शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता येत्या २ महिन्यात एकनाथ शिंदे पुन्हा CM होतील असे वाटतेय”; कुणी केली भविष्यवाणी?
2
"मगरीचे अश्रू, बंगालचा अपमान...", मेस्सीच्या कार्यक्रमात गोंधळ; BJP-TMC मध्ये आरोप-प्रत्यारोप
3
सिडकोच्या घरांमध्ये मोठी सूट; लॉटरीपूर्वीच किमती १० टक्क्यांनी घटल्या, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मोठा निर्णय
4
जंगलात एक कोटींच्या शेळ्या सोडणे हास्यास्पद; वनमंत्र्यांच्या बिबट्यांच्या उपायांची अजित पवारांनी उडवली खिल्ली
5
'धन्यवाद तिरुवनंतपुरम'; थरूर यांच्या बालेकिल्ल्यात भाजपचा झेंडा! पंतप्रधान मोदींनी मानले केरळच्या जनतेचे आभार
6
केरळच्या राजधानीत भाजपाचा ऐतिहासिक विजय, डाव्या पक्षांचा अनेक वर्षांपासूनचा बालेकिल्ला ढासळला
7
साता जन्माची साथ ८ दिवसांत सुटली; नववधू बॉयफ्रेंडसोबत पसार, नवऱ्याची शोधण्यासाठी वणवण
8
“महापालिका निवडणुकीत युतीबाबत चर्चा करून एकत्र निर्णय बसून घेऊ”; अजित पवारांनी केले स्पष्ट
9
...तर थेट मुख्य सचिवांवरच हक्कभंग आणू; राहुल नार्वेकरांचा विधानसभेत संताप, नेमके काय घडले?
10
नवा ट्विस्ट! "पवन सिंहला धमकी दिली नाही, जे करतो ते..."; लॉरेन्स बिश्नोई गँगचा ऑडिओ व्हायरल
11
शरद पवार यांच्या वाढदिवसाच्या पार्टीत राहुल गांधी आणि गौतम अदानी आले आमने-सामने, त्यानंतर घडलं असं काही...
12
Lionel Messi : Video - "फ्रॉड करून गेला, १२ हजारांचं तिकीट..."; मेस्सीची झलक न दिसल्याने फॅन्स प्रचंड चिडले
13
लग्नाच्या नावाखाली अल्पवयीन मुलींचा सौदा; राज ठाकरेंच्या पत्रावर CM फडणवीस म्हणाले, "९० टक्के मुली परत आल्या"
14
“महाराष्ट्र विधानपरिषद देशासाठी आदर्श”; विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचे कौतुकोद्गार
15
टीम इंडियाचं नेमकं कुठं चुकतंय? गौतम गंभीरच्या रणनीतीवर रॉबिन उथप्पाची टीका
16
Mamata Banerjee : "मी माफी मागते"; मेस्सीच्या कार्यक्रमातील गोंधळ पाहून मुख्यमंत्री ममता बॅनर्जी नाराज
17
H-1B व्हिसाच्या नव्या नियमांवरुन ट्रम्पच गोत्यात, वॉशिंग्टन ते कॅलिफोर्नियापर्यंत १९ राज्यांनी कोर्टाचा दरवाजा ठोठावला
18
Lionel Messi: सॉल्ट लेक स्टेडियम तोडफोडप्रकरणी आयोजकाला अटक, प्रेक्षकांनाही तिकिटाचे पैसे परत मिळणार!
19
WhatsApp कॉलवर बोलताय? तुमचं लोकेशन होऊ शकतं ट्रॅक; सुरक्षिततेसाठी ऑन करा 'ही' सेटिंग
20
शोएब मलिकचं तिसरं लग्नही मोडण्याच्या मार्गावर? सना जावेदसोबतच्या नात्यात दुरावा 
Daily Top 2Weekly Top 5

१.४० लाख अर्जदारांनाच मिळणार 'दयानंद'चा लाभ, योजनेत दुरुस्ती; अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 10:24 IST

उत्पन्नमर्यादा वार्षिक दीड लाख

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी १ लाख ४० हजार लाभार्थीची मर्यादा घालण्यात आली असून त्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार प्रतीक्षा यादीत ठेवले जाईल. यासंबंधी योजनेत दुरुस्ती करणारी अधिसूचना समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी काढली आहे.

या योजनेखाली ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ निराधार, दिव्यांग, विधवा, एचआयव्ही बाधीत यांना दरमहा २५०० रुपयांपासून ४ हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक २४ हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असता कामा नये, अशी अट होती. परंतु ही मर्यादाही आता वाढवून वार्षिक दीड लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांची संख्या आता आणखी वाढणार आहे. परंतु त्याच बरोबर १ लाख ४० हजार अर्जाची मर्यादा ठेवल्याने अनेकांना प्रतीक्षा यादीत जावे लागणार आहे.

विधवांना आता २५०० रुपयांऐवजी दरमहा ४ हजार रुपये मिळतील. परंतु त्यासाठीही अटी घालण्यात आलेल्या आहेत. सुधारित योजनेनुसार सर्वात लहान मुलगा अथवा मुलगी २१ वर्षाखालील आहे, अशी विधवा महिला या योजनेस पात्र आहे. तिला दरमहा ४ हजार रुपये मिळतील. ६० वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या व २१ वर्षापेक्षा जास्त वयाचे अपत्य असलेल्या विधवेला महिना २,५०० रुपयेच मिळतील. अधिकृत माहितीनुसार राज्यात ३९,०६२ विधवा लाभार्थी आहेत.

उत्पन्न मर्यादा वाढवल्याने आता जास्त अर्ज येतील त्याचे काय? त्यांना कसे हाताळणार?, असा प्रश्न केला असता फळदेसाई म्हणाले की, अनेकांनी प्रत्यक्षात जास्त उत्पन्न असताही या योजनेचा याआधीच लाभ घेतलेला आहे. त्यामुळे दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा वाढवल्याने काहीच फरक पडणार नाही.

तूर्त १ लाख ३७ हजार लाभार्थी ज्येष्ठ निराधार, दिव्यांग, विधवा, एचआयव्ही बाधित मिळून या योजनेचे सध्या १ लाख ३७ हजार ६२२ लाभार्थी आहेत. 'लोकमत'ने काही दिवसांपूर्वी समाजकल्याण खात्याकडून आरटीआय अर्जातून ही माहिती मिळवली होती. याचाच अर्थ नव्याने घातलेल्या मर्यादेमुळे आणखी केवळ २,३७८ अर्ज मंजूर होऊ शकतील. त्यानंतर प्रतीक्षा यादीत जावे लागेल. एकीकडे उत्पन्न मर्यादा वाढवून दीड लाख रुपये केली व दुसरीकडे लाभार्थीच्या संख्येला मर्यादा घातल्याने हे काय 'लॉजिक' आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भिवपाची गरज ना 

समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना १ लाख ४० हजार लाभार्थी मर्यादेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'भिवपाची गरज ना'. कोणावरही अन्याय होणार नाही. जे खरेच गरजवंत आहेत त्या सर्वांचे अर्ज मंजूर केले जातील. ८० वर्षे वयावरील सुमारे ४ हजार लाभार्थी त्यांच्या पत्त्यावर सापडलेले नाहीत. आमचे सर्वेक्षण चालू आहे. आणखीही काही बोगस लाभार्थी सापडतील. त्यांची नावे काढून टाकली जातील.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार