शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

गोंडवाना विद्यापीठात भरली युवा संसद

By admin | Updated: September 27, 2014 01:40 IST

गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील ३० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून स्वीप उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा

गडचिरोली : गोंडवाना विद्यापीठांतर्गत येणाऱ्या जिल्ह्यातील ३० महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या पुढाकारातून स्वीप उपक्रमासाठी राष्ट्रीय सेवा योजनेच्या माध्यमातून पुढाकार घेण्यात यावा, रासेयोच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी मतदारांमध्ये जागृती निर्माण करावी, असे आवाहन प्रभारी कुलगुरू तथा जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले. शुक्रवारी विद्यापीठात आयोजित कार्यक्रमात ते युवा संसदेला संबोधित करतांना बोलत होते. कार्यक्रमाला स्वीपच्या अध्यक्ष तथा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी संपदा मेहता, कुलसचिव डॉ. विनायक इरपाते, विद्यार्थी कल्याण विभागाचे संचालक तथा रासेयो विद्यापीठ समन्वयक डॉ. ईश्वर मोहुर्ले, जिल्हा समन्वयक डॉ. श्रीराम गहाणे, डॉ. संजय गोरे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार उपस्थित होते. प्रत्येक नागरिकांनी कोणत्याही आमिष व प्रलोभनाला बळी न पडता विधानसभा निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावावा व इतरांनाही जागृत करावे, लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येकांनी मतदानाचा हक्क बजाविणे आवश्यक आहे. निवडणूक कार्यपद्धती व सुधारणा या विषयावर युवा संसदेचे आयोजन करून युवकांना विचार व्यक्त करण्याची संधी देण्यात आली. त्यामुळे युवकांनी सक्रीय सहभाग नोंदविला. त्यामुळे ते कौतुकास पात्र आहेत, असे प्रतिपादनही जिल्हाधिकारी रणजीतकुमार यांनी केले.देशाच्या विकासात युवकांची महत्वपूर्ण भूमिका आहे. युवकांनी मतदान जागृती अभियानात सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन सीईओ संपदा मेहता यांनी केले. युवा संसदेच्या माध्यमातून निवडणूक कार्यपद्धती व सुधारणा याबाबत विचारांचे आदान-प्रदान झाले. युवकांमधील गुण व कमतरता समजण्यास मदत झाली, असे प्रतिपादन डॉ. मोहुर्ले यांनी केले. निवडणूक आयोगासमोरील आव्हाने व सुधारणा याबाबत डॉ. संजय गोरे, डॉ. राजेंद्र मुद्दमवार यांनी मत व्यक्त केले. कार्यक्रमाच्या दुसऱ्या सत्रात अभिरूप संसदेचे आयोजन करण्यात आले. यामध्ये सभापती, पंतप्रधान, गृहमंत्री, कायदामंत्री, विरोधी पक्ष नेता, प्रधान सचिव व सनधी नोकर असे विविध पदे महाविद्यालयांकडे प्रातिनिधीक स्वरूपात सोपविण्यात आले. त्यानंतर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची दोन गटात विभागणी करून विविध प्रश्नांवर विचार मंथन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी या अभिनव उपक्रमात सहभागी होऊन मतदानाचे महत्व पटवून दिले.