शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

बेकायदा खनिज धंद्यामुळे १.४४ लक्ष कोटींचे नुकसान; प्रत्येक नागरिक १० लाखांना नागवला गेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 16, 2023 11:30 IST

कायद्यानुसार गोव्यातील भूखनिजावर मालकी ही गोवा सरकारची नसून गोव्यातील जनतेची आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: कायद्यानुसार गोव्यातील भूखनिजावर मालकी ही गोवा सरकारची नसून गोव्यातील जनतेची आहे. त्यामुळे खाण उद्योगातून प्रत्येक गोमंतकीयांना लाभांश मिळविण्याचा हक्क असल्याचा दावा बेकायदेशीर खनिज उद्योगांविरुद्ध लढा देत आलेले क्लॉड आल्वारीस आणि राहुल बसू यांनी लिहिलेल्या पुस्तकात केला आहे. आतापर्यंत झालेल्या १.४४ लाख कोटी रुपयांच्या बेकायदेशीर खनिज उद्योगामुळे प्रत्येक गोमंतकीय १० लाख रुपयांना नागवला गेल्याचा दावाही पुस्तकात करण्यात आला आहे.

"द गोवा मायनिंग केस' या क्लॉड आणि बसू यांनी लिहिलेल्या पुस्तकाचे बुधवारी निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांच्या हस्ते पणजीतील संस्कृती भवनात प्रकाशन झाले. या पुस्तकात कायदे आणि आकडेवारीचा निर्वाळा देत धक्कादायक दावे करण्यात आले आहेत. १५ टक्के मूल्य असलेले सार्वजनिक मालकीचे खनिज हे खासगी पद्धतीने विकले गेले आणि त्याचा सरकारला काहीही फायदा झाला नाही.

केवळ मूठभर लोक त्यामुळे गब्बर बनले. तसेच लिजांचे बेकायदेशीरपणे नूतनीकरण करून १.४४ लक्ष कोटी रुपयांचे राज्याचे नुकसान करून घेतले आहे. प्रत्येक नागरिक १० लाख रुपयांना नागवला जावा इतके मोठे हे नुकसान असल्याचे म्हटले आहे. वर्ष २०१९ च्या एमएमडीआर कायद्यानुसार जमिनीच्या पोटातील सर्व प्रकारच्या खनिजांवर राज्यातील जनतेचा अधिकार आहे. या कायद्यानुसार गोव्यातील प्रत्येक नागरिक खाण उद्योगातील लाभांशाचा वाटेकरी ठरतो. लिलाव करण्यात आलेल्या खनिजांचा हिशेब केला तर वर्षाला प्रत्येक नागरिकाला ९ हजार रुपये असा हा लाभांश मिळायला हवा होता, असा दावाही पुस्तकाच्या लेखकांनी केला आहे. पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे सूत्रसंचालन संदेश प्रभूदेसाई यांनी केले.

भाजपने 'ती' संधी घालवली

खाण घोटाळा उघडकीस आल्यानंतर ही समस्या सोडवून लुटीची वसुली करण्याची भाजपला संधी होती. उत्खनन केलेले १० हजार कोटी रुपये किमतीचे खनिज सरकारी मालकीचे होते. शिवाय या बेकायदेशीर उद्योगातून कमावलेले ६५ हजार कोटी रुपयेही सरकारच्याच मालकीचे आहेत. त्यामुळे वसुली होणे आवश्यक होते. परंतु भाजप सरकारने ते केले नाही. उलट या सरकारने घोटाळे केलेल्यांनाच पुन्हा लिजे बहाल केली, असेही पुस्तकात म्हटले आहे.

३७,१२४ कोटींचा फायदा

सरकारकडून आतापर्यंत लिलाव केलेल्या ४ खाण ब्लॉकमधून सरकारला ३७,१२४ कोटी रुपये मिळाले आहेत. यातील ४,३१९ कोटी रुपये हे गोवा लोहखनिज कायम निधीत जाणार आहेत, ज्याचा केवळ लोकांसाठीच विनियोग केला जाणार आहे, असे क्लॉड यांनी सांगितले. ही लिजे २०१४-१५ मध्ये वितरित केली असती तर हा पैसा मिळाला नसता. असेही त्यांनी सांगितले.

हेच खरे गोंयकारपण

पुस्तक प्रकाशनानंतर निवृत्त न्यायमूर्ती आर. एम. एस. खांडेपारकर यांनी सांगितले की, गोवा फाउंडेशनच्या नॉर्मा आल्वारीस आणि क्लॉड आल्वारीस यांनी बेकायदेशीर खाणीविरुद्ध पुकारलेला लढा म्हणजेच खरे गोंय गोंयकार गोंयकारपण त्यांनी योग्य पद्धतीने, योग्य माध्यमातून दिलेल्या दीर्घ लढ्याचे स्वतः साक्षीदार असल्याचे त्यांनी सांगितले.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :goaगोवा