शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

यावर्षीच्या अतिवृष्टीने १७९७ घरांची पडझड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 20, 2019 00:46 IST

यावर्षी १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार ७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम अजुनही सुरूच आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.

ठळक मुद्देमदत वितरण सुरू : आठ व्यक्तींसह ६७ जनावरांचा गेला जीव

लोकमत न्यूज नेटवर्कगडचिरोली : यावर्षी १ जून ते १६ आॅगस्ट या कालावधीत झालेल्या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील १ हजार ७९७ घरांची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली. नुकसानाची माहिती गोळा करण्याचे काम अजुनही सुरूच आहे. त्यामुळे पडझड झालेल्या घरांची संख्या वाढण्याची शक्यता आहे.गडचिरोली जिल्ह्यात वर्षभरात सुमारे १३०० मिमी पाऊस पडतो. जुलै महिन्याच्या २४ तारखेपासून जिल्ह्यात संतत पावसाला सुरूवात झाली होती. जुलैच्या शेवटपर्यंत पाऊस कोसळत होता. यादरम्यान अनेक तालुक्यात वारंवार अतिवृष्टी झाली. ग्रामीण भागात मातीची कच्ची घरे मोठ्या प्रमाणात आहेत. अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका त्या कच्च्या घरांना बसला. सतत कोसळत असलेल्या पावसामुळे गावात पाणी शिरले होते. त्यामुळे घरांची पडझड झाली.जिल्हाधिकारी कार्यालयाकडे उपलब्ध असलेल्या आकडेवारीनुसार २० पक्की व कच्ची घरे पूर्णत: कोसळली आहेत. यामध्ये गडचिरोली तालुक्यातील १५, आरमोरी तालुक्यात ४ व सिरोंचा तालुक्यातील एका घराचा समावेश आहे. २२ पक्क्या घरांची अंशत: पडझड झाली आहे. यामध्ये सर्वाधिक १५ घरे सिरोंचा तालुक्यातील आहेत. अंशत: पडझड झालेल्या कच्च्या घरांची संख्या सर्वाधिक आहे. सुमारे १ हजार ५३६ कच्ची घरे अंशत: पडझड झाली आहेत. तसेच ११६ गुरांच्या गोठ्यांची पडझड झाली आहे. पुरात २४ मोठी दुधाळ जनावरे, सात लहान दुधाळ जनावरे, ओढ काम करणारी ३६ मोठी जनावरे वाहून गेली आहेत.पुराने घेतला आठ जणांचा बळीजिल्ह्यातील अनेक नदी, नाल्यांवर ठेंगणे पूल आहेत. अतिवृष्टी झाल्यानंतर या पुलांवरून पाणी वाहण्यास सुरूवात होते. दैनंदिन कामासाठी काही नागरिक धोका पत्करून पुलावरून पाणी वाहत असताना पूल ओलांढतात. यामुळे पुरात वाहून जाण्याच्या घटना घडतात. १५ दिवसांपूर्वी झालेल्या अतिवृष्टीमुळे आतापर्यंत जिल्ह्यातील आठ नागरिकांचा बळी गेला आहे. यामध्ये गडचिरोली, चामोर्शी, मुलचेरा व भामरागड तालुक्यातील प्रत्येकी एक व तर अहेरी व आरमोरी तालुक्यातील प्रत्येकी दोघांना प्राण गमवावे लागले.एक कोटी रुपयांची मदत प्राप्तराज्य शासनाच्या महसूल विभागाने पूरग्रस्तांच्या मदतीसाठी ८ आॅगस्ट रोजी शासन निर्णय काढला आहे. त्यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अतिवृष्टीने बाधित नागरिकांना मदत म्हणून एक कोटी रुपये उपलब्ध करून दिले. सदर रक्कम तहसीलदारांकडे पाठविण्यात आली आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. ज्यांचे पंचनामे झाले आहेत, त्यांना आर्थिक मदतसुध्दा दिली जात आहे.

टॅग्स :Rainपाऊस