शहरं
Join us  
Trending Stories
1
Video: भरमैदानात तुफान राडा.... शुबमन गिलचा संयम सुटला, पंचांच्या अंगावर ओरडला अन् मग...
2
"संसदेत विधेयक आणा, कोण रोखतय?"; असदुद्दीन ओवेसी यांचा मोदी सरकारवर निशाणा 
3
सातवीच्या निकालाचे ‘टेन्शन’! विद्यार्थिनीने ४ वर्षांच्या बहिणीसह सोडले घर, पोलिसांनी घेतला शोध
4
‘लोकमत’चा दणका: सामूहिक कॉपी करणं भोवलं; भंडाऱ्यातील कांद्रीचे परीक्षा केंद्र तीन वर्षांकरिता रद्द
5
दक्षिण अमेरिकेत ७.४ रिश्टर स्केलचा भूकंप! चिली, अर्जेंटिना हादरले; घरातून बाहेर पडले लोक; त्सुनामीचा इशारा
6
बेजबाबदार RTI कार्यकर्ते खोट्या तक्रारींद्वारे त्रास देण्याचा 'व्यवसाय' चालवतात- गोपाळ शेट्टी
7
Video: पाहुणचाराचा 'गोडवा'! श्रद्धा कपूरने घरच्या पुरणपोळीने केलं इन्स्टाग्रामच्या CEOचं स्वागत
8
'दोन महिन्यांचे राशन साठवून ठेवा', भारताच्या कारवाईने घाबरेल्या पाकिस्तानचे जनतेला आवाहन
9
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
10
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
11
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
12
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक
13
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
14
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
15
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
16
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
17
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
18
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
19
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
20
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?

12th Exams : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची घोषणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 2, 2021 23:07 IST

Coronavirus Exam Cancelled : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय. ठरलेल्या निकषानुसार निर्णय घेणार.

ठळक मुद्देकोरोनाच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्यासाठी घेण्यात आला निर्णय.ठरलेल्या निकषानुसार निर्णय घेणार.

पणजी : गोव्यात बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला. याबाबतची घोषणा शिक्षणमंत्री या नात्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी रात्री केली. "कोरोना महासाथीच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होऊ नये, यासाठी या परीक्षा रद्द करण्यात आल्या आहेत. ठरलेल्या निकषानुसार निकाल जाहीर केला जाईल," असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.तत्पूर्वी सकाळी मुख्यमंत्र्यांनी मुख्य सचिव, शिक्षण सचिव, गोवा शालांत व उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष, शिक्षण खात्याचे संचालक, उच्च शिक्षण खात्याचे संचालक यांची उच्चस्तरीय बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. सीबीएसई बोर्डाने बारावीच्या परीक्षा रद्द केल्याने गोव्यातही बारावीच्या परीक्षांबाबत निर्णय घेण्यासाठी ही महत्त्वाची बोलावली बैठक होती.राज्य सरकार सीबीएसई तसेच केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्याही संपर्कात होते. इतर राज्यांच्या शालांत व उच्च माध्यमिक मंडळांनी बारावीबाबत काय निर्णय घेतला आहे हे तपासून पाहिले आणि सायंकाळी उशिरा परीक्षा रद्द करण्याचा निर्णय झाला. गेले काही दिवस शिक्षणतज्ज्ञ, शाळा प्रमुख, पालक- शिक्षक संघटना तसेच इतर संबंधित घटकांशी सरकार सल्लामसलत करत होते. तीन पर्यायही सरकारच्या विचाराधीन होते. एक तर परीक्षा पूर्णत: रद्द करणे, दुसरा पर्याय म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना परीक्षा द्यायची आहे त्यांना बसू देणे आणि ज्यांना परीक्षा द्यायची नाही त्यांना अंतर्गत गुणांच्या आधारावर पुढच्या वर्गात प्रवेश देणे व दोन्हींचे निकाल एकत्रच जाहीर करणे, असे पर्याय होते. परंतु शेवटी या परीक्षाच रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.इयत्ता बारावीला कला, वाणिज्य आणि विज्ञान या तीन शाखांसाठी सुमारे २० हजार विद्यार्थ्यांनी परीक्षेसाठी नोंदणी केली आहे. विज्ञान शाखेतील विद्यार्थ्यांना नीट, जेईई, जीसीईटी आदी परीक्षा देऊन पुढील व्यावसायिक अभ्यासक्रम निवडावा लागतो. त्यामुळे या परीक्षांच्या बाबतीत केंद्राचा काय निर्णय होतो, याकडे आता विद्यार्थी व पालकांचे लक्ष लागून राहिले आहे. बारावीनंतर उच्च शिक्षणासाठी स्कॉलरशिपचाही विषय येतो. त्यामुळे त्याचे काय करावे, हादेखील एक प्रश्न आहे. सरकार काय उपाय काढते, याकडेही आता लक्ष लागले आहे. दरम्यान, केंद्राचे नवीन शैक्षणिक धोरण आगामी शैक्षणिक वर्षापासून पूर्व प्राथमिक आणि प्राथमिक स्तरावर लागू केले जाईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी एका प्रश्नाचं उत्तर देताना दिली.  शैक्षणिक कृती योजना आणा : कामतविरोधी पक्षनेते तथा काँग्रेसचे आमदार दिगंबर कामत यांनी बारावीच्या परीक्षा रद्द करण्याच्या सरकारच्या निर्णयाचे स्वागत केले आहे. ते म्हणाले की, "विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या व सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सरकारने घेतलेला हा निर्णय योग्यच आहे." "तज्ज्ञांच्या सल्ल्यानेच विद्यार्थ्यांच्या करिअर, भवितव्याबाबत निर्णय घेतला जावा, असे आम्ही सुरुवातीपासूनच म्हणत आहोत. सरकारने शैक्षणिक कृती योजना आणावी," अशी मागणी कामत यांनी केली आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याgoaगोवाexamपरीक्षाPramod Sawantप्रमोद सावंत