शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
3
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
6
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
7
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
8
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
9
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
10
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
11
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
12
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
13
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
14
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
15
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
16
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
17
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
18
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
19
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
20
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

जस्त व लोहाची कमतरता

By admin | Updated: May 15, 2017 01:44 IST

जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील २७ हजार ३१८ मृद नमुन्यांची तपासणी केली असता,

मात्रा देण्याचा सल्ला : जिल्हा मृद चाचणी अधिकारी कार्यालयाचे निष्कर्ष लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने जिल्हाभरातील २७ हजार ३१८ मृद नमुन्यांची तपासणी केली असता, जिल्ह्यातील शेतजमिनीमध्ये विशेष करून जस्त व लोहाची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पिकांच्या योग्य वाढीसाठी प्रती हेक्टरी २५ ते ३० किलो झिंक सल्फेटचा वापर करण्याचा सल्ला दिला आहे. जमिनीच्या गुणधर्मानुसार पिकांची लागवड व खतांची मात्रा देता यावी, यासाठी जिल्हाभरातील प्रत्येक गावातील जमिनीच्या गुणधर्माचा अभ्यास करण्याचे निर्देश जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाला देण्यात आले आहेत. त्यानुसार या कार्यालयाने २०१६-१७ या वर्षात सुमारे २७ हजार ३१८ नमुन्यांची चाचणी केली. चाचणीवरून आढळलेल्या गुणधर्मावरून जिल्ह्याची सुपिकता निर्देशांक व सुपिकता पातळी ठरविण्यात आली आहे. गडचिरोली जिल्ह्याचा नत्र, स्पुरद व पालाश यांचा निर्देशांक अनुक्रमे १.३७, १.१० व २.५९ एवढा आहे. डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाच्या शिफारसी प्रमाणे नत्राचे प्रमाण मध्यम आहे. स्पुरद कमी प्रमाणात आढळले आहे. त्यामुळे २५ टक्के अधिकचे स्पुरद पिकांना देणे गरजेचे आहे. तर पालाशचे प्रमाण भरपूर प्रमाणात आढळून आले आहे. त्यामुळे पालाशचे प्रमाण २५ टक्क्यांपर्यंत कमी करण्याचा सल्ला शेतकऱ्यांना देण्यात आला आहे. जिल्ह्यातील ८३.४७ टक्के जमीन आम्लधर्मी, १६.०८ टक्के जमिनी सर्वसाधारण व ०.४५ टक्के जमीन विम्लधर्मी आढळून आली आहे. पिकांच्या वाढीमध्ये सुक्ष्म मुलद्रव्यांना विशेष महत्त्व आहे. मात्र जमिनीमध्ये जस्त व लोह या सुक्ष्म मुलद्रव्यांची कमतरता असल्याचे आढळून आले आहे. शेतकऱ्यांनी प्रती हेक्टरी २५ ते ३० किलो झिंक सल्फेटचा वापर करावा, असे सुचविण्यात आले आहे. जिल्ह्यात नऊ मृदमाला आहेत. जमिनीचा रंग पिवळसर तपकिरी असल्याचे आढळून आले आहे. मृद चाचणी विभागाने ठरवून दिल्यानुसार खतांची मात्रा देण्याचा सल्ला दिला आहे. ४० हजार मृद चाचणीचे लक्षांक २०१७-१८ या वर्षात जिल्हा मृद सर्वेक्षण व मृद चाचणी अधिकारी कार्यालयाने ४० हजार ९७६ मृद नमुन्यांची चाचणी करण्याचे लक्षांक ठरविण्यात आले आहे. यामध्ये २० हजार ४८८ सर्वसाधारण मृद नमुने व २० हजार ४८८ सुक्ष्म नमुने यांचा समावेश आहे. २०१६-१७ या वर्षात ६७५ पाण्याचे नमुने तपासणीचे लक्षांक ठरविण्यात आले होते. त्यापैकी केवळ १५ पाणी नमुने गोळा करण्यात आले व त्यांची तपासणी करण्यात आली. जमिनीचा गुणधर्म लक्षात येण्याच्या दृष्टीने पाणी तपासणीसुध्दा महत्त्वाची असल्याने पाणी तपासणीकडेही विशेष लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.