शहरं
Join us  
Trending Stories
1
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
2
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
3
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
4
IND vs UAE : सूर्यानं टॉस जिंकला! बॉलिंग घेतल्यावर UAE चा कॅप्टन म्हणाला; बॅटिंग करायची ना...
5
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
6
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
7
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
8
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
9
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
10
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
11
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
12
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
13
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
14
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
15
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
16
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
17
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
18
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
19
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
20
Asia Cup 2025 : पाकविरुद्ध हाच डाव खेळणार का? T20 तील टीम इंडियाच्या नंबर वन गोलंदाजाला बसवलं बाकावर

१.४० लाख अर्जदारांनाच मिळणार 'दयानंद'चा लाभ, योजनेत दुरुस्ती; अधिसूचना जारी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 27, 2024 10:24 IST

उत्पन्नमर्यादा वार्षिक दीड लाख

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : दयानंद सामाजिक सुरक्षा योजनेसाठी १ लाख ४० हजार लाभार्थीची मर्यादा घालण्यात आली असून त्यापेक्षा जास्त अर्ज आल्यास 'प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य' या तत्त्वानुसार प्रतीक्षा यादीत ठेवले जाईल. यासंबंधी योजनेत दुरुस्ती करणारी अधिसूचना समाजकल्याण खात्याचे संचालक अजित पंचवाडकर यांनी काढली आहे.

या योजनेखाली ६० वर्षे वयावरील ज्येष्ठ निराधार, दिव्यांग, विधवा, एचआयव्ही बाधीत यांना दरमहा २५०० रुपयांपासून ४ हजार रुपयांपर्यंत आर्थिक साहाय्य मिळते. या योजनेचा लाभ घेण्यासाठी वार्षिक २४ हजार रुपयांपेक्षा जास्त उत्पन्न असता कामा नये, अशी अट होती. परंतु ही मर्यादाही आता वाढवून वार्षिक दीड लाख रुपये करण्यात आली आहे. त्यामुळे अर्जदारांची संख्या आता आणखी वाढणार आहे. परंतु त्याच बरोबर १ लाख ४० हजार अर्जाची मर्यादा ठेवल्याने अनेकांना प्रतीक्षा यादीत जावे लागणार आहे.

विधवांना आता २५०० रुपयांऐवजी दरमहा ४ हजार रुपये मिळतील. परंतु त्यासाठीही अटी घालण्यात आलेल्या आहेत. सुधारित योजनेनुसार सर्वात लहान मुलगा अथवा मुलगी २१ वर्षाखालील आहे, अशी विधवा महिला या योजनेस पात्र आहे. तिला दरमहा ४ हजार रुपये मिळतील. ६० वर्षे वयापेक्षा जास्त वयाच्या व २१ वर्षापेक्षा जास्त वयाचे अपत्य असलेल्या विधवेला महिना २,५०० रुपयेच मिळतील. अधिकृत माहितीनुसार राज्यात ३९,०६२ विधवा लाभार्थी आहेत.

उत्पन्न मर्यादा वाढवल्याने आता जास्त अर्ज येतील त्याचे काय? त्यांना कसे हाताळणार?, असा प्रश्न केला असता फळदेसाई म्हणाले की, अनेकांनी प्रत्यक्षात जास्त उत्पन्न असताही या योजनेचा याआधीच लाभ घेतलेला आहे. त्यामुळे दीड लाख रुपयांपर्यंत उत्पन्न मर्यादा वाढवल्याने काहीच फरक पडणार नाही.

तूर्त १ लाख ३७ हजार लाभार्थी ज्येष्ठ निराधार, दिव्यांग, विधवा, एचआयव्ही बाधित मिळून या योजनेचे सध्या १ लाख ३७ हजार ६२२ लाभार्थी आहेत. 'लोकमत'ने काही दिवसांपूर्वी समाजकल्याण खात्याकडून आरटीआय अर्जातून ही माहिती मिळवली होती. याचाच अर्थ नव्याने घातलेल्या मर्यादेमुळे आणखी केवळ २,३७८ अर्ज मंजूर होऊ शकतील. त्यानंतर प्रतीक्षा यादीत जावे लागेल. एकीकडे उत्पन्न मर्यादा वाढवून दीड लाख रुपये केली व दुसरीकडे लाभार्थीच्या संख्येला मर्यादा घातल्याने हे काय 'लॉजिक' आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भिवपाची गरज ना 

समाज कल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांना १ लाख ४० हजार लाभार्थी मर्यादेबद्दल विचारले असता ते म्हणाले की, 'भिवपाची गरज ना'. कोणावरही अन्याय होणार नाही. जे खरेच गरजवंत आहेत त्या सर्वांचे अर्ज मंजूर केले जातील. ८० वर्षे वयावरील सुमारे ४ हजार लाभार्थी त्यांच्या पत्त्यावर सापडलेले नाहीत. आमचे सर्वेक्षण चालू आहे. आणखीही काही बोगस लाभार्थी सापडतील. त्यांची नावे काढून टाकली जातील.

 

टॅग्स :goaगोवाState Governmentराज्य सरकार