शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG 5th Test : टीम इंडियानं हातून निसटलेली मॅच जिंकून दाखवली! मालिकेत बरोबरी
2
"हे बंद करा"; परिणय फुकेंच्या विधानावर बोलताना CM फडणवीसांनी माध्यमांचे टोचले कान, काय म्हणाले?
3
मुंबई घडवण्यात हिंदी भाषिकांचं मोठं योगदान, मराठी केवळ ३० टक्के...: निशिकांत दुबेंनी पुन्हा डिवचलं
4
एका शेअरवर १५६ रुपयांचा डिविडंड देणार ही कंपनी, रेकॉर्ड डेट १५ ऑगस्टपूर्वीच, तुमच्याकडे आहे का?
5
“आपला पक्ष मुंबईत सर्वांत जास्त बलवान आहे, यंदा महापालिकेत मनसेचीच सत्ता येणार”: राज ठाकरे
6
एक दिवस एमजी टाटाला मागे टाकणार? जुलैमध्ये एवढ्या विकल्या इलेक्ट्रीक कार... ह्युंदाई क्रेटा...
7
भारतातील एकमेव रेल्वे स्टेशन, ज्याला नावच नाही, तरीही थांबते ट्रेन, लोक करतात प्रवास
8
पंतप्रधान मोदींनंतर चार तासांनी अमित शाह राष्ट्रपतींना भेटले; ५ ऑगस्टला काहीतरी मोठे घडणार....
9
IND vs ENG :मियाँ मॅजिक! बॅक टू बॅक ओव्हरमध्ये विकेट; KL राहुलनं एक कॅच सोडला
10
IND vs ENG : क्रिस वोक्सला सलाम! खांदा फॅक्चर असताना संघासाठी मैदानात उतरला (VIDEO)
11
शाहरुख खान अन् राणी मुखर्जीसाठी प्रिय मित्र करण जोहरची पोस्ट, म्हणाला, "३३ वर्षांचा हा काळ..."
12
थ्रेडिंगमुळे लिव्हर फेल? आयब्रो करणं पडेल चांगलंच महागात, डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
13
१७,००० कोटींचा घोटाळा! अनिल अंबानींच्या डोकेदुखीत वाढ, ED आता 'या' लोकांची चौकशी करणार
14
Post Office ची ५० वर्ष जुनी सेवा होणार बंद, तुमच्यावर काय परिणाम होणार?
15
नव्या प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या; स्थानिक निवडणुकांना हिरवा कंदील
16
६ ऑगस्टला बच्चू कडू राज ठाकरेंची भेट घेण्याची शक्यता; शेतकरी आंदोलनाला मनसेचं पाठबळ मिळणार?
17
लॉटरी लागली! टाटांच्या 'या' शेअरचे होणार १० तुकडे, १०० शेअर्सचे थेट १००० होणार, रेकॉर्ड डेट कधी?
18
मैत्रिणीचा संसार मोडला, नंतर तिच्याच नवऱ्याशी केलं लग्न; आता ३ वर्षांतच अभिनेत्रीवर घटस्फोट घेण्याची वेळ
19
Nagpur: नागपुरात मद्यधुंद अवस्थेत कार चालवणाऱ्या जवानानं ३० जणांना उडवलं, व्हिडीओ व्हायरल!

विधानसभेला २ वर्षे, आताच बोलणे अयोग्य: जीत आरोलकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 20, 2025 08:30 IST

आपला उमेदवार निवडून यावा ही सर्वांची इच्छा

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला दोन वर्षे आहेत. या काळात अनेक घडामोडी घडतील. प्रत्येक पक्षाला आपला उमेदवार निवडून यावा, आपल्यालाच बहुमत मिळावे असे वाटणे स्वाभाविकच आहे. त्यामुळे आताच राजकीय परिस्थितीवर भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असे मत मांद्रेचे आमदार जीत आरोलकर यांनी व्यक्त केले.

मुख्यमंत्र्यांनी मांद्रे मतदारसंघात आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपचा उमेदवार निवडून आणू, याबाबत विचारले असता आरोलकर यांनी वरील मत व्यक्त केले. तसेच ते म्हणाले की, आम्ही योग्यवेळी योग्य निर्णय घेऊ. शेवटी आमच्या राजकीय भवितव्याचा निर्णय मतदारच घेणार आहेत, असेही त्यांनी स्पष्ट केले. आपण सध्या मगो पक्षात आहे. भाजप व मगोची युती आहे. सरकार विकासकामांबाबत चांगले काम करीत आहे. मांद्रेत सुद्धा पर्यटनाशी संबंधित तसेच स्थानिकांसाठी सरकार कामे करीत आहे. २०२७ च्या विधानसभा निवडणुकीला अजूनही दोन वर्षे आहेत. राजकारण हे नेहमीच अस्थिर असते. त्यामुळे आताच भाष्य करणे योग्य ठरणार नाही, असेही आरोलकर यांनी सांगितले.

सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी आपल्या मतदारसंघात किमान सहा महिन्यांतून एकदा तरी जावे. लोकांना भेटावे, त्यांची मते जाणून घ्यावीत, त्यांच्या समस्या जाणून घ्याव्यात, असे मत आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

निर्णय कार्यकर्त्यांच्या हाती

मांद्रेतील कार्यकर्ते माझ्या सोबत आहेत. कार्यकर्त्यांच्या मार्गदर्शन तसेच सल्ल्यानुसारच पुढे जात आहोत. त्यामुळे शेवटी कार्यकर्तेच काय ते ठरवतील. सरकार चांगले काम करीत आहे. मतदारच मतदान करतात, असे आमदार जीत आरोलकर यांनी सांगितले.

 

टॅग्स :goaगोवाPoliticsराजकारण