शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्रात भाजप कोणाच्याही कुबड्यांवर चालत नाही; सत्तेमुळे तुम्ही समाधानी असाल, पण मी नाही": शाह
2
१२ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; SIR दुसरा टप्पा ४ नोव्हेंबरपासून, महाराष्ट्राचा समावेश नाही
3
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
4
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
5
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
6
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
7
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
8
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
9
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
10
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
11
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
12
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
13
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
14
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
15
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
16
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
17
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
18
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
19
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
20
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला

यावर्षीच्या अतिवृष्टीने १७९७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:46 IST

यावर्षी १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार ७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम अजुनही सुरूच आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमदत वितरण सुरू : आठ व्यक्तींसह ६७ जनावरांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार ७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम अजुनही सुरूच आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात सुमारे १३०० मिमी पाऊस पडतो. जुलै महिन्याच्या २४ तारखेपासून जिल्ह्यात संतत पावसाला सुरूवात झाली होती. जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस कोसळत होता. यादरम्यान अनेक तालुक्यात वारंवार अतिवृष्टी झाली. ग्रामीण भागात मातीची कच्ची घरे मोठ्या प्रमाणात आहेत. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका त्या कच्च्या घरांना बसला. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे गावात पाणी शिरले होते. त्यामुळे घरांची पडझड झाली.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २० पक्की व कच्ची घरे पूर्णत: कोसळली आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १५, आरमोरी तालुक्यात ४ व सिरोंचा तालुक्यातील एका घराचा समावेश आहे. २२ पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १५ घरे सिरोंचा तालुक्यातील आहेत. अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे १ हजार ५३६ कच्ची घरे अंशत: पडझड झाली आहेत. तसेच ११६ गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. पुरात २४ मोठी दुधाळ जनावरे, सात लहान दुधाळ जनावरे, ओढ काम करणारी ३६ मोठी जनावरे वाहून गेली आहेत.पुराने घेतला आठ जणांचा बळीजिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांवर ठेंगणे पूल आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर या पुलांवरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. दैनंदिन कामासाठी काही नागरिक धोका पत्करून पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांढतात. यामुळे पुरात वाहून जाण्याच्या घटना घडतात. १५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील आठ नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा व भामरागड तालुक्यातील प्रत्येकी एक व तर अहेरी व आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी दोघांना प्राण गमवावे लागले.एक कोटी रुपयांची मदत प्राप्तराज्य शासनाच्या महसूल विभागाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ८ आॅगस्ट रोजी शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित नागरिकांना मदत म्हणून एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले. सदर रक्कम तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे पंचनामे झाले आहेत, त्यांना आर्थिक मदतसुध्दा दिली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस