०० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं; कपातीचे कारणही सांगितलं
7
पहलगाम हल्ल्यातील मृतांच्या वारसांना शासकीय नोकरी देण्याबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
8
"मी तिच्याशिवाय राहू शकत नाही, दहशतवाद्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे"; आईपासून दुरावली मुलं
9
रिकी पाँटिंगमुळे पंजाब आयपीएलची ट्रॉफी जिंकणार नाही, माजी क्रिकेटपटूचे गंभीर आरोप
10
परदेशी गुंतवणूकदारांची आठवड्यात १७,४२५ कोटी रुपयांची गुंतवणूक; 'ही' आहेत २ मुख्य कारणं
11
मुदत संपली! मायदेशात परतण्यासाठी पाकिस्तानी नागरिकांची धावाधाव, बॉर्डरवर रांगा...
12
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
13
पाकिस्तान प्रेग्नेंट, कधीही बलुचिस्तानची डिलीवरी होऊ शकते; विकास दिव्यकीर्ती यांनी पाकिस्तानची परिस्थिती सांगितली
14
सोलापूर डॉक्टर आत्महत्या: कॉल रेकार्डमधील माहितीमध्ये नवा पुरावा आढळणार?
15
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
16
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
17
पती झाला हैवान! बहिणीच्या लग्नासाठी भावाने घर विकलं, हुंड्यासाठी सासरच्यांनी तिलाच मारलं
18
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
19
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?

१५ ते २९ वयोगटातील बेरोजगारी दर २७ टक्के; भाजप सरकारचे अपयश समोर, आपचा आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 18:26 IST

यावेळी त्यांच्या सोबत आपचे युवा नेते रोहन नाईक व सलमान खान उपस्थित होते. 

- नारायण गावस

पणजी: भाजप सरकारच्या काळात बेरोजगारी दर वाढला आहे. केंद्र सरकारने जारी केलेल्या रिपोर्टनुसार राज्यातील एकूण ९.७ टक्के बेरोजगारी दर आहे. तर १५ ते २९ वयोगटातील बेरोजगारी दर हा २७.४ टक्के आहे. हे भाजप सरकारचे मोठे अपयश आहे, असा आरोप आम आदमी पक्षाचे नेते वाल्मिकी नाईक यांनी पत्रकार परिषदेत केला. यावेळी त्यांच्या सोबत आपचे युवा नेते रोहन नाईक व सलमान खान उपस्थित होते. 

प्रत्येक निवडणूकीत भाजप सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याचे आश्वासन देत असते. अनेक रोजगार मेळावे आयोजित केले जातात पण प्रत्येक्षात बेरोजगारी कमी होत नाही. एकूण १५ ते २९ वयाेगाटीतील १०० तरुणांमागे २७ तरुण हे बेरोजगार आहेत. या युवकांना सरकारी नोकरी देण्यास अपयश आले आहे, असेही वाल्मिकी नाईक यांनी सांगितले.

आप सरकारने दिल्ली तसेच पंजाबमध्ये मोठ्या प्रमाणात युवकांना रोजगार उपलब्ध करुन दिला आहे. खासगी तसेच विविध सरकारी क्षेत्रातही नोकऱ्या उपलब्ध करुन दिल्या आहेत. पण गोव्या सारख्या लहान राज्यात सरकारला बेरोजगारी कमी करण्यास अपयश आले आहे. हे सरकार फक़्त भ्रष्टाचार, जमिन विक्री तसेच आपल्या स्वार्थासाठी काम करत आहे. या लोकांना युवकांचे काहीच पडलेले नाही असा अरोपही वाल्मिकी नाईक यांनी केला आहे.

रोजगार मेळाव्यावर श्वेत पत्रिका काढागेल्या वर्षी श्यामाप्रसाद मुखर्जी मैदानावर २.६० कोटी रुपये खर्च करुन मोठा रोजगार मेळावा आयोजित केला होता. यात राज्यभरातून हजारो बेरोजगार युवकांनी हजेरी लावली होती. यातील किती युवकांना नोकऱ्या दिल्या हे सरकारने जाहीर करावे. तसेच त्यांना किती पगाराची नोकरी दिले हे सांगावे. आज अनेक सुशिक्षित युवकांना ८ ते १० हजार रुपयांची नोकरी दिली जात आहे. यात ते आपला खर्च तसेच कुटुंबाचे पालन पोषण कसे करणार याचा सरकारने विचार करणे गरजेचे आहे, असे आपचे युवा नेते रोहन नाईक यांनी सांगितले.

टॅग्स :goaगोवा