शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकांमुळे हिवाळी अधिवेशन दहा दिवस पुढे ढकलले जाणार ? राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
2
महाराष्ट्र ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्षपद अजित पवारांकडेच; चौथ्यांदा मिळवली जबाबदारी
3
शफालीसह दीप्तीचं अर्धशतक! दक्षिण आफ्रिकेसमोर टीम इंडियानं सेट केलं २९९ धावांचे टार्गेट
4
मोठे आश्वासन देऊ नका; 10-20%..; अमेरिकन टॅरिफबाबत रघुराम राजन यांचा इशारा
5
वर्ल्ड कप फायनलमध्ये 'लेडी सेहवाग'चा विक्रमी धमाका! धोनी-गंभीरला मागे टाकण्याचीही होती संधी, पण...
6
पाकिस्तान करतोय हल्ले, भारतानं पाठवली 'अनमोल' मदत...; दिल्लीच्या निर्णयानं अफगाणिस्तानचं मन जिंकलं, मुनीरला मिरची लागणार!
7
2026 मध्ये किती रुपयांपर्यंत जाऊ शकतं सोनं? जाणून थक्क व्हाल! आता ₹10 हजारनं स्वस्त मिळतंय, एक्सपर्ट म्हणतायत चांगली संधी
8
Fact Check: आधार कार्ड दाखवून फुकटात मिळतेय बाईक? मोदींचा व्हिडीओ व्हायरल! सत्य समोर!
9
मेक्सिकोच्या सुपरमार्केटमध्ये भीषण स्फोट, २३ जणांचा मृत्यू; नेमके काय घडले?
10
IND W vs SA W Final : वनडे 'क्वीन' स्मृतीनं रचला इतिहास! मितालीचा विक्रम मोडत ठरली 'नंबर वन'
11
शत्रूच्या हालचालींवर भारताची करडी नजर! ISRO ने लॉन्च केले नौदलाचे सर्वात शक्तिशाली सॅटेलाईट
12
'दहशतवादी हल्ल्याचा कट अमेरिकेने रचला, पाकिस्तानने घडवून आणला'; शेख हसीना यांनी मौन सोडले
13
अभिषेक शर्माचा मोठा कारनामा! हिटमॅन रोहितसह गब्बरचा विक्रम मोडत रचला नवा इतिहास
14
"राज ठाकरे हे फेक नॅरेटीव्हच्या बाबतीत राहुल गांधींशी स्पर्धा करत आहेत का?", भाजपाचा सवाल
15
'ऑपरेशन सिंदूरद्वारे विस्फोट पाकिस्तानात, अन् झोप उडाली काँग्रेसची', पीएम मोदींचा घणाघात...
16
IND vs AUS : वॉशिंग्टनची अति 'सुंदर' बॅटिंग! विक्रमी विजयासह टीम इंडियानं केली ऑस्ट्रेलियाची बरोबरी
17
सरकारी निवासस्थानी प्रेयसीसोबत झोपले होते अधिकारी, पत्नीने रंगेहात पकडले आणि घरात कोंडले, त्यानंतर... 
18
शिंदेसेना म्हणजे दिल्या भाकरीचे अन् सांगितल्या कामाचे; अंबादास दानवेंची खरमरीत टीका
19
धोक्याची घंटा! फोन, लॅपटॉपचा जास्त वापर घातक; तरुणांमध्ये वाढली 'ड्राय आईज'ची समस्या
20
'सरकारने SIT ची घोषणा केली, पण नियुक्तीच नाही'; सुषमा अंधारे फलटण पोलीस ठाण्यात जाऊन विचारणार जाब

विधानसभेला २ वर्षे, आताच बोलणे अयोग्य: जीत आरोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 08:30 IST

आपला उमेदवार निवडून यावा ही सर्वांची इच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे आहेत. या काळात अनेक घडामोडी घडतील. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून यावा, आपल्यालाच बहुमत मिळावे असे वाटणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे आताच राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे मत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी मांद्रे मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणू, याबाबत विचारले असता आरोलकर यांनी वरील मत व्यक्त केले. तसेच ते म्हणाले की, आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. शेवटी आमच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदारच घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण सध्या मगो पक्षात आहे. भाजप व मगोची युती आहे. सरकार विकासकामांबाबत चांगले काम करीत आहे. मांद्रेत सुद्धा पर्यटनाशी संबंधित तसेच स्थानिकांसाठी सरकार कामे करीत आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अजूनही दोन वर्षे आहेत. राजकारण हे नेहमीच अस्थिर असते. त्यामुळे आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही आरोलकर यांनी सांगितले.

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या मतदारसंघात किमान सहा महिन्यांतून एकदा तरी जावे. लोकांना भेटावे, त्यांची मते जाणून घ्यावीत, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे मत आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

निर्णय कार्यकर्त्यांच्या हाती

मांद्रेतील कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन तसेच सल्ल्यानुसारच पुढे जात आहोत. त्यामुळे शेवटी कार्यकर्तेच काय ते ठरवतील. सरकार चांगले काम करीत आहे. मतदारच मतदान करतात, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण