शहरं
Join us  
Trending Stories
1
अंडरवर्ल्डमधून मोठी बातमी! लॉरेन्स गँग फुटली; गोल्डी ब्रार, रोहित गोदारा लॉरेन्सपासून वेगळे झाले
2
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
3
हिंसाचार, बलात्कार, स्थलांतर...मणिपूर मुद्द्यावरुन प्रियंका गांधींचा मोदी सरकारवर निशाणा
4
Photo : चिनाब रेल्वे पूल कमालच! पण भारतातल्या 'या' पूलांचीही जगभरात आहे चर्चा
5
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
6
Delhi: नऊ वर्षाच्या मुलीवर बलात्कार, सुटकेसमध्ये केलं बंद; रक्तबंबाळ अवस्थेत पडलेली होती चिमुकली
7
मुलाच्या पिंडदानासाठी गेलेल्या आईसह तिघींचा कोरणी घाटात बुडून मृत्यू
8
भारतीय इंजिनिअरचा दुबईमध्ये स्कुबा डायव्हिंग करताना मृत्यू, पाण्यात उतरल्यानंतर काय झाले की गेला जीव?
9
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
10
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
11
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
12
धक्कादायक! 'लुटेरी दुल्हन' गँगचा धुमाकूळ, जो समोर आला त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
13
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
14
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
15
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
16
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
17
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
18
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
19
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
20
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण

अंगावरून रेल्वे मालगाडी जाऊनही बचावला युवक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2019 06:00 IST

गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी तीन प्लॅटफार्म आहेत. प्रत्येक प्लॅटफार्मवर जाण्यासाठी उडाणपूल बनविण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशी उडाणपुलावरून न जाता शॉर्ट कट मारत खालूनच रेल्वे रूळ पार करून पुढे जातात. पण कधीकधी हा शॉर्ट कट जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय वडसा स्थानकावरील सर्व प्रवाशांनी अनुभवला.

ठळक मुद्देवडसा स्थानकावरील थरार : रूळावर झोपल्याने वाचले प्राण

लोकमत न्यूज नेटवर्कदेसाईगंज : रेल्वे मालगाडीच्या दोन डब्यांना जोडणाऱ्या रिकाम्या जागेतून दुसºया प्लॅटफार्मवर जाताना अचानक रेल्वे सुरू झाली अन् संपूर्ण मालगाडी त्याच्या अंगावरून पुढे निघून गेली. तरीही त्या युवकाला थोडी जखमही झाली नाही. हृदयाचे ठोके चुकविणारी ही घटना मंगळवारी (दि.१०) दुपारी वडसा रेल्वे स्थानकावर घडली.गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज (वडसा) हे एकमेव रेल्वेस्थानक आहे. या ठिकाणी तीन प्लॅटफार्म आहेत. प्रत्येक प्लॅटफार्मवर जाण्यासाठी उडाणपूल बनविण्यात आले आहे. मात्र काही प्रवाशी उडाणपुलावरून न जाता शॉर्ट कट मारत खालूनच रेल्वे रूळ पार करून पुढे जातात. पण कधीकधी हा शॉर्ट कट जीवावर बेतू शकतो, याचा प्रत्यय वडसा स्थानकावरील सर्व प्रवाशांनी अनुभवला.फलाट क्रमांक १ वर गोंदियाला जाणारी पॅसेंजर तर फलाट क्रमांक २ वर गोंदिया-बल्लारशहा डेमो उभी होती. तिसºया फलाटावर मालगाडी उभी होती. पॅसेंजर पकडण्यासाठी तीन युवकांनी मालगाडीच्या दोन डब्यांच्या मध्ये असलेल्या रिकाम्या जागेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला.यामध्ये दोन तरूण रेल्वेडब्यांना जोडणाऱ्या जोडांवर उभे झाले. त्यामुळे तिसऱ्या युवकाने जॉर्इंटच्या खालच्या बाजुने जाऊन रूळ पार करण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याच वेळी मालगाडी सुरू झाल्याने दोन डब्यांच्या जोडावर उभे असलेल्या युवकांनी कसेतरी फलाटावर उड्या मारून स्वत:चे प्राण वाचविले, मात्र खालून जाणाऱ्या युवकापुढे कोणताच पर्याय शिल्लक नव्हता. यावेळी त्या युवकाने समयसूचकता दाखवत क्षणाचाही विलंब न करता दोन रूळांच्या मध्ये समांतर झोपला. यामुळे मालगाडीचे अनेक डबे त्याच्या अंगावरून धडधडत पुढे निघून गेले. मात्र त्या युवकाला कोणतीही इजा झाली नाही.मालगाडी निघून गेल्यानंतर भयभीत झालेल्या युवकाने रेल्वे स्थानकावरून पळ काढला. त्यामुळे त्याचे नाव कळू शकले नाही. हा चित्तथरारक प्रसंग काही रेल्वेप्रवाशांनी मोबाईलच्या कॅमेºयात कैद केला.उड्डाणपुलाचा वापर कराफलाट ओलांडण्यासाठी रेल्वेने उड्डाण पूल बनविले आहेत. मात्र अनेक वेळा प्रवाशी त्याचा वापर न करता खालूनच रेल्वे रुळावरून पलिकडे जातात. परिणामी अशा जीवघेण्या प्रसंगांना सामोरे जावे लागते. रेल्वे रूळ ओलांडणे बेकायदेशीर आहे. प्रवाशांनी उड्डाण पुलावरूनच फलाट ओलांडावा, असे आवाहन देसाईगंजचे स्टेशनमास्टर संजयकुमार सिंग यांनी ‘लोकमत’च्या माध्यमातून रेल्वे प्रवाशांना केले आहे.

टॅग्स :railwayरेल्वे