शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

लोलयेत २२ लाख चौ.मी. जमीन रूपांतराचा घोटाळा

By admin | Updated: March 27, 2015 01:29 IST

पणजी : लोलये-काणकोण येथील २२ लाख चौरस मीटर जमिनीचे इको टुरिझमच्या नावाखाली रूपांतर केले असून सरकारने

पणजी : लोलये-काणकोण येथील २२ लाख चौरस मीटर जमिनीचे इको टुरिझमच्या नावाखाली रूपांतर केले असून सरकारने यापूर्वीच्या दोन्ही प्रादेशिक आराखड्यांमधील तरतुदींना हरताळ फासला आहे, अशी जोरदार टीका अपक्ष आमदार विजय सरदेसाई यांनी गुरुवारी विधानसभेत केली. सरदेसाई व अन्य आमदारांनी मिळून वनमंत्री एलिना साल्ढाणा यांना या विषयावरून धारेवर धरले. प्रश्नोत्तराच्या तासावेळी सरदेसाई यांनी हा विषय मांडला. त्या वेळी विधानसभेत मंत्री विरुद्ध विरोधक असा जोरदार संघर्ष झाला व सभागृहातील वातावरण तापले. मार्च २०१२ मध्ये निवडणुका झाल्या व भाजप सरकार अधिकारावर येताच तीन दिवसांत त्या वेळी २२ लाख चौ.मी. जमिनीचे रूपांतरण करण्यास आरंभ झाला. लोलयेमधील ही जमीन सेटलमेन्टच्या क्षेत्रात येत नाही. ती आॅर्चड जमीन आहे. दि. ९ मार्चपासून त्या जमिनीचे रूपांतर सुरू झाले. इको टुरिझम नावाचे धोरण अस्तित्वात आहे, याची कल्पनादेखील यापूर्वी सरकारने कुणालाच दिली नाही. या प्रकरणात मंत्री साल्ढाणा गुंतलेल्या नाहीत; पण त्यांना निवडून आणण्यासाठी काही कोटी रुपये आपण खर्च केल्याचे जे कुणी सांगतात, तेच लोलयेमधील प्रकरणी पैसे गोळा करत असतील, असा आरोप सरदेसाई यांनी केला. वन खात्याचे अधिकारी वरिष्ठ मंत्र्यांची दिशाभूल करत आहेत, असेही सरदेसाई म्हणाले. (खास प्रतिनिधी)